शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Palmistry: तुम्ही किती वर्षं जगणार? हे हस्तरेषा बघून लगेच कळणार; जाणून घ्या तुमचे भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:56 IST

Palmistry: हस्तरेषा पाहून आपल्याला आपल्या भविष्याचा ढोबळ अंदाज बांधता येतो तर सखोल अभ्यासाने भविष्यही जाणून घेता येते. 

आपण किती वर्ष जगणार याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते. हस्तरेषा पाहून आपले आयुर्मान कळते. अर्थात त्याचा अभ्यास अतिशय खोल आहे. पण वरवर पाहता ढोबळ अंदाज नक्कीच घेता येऊ शकतो. तो कसा घ्यायचा, ते पाहू. 

तळहातातील जीवनरेषा तुमच्या आयुष्याबद्दल महत्त्वाची माहिती देते. तर्जनी आणि अंगठ्यापासून सुरू होणारी आणि मनगटावर समाप्त होणारी तळहाताची रेषा ही जीवनरेषा म्हणून ओळखली जाते. त्यावरून आपले आयुर्मान किती असू शकेल याचा अंदाज घेता येतो. 

प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हवे असते. अशातच सर्व सुख-सुविधा मिळाल्यानंतर त्या उपभोगुनच हे जग सोडले पाहिजे, अशी आपली मानसिकता असते. हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या लोकांच्या तळहातावर दीर्घ आयुष्य रेषा असते, ते लोक केवळ दीर्घकाळ जगत नाहीत तर जीवनातही प्रगती करतात. चला तर मग जाणून घेऊया हस्तरेषा शास्त्रानुसार तुमच्या तळहातावर जीवन रेषा कुठे आहे आणि त्याचा अर्थ काय आहे.

तळहातामध्ये जीवन रेषा कोणती?

तळहातातील जीवनरेषा तर्जनीपासून सुरु होते ती अंगठ्यापासून मनगटापर्यंत पोहोचते. तिलाच जीवन रेषा आणि इंग्रजीत लाईफ लाईन म्हणतात. ही रेषा  व्यक्तीचे आरोग्य आणि आयुष्य याबद्दल भाकीत दर्शवते. ठळक आणि स्पष्ट रेषा हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. या रेषेवरील त्रिकोणाचे चिन्ह शुभ मानले जाते. हा त्रिकोण तळहातावरील अंगठ्याच्या खालच्या भागावर असूशकतो. तो असेल तर उत्तम आयुरारोग्य लाभते. 

तुटलेली जीवनरेषा 

जर तुमच्या तळहातावरची जीवनरेषा तुटली असेल तर याचा अर्थ तुम्हाला दीर्घ आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आयुष्यात कोणत्या ना कोणत्या आजाराचे शिकार होऊ शकता. आरोग्याच्या समस्या उद्भवतात, अपघाताचे प्रसंग येतात. यापासून बचाव झाला तर साधारण सत्तरी सहज पार करू शकता. 

ठळक आणि स्पष्ट जीवन रेषेचा अर्थ

जर तळहातावरच्या रेषा ठळक आणि स्पष्ट असेल तर असे लोक आनंदी आणि यशस्वी जीवन जगतात. आरोग्याच्या तक्रारी फारशा येत नाहीत. यशप्राप्तीसाठी फार धडपड करावी लागत नाही. ही जीवन रेषा त्यांच्यासाठी भाग्यरेषाही ठरते. 

दोन भागांमध्ये विभागलेल्या जीवनरेषेचा अर्थ

जर एखाद्या व्यक्तीची जीवनरेषा दोन भागात विभागली गेली असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती मृत्यूच्या दारात जाऊन परत येते. आयुष्यात आजाराचे, अपघाताचे असे प्रसंग येतात की मृत्यूशी गाठभेट होते पण मरण न येता जणू काही पुनर्जन्म मिळतो आणि दुसरे बोनस आयुष्य सुरु होते. मनगटाजवळच्या शेवटच्या भागात जीवनरेषा दुभंगली असेल तर असे लोक त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी घरापासून दूर असतात.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष