शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 09:25 IST

Operation Sindoor: भारत पाकिस्तान सीमेवर तणावग्रस्त वातावरण असल्यामुळे आपल्या योद्ध्यांच्या रक्षणासाठी स्वामींकडे मनोभावे करूया पुढील प्रार्थना!

युद्ध कोणाही सामान्य नागरिकाला नकोच असते, मात्र काही विकृत लोकांना शांतता पाहवत नाही, ते कुरापती करतात आणि त्यांची शिक्षा सगळ्यांनाच भोगावी लागते. अलीकडेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय बळी गेले. कुटुंबांतली एक व्यक्ति जाणं म्हणजे कुटुंबाची वाताहात होण्यासारखं आहे. दहशतवाद्यांनी मुद्दामून पुरूषांना टार्गेट करून स्त्रीयांचे 'सिंदूर' उजाड केले. म्हणून भारताने प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर'(Operation Sindoor) चा सपाटा लावला. आज दोन्ही देशात तणावग्रस्त वातावरण आहे. सगळे भारतीय आपल्या योद्ध्यांच्या जीवित रक्षणासाठी प्रार्थना करत आहेत. शत्रूवर मात करून ते सुखरूप परत यावेत असे देवाला साकडे घालत आहेत. आपण नेहमी आपल्या सुखासाठी पदर पसरतो, आज आपल्या सैंनिकांसाठी स्वामी समर्थांना साकडे घालूया. 

स्वामी सांगतात, 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!' एवढा मोठा दिलासा असताना डगमगण्याची गरज नाही. त्यासाठी ही पुढील प्रार्थना मनोभावे करा. कारण, हे केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हटले, तर मन स्थिर, शांत होईल. विचार थांबतील आणि पूर्णपणे समर्पण भाव जागृत होईल आणि परिस्थिति नियंत्रणात येईल. 

सद्गुरू नाथा हात जोडितों अंत नको पाहूउकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू ।।

निशीदिनी श्रमसी मम् हितार्थ तू किती तुज शीण देऊहृदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहू ॥

उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहूबोधुनि दाविसी इहपर नश्वर मणी उठला बाऊ ॥

कोण कुठील मी कवण कार्य मम जणी कैसा राहूकरी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू ॥

अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहूनिरसुनी माया दावी अनुभव प्रचीती नको पाहू ॥

स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे. गरिबाला मदत करणे, मोठ्यांचा मान राखणे, सेवा करणे, लहानग्यांना समजून घेणे, रागावर नियंत्रण ठेवणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे, मुख्य म्हणजे माणुसकी जपणे. या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात. 'जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला' हे गुपित कायम लक्षात ठेवा. कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत, आपले कार्य त्यांना समर्पित करून देवकार्य करणे हेच अपेक्षित आहे. जो ही सूत्री सांभाळतो, भगवंत त्याचे रक्षण करतो. 

त्यामुळे संकटकाळात उदास न होता, मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्त साद घाला, स्वामी निश्चित मदत करतील!

श्री स्वामी समर्थ!

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरshree swami samarthश्री स्वामी समर्थ