शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

Palmistry: तुम्ही किती वर्षं जगणार? हे हस्तरेषा बघून लगेच कळणार; जाणून घ्या तुमचे भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:56 IST

Palmistry: हस्तरेषा पाहून आपल्याला आपल्या भविष्याचा ढोबळ अंदाज बांधता येतो तर सखोल अभ्यासाने भविष्यही जाणून घेता येते. 

आपण किती वर्ष जगणार याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असते. हस्तरेषा पाहून आपले आयुर्मान कळते. अर्थात त्याचा अभ्यास अतिशय खोल आहे. पण वरवर पाहता ढोबळ अंदाज नक्कीच घेता येऊ शकतो. तो कसा घ्यायचा, ते पाहू. 

तळहातातील जीवनरेषा तुमच्या आयुष्याबद्दल महत्त्वाची माहिती देते. तर्जनी आणि अंगठ्यापासून सुरू होणारी आणि मनगटावर समाप्त होणारी तळहाताची रेषा ही जीवनरेषा म्हणून ओळखली जाते. त्यावरून आपले आयुर्मान किती असू शकेल याचा अंदाज घेता येतो. 

प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हवे असते. अशातच सर्व सुख-सुविधा मिळाल्यानंतर त्या उपभोगुनच हे जग सोडले पाहिजे, अशी आपली मानसिकता असते. हस्तरेषा शास्त्रानुसार ज्या लोकांच्या तळहातावर दीर्घ आयुष्य रेषा असते, ते लोक केवळ दीर्घकाळ जगत नाहीत तर जीवनातही प्रगती करतात. चला तर मग जाणून घेऊया हस्तरेषा शास्त्रानुसार तुमच्या तळहातावर जीवन रेषा कुठे आहे आणि त्याचा अर्थ काय आहे.

तळहातामध्ये जीवन रेषा कोणती?

तळहातातील जीवनरेषा तर्जनीपासून सुरु होते ती अंगठ्यापासून मनगटापर्यंत पोहोचते. तिलाच जीवन रेषा आणि इंग्रजीत लाईफ लाईन म्हणतात. ही रेषा  व्यक्तीचे आरोग्य आणि आयुष्य याबद्दल भाकीत दर्शवते. ठळक आणि स्पष्ट रेषा हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. या रेषेवरील त्रिकोणाचे चिन्ह शुभ मानले जाते. हा त्रिकोण तळहातावरील अंगठ्याच्या खालच्या भागावर असूशकतो. तो असेल तर उत्तम आयुरारोग्य लाभते. 

तुटलेली जीवनरेषा 

जर तुमच्या तळहातावरची जीवनरेषा तुटली असेल तर याचा अर्थ तुम्हाला दीर्घ आयुष्य जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आयुष्यात कोणत्या ना कोणत्या आजाराचे शिकार होऊ शकता. आरोग्याच्या समस्या उद्भवतात, अपघाताचे प्रसंग येतात. यापासून बचाव झाला तर साधारण सत्तरी सहज पार करू शकता. 

ठळक आणि स्पष्ट जीवन रेषेचा अर्थ

जर तळहातावरच्या रेषा ठळक आणि स्पष्ट असेल तर असे लोक आनंदी आणि यशस्वी जीवन जगतात. आरोग्याच्या तक्रारी फारशा येत नाहीत. यशप्राप्तीसाठी फार धडपड करावी लागत नाही. ही जीवन रेषा त्यांच्यासाठी भाग्यरेषाही ठरते. 

दोन भागांमध्ये विभागलेल्या जीवनरेषेचा अर्थ

जर एखाद्या व्यक्तीची जीवनरेषा दोन भागात विभागली गेली असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती मृत्यूच्या दारात जाऊन परत येते. आयुष्यात आजाराचे, अपघाताचे असे प्रसंग येतात की मृत्यूशी गाठभेट होते पण मरण न येता जणू काही पुनर्जन्म मिळतो आणि दुसरे बोनस आयुष्य सुरु होते. मनगटाजवळच्या शेवटच्या भागात जीवनरेषा दुभंगली असेल तर असे लोक त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी घरापासून दूर असतात.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष