शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

Palmistry: तुम्ही किती वर्षं जगणार? हे हस्तरेषा बघून लगेच कळणार; जाणून घ्या तुमचे भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:56 IST

Palmistry: हस्तरेषा पाहून आपल्याला आपल्या भविष्याचा ढोबळ अंदाज बांधता येतो तर सखोल अभ्यासाने भविष्यही जाणून घेता येते. 

आपण किती वर्ष जगणार याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते. हस्तरेषा पाहून आपले आयुर्मान कळते. अर्थात त्याचा अभ्यास अतिशय खोल आहे. पण वरवर पाहता ढोबळ अंदाज नक्कीच घेता येऊ शकतो. तो कसा घ्यायचा, ते पाहू. 

तळहातातील जीवनरेषा तुमच्या आयुष्याबद्दल महत्त्वाची माहिती देते. तर्जनी आणि अंगठ्यापासून सुरू होणारी आणि मनगटावर समाप्त होणारी तळहाताची रेषा ही जीवनरेषा म्हणून ओळखली जाते. त्यावरून आपले आयुर्मान किती असू शकेल याचा अंदाज घेता येतो. 

प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हवे असते. अशातच सर्व सुख-सुविधा मिळाल्यानंतर त्या उपभोगुनच हे जग सोडले पाहिजे, अशी आपली मानसिकता असते. हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या लोकांच्या तळहातावर दीर्घ आयुष्य रेषा असते, ते लोक केवळ दीर्घकाळ जगत नाहीत तर जीवनातही प्रगती करतात. चला तर मग जाणून घेऊया हस्तरेषा शास्त्रानुसार तुमच्या तळहातावर जीवन रेषा कुठे आहे आणि त्याचा अर्थ काय आहे.

तळहातामध्ये जीवन रेषा कोणती?

तळहातातील जीवनरेषा तर्जनीपासून सुरु होते ती अंगठ्यापासून मनगटापर्यंत पोहोचते. तिलाच जीवन रेषा आणि इंग्रजीत लाईफ लाईन म्हणतात. ही रेषा  व्यक्तीचे आरोग्य आणि आयुष्य याबद्दल भाकीत दर्शवते. ठळक आणि स्पष्ट रेषा हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. या रेषेवरील त्रिकोणाचे चिन्ह शुभ मानले जाते. हा त्रिकोण तळहातावरील अंगठ्याच्या खालच्या भागावर असूशकतो. तो असेल तर उत्तम आयुरारोग्य लाभते. 

तुटलेली जीवनरेषा 

जर तुमच्या तळहातावरची जीवनरेषा तुटली असेल तर याचा अर्थ तुम्हाला दीर्घ आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आयुष्यात कोणत्या ना कोणत्या आजाराचे शिकार होऊ शकता. आरोग्याच्या समस्या उद्भवतात, अपघाताचे प्रसंग येतात. यापासून बचाव झाला तर साधारण सत्तरी सहज पार करू शकता. 

ठळक आणि स्पष्ट जीवन रेषेचा अर्थ

जर तळहातावरच्या रेषा ठळक आणि स्पष्ट असेल तर असे लोक आनंदी आणि यशस्वी जीवन जगतात. आरोग्याच्या तक्रारी फारशा येत नाहीत. यशप्राप्तीसाठी फार धडपड करावी लागत नाही. ही जीवन रेषा त्यांच्यासाठी भाग्यरेषाही ठरते. 

दोन भागांमध्ये विभागलेल्या जीवनरेषेचा अर्थ

जर एखाद्या व्यक्तीची जीवनरेषा दोन भागात विभागली गेली असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती मृत्यूच्या दारात जाऊन परत येते. आयुष्यात आजाराचे, अपघाताचे असे प्रसंग येतात की मृत्यूशी गाठभेट होते पण मरण न येता जणू काही पुनर्जन्म मिळतो आणि दुसरे बोनस आयुष्य सुरु होते. मनगटाजवळच्या शेवटच्या भागात जीवनरेषा दुभंगली असेल तर असे लोक त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी घरापासून दूर असतात.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष