शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

Pandav Panchami 2022: महाभारत कधीच संपलं, पण कौरव पांडवांचे वंशज 'या' गावात अजूनही शिल्लक आहेत असं म्हणतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 12:48 IST

Pandav Panchami 2022: पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला तो दिवस पांडव पंचमी म्हणून साजरा केला जातो. पण त्यानंतरही कौरव आणि पांडव आजतागायत शिल्लक राहिले म्हणतात!

उत्तराखंड ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. तिथले निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची बारमाही रीघ लागलेली असते. तेथील एक छोटेसे गाव रामायण आणि महाभारताशी संबंधित आहे. एवढेच नाही तर तिथे आजही कौरव पांडवांचे वंशज राहतात असे म्हटले जाते. अशा गावी भेट द्यायला आपल्यापैकी प्रत्येकाला नक्कीच आवडेल, हो ना ? चला त्या गावाबद्दल अधिक जाणून घेऊया. 

उत्तराखंडच्या गढवाल येथे कलाप नावाचे गाव आहे. हे गाव इतर शहरी विभागापासून अलिप्त आहे. तिथे मानववस्तीदेखील विरळ आहे. त्यामुळे हे गाव पर्यटकांना फारसे परिचित नाही. परंतु हे गाव अनेक पौराणिक घटनांशी जोडलेले आहे. कलाप गाव एका लांब रुंद पसरलेल्या घाटात स्थित आहे. असे म्हणतात, की हे गाव महाभारताची जन्मभूमी आहे. एवढेच नाही तर या गावाशी रामायणाचाही संबंध आला होता असे म्हणतात. म्हणून इथले गावकरी आजही स्वतःला कौरव आणि पांडव यांचे वंशज असल्याचे सांगतात. 

या गावात आजही आधुनिक सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांचा उदर निर्वाह गावातले उद्योग धंदे यावर चालतो. अशा परिस्थितीमुळे हे गाव एकविसाव्या शतकातले वाटत नाही, तर ते पुराणकाळातलेच वाटते. परंतु, याच गोष्टीमुळे तेथील निसर्ग सौंदर्य अबाधित राहिले आहे. म्हणून पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने त्या गावापर्यंत दळणवळणाच्या सोयी सुविधा वाढवण्याचा पर्यटन क्षेत्राचा प्रयत्न सुरू आहे. 

या गावाला पौराणिक इतिहास असल्यामुळे गावात महाभारतकालीन प्रसंगाशी संबंध सांगणारे उत्सव साजरे केले जातात. तिथे दर दहा वर्षांनी महारथी कर्ण याचा उत्सव केला जातो. तसेच जानेवारीत पांडव नृत्याचा सोहळा होतो. महाभारत व रामायण कथांमधील विविध प्रसंग नाट्यरूपात सादर केले जातात. उत्सवाच्या वेळी तिथे गव्हाची कणिक आणि गूळ घातलेला गोड पदार्थ बनवला जातो. 

हे सर्व वर्णन वाचल्यावर तुम्हालाही तिथे जाण्याबद्दल कुतूहल निर्माण झाले असेल ना? तर तिथे कसे जायचे पहा. कलाप दिल्ली पासून ५४० किमी दूर आहे. तर डेहरादून येथून २१० किमी दूर आहे. इथे वर्षभरात कधीही जाऊ शकता. तेथील हिमवृष्टीचा सोहळा अतिशय नयनरम्य असतो. 

टॅग्स :Mahabharatमहाभारत