शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
2
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
3
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
4
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
6
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
7
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
8
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
9
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
10
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
11
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
12
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
13
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
14
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
15
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
16
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
17
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
18
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले
19
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
20
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

जगात वैदिक संस्कृतीच टिकून आहे कारण ती ईश्वरनिर्मित आहे व अन्य संस्कृती मानवनिर्मित; त्याचे हे दाखले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 09:30 IST

वैदिकांची संस्कृती अनादि, अनंत, अविच्छिन्न, अखंड परंपरेने जशीच्या तशी विद्यमान आहे. याचे कारण, ही संस्कृती ईश्वरनिर्मित आहे. ईश्वरस्वरूप वेदांतून उपलब्ध झाली आहे.

जगाच्या पाठीवर आजपर्यंत शेकडो संस्कृती जन्माला आल्या आणि अस्ताला गेल्या. धर्मभास्कार गं.ना.कोपरकर बुवा लिहितात, त्या सर्व संस्कृतींचे बारसे आणि चौदाव्याचे पिंडदानही वैदिकांनी पाहिले. त्या संस्कृती हवेत कापूर उडून जावा अशा रितीने विरून गेल्या. आज मात्र उगाळायला म्हणून त्यांचा बारीक अवशेषही शिल्लक नाही. काही संस्कृतींचे समाज तर हजार वर्षे वैभवाच्या शिखरावरही दिमाखात मिरवत राहिले, परंतु आज ते नाममात्रही शिल्लक राहिले नाही. असीरियन, सुमेरियन, शक, हूण, तार्तर, बार्बर, मंगोलियन, ग्रीक, रोमन, इ नावे केवळ इतिहासाच्या पुस्तकात वाचण्यापुरती शिल्लक आहेत. मात्र वैदिक संस्कृती प्राचीन काळापासून आजतागायत टिकून आहे व पुढेही राहील.

वैदिकांची संस्कृती अनादि, अनंत, अविच्छिन्न, अखंड परंपरेने जशीच्या तशी विद्यमान आहे. याचे कारण, ही संस्कृती ईश्वरनिर्मित आहे. ईश्वरस्वरूप वेदांतून उपलब्ध झाली आहे. मनूने वेदवाणीबाबत लिहिले आहे, की-

अनादि निधना नित्या वागुत्सृष्टा स्वयंभुवा।

अर्थ - वेदाद्वारा प्रगट झालेली वेदवाणी अनादी, अनंत अशी आहे. जगात वैदिक संस्कृतीच फक्त ईश्वरनिर्मित आहे. अन्य संस्कृती मानवनिर्मित आहे. श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे-

सहयज्ञा: प्रजा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति:।अनेन प्रसविष्यध्वं एव वोऽस्त्विष्टकामधुक।।

अर्थ - प्रजापति ब्रह्मदेवाने सर्व प्रजा धर्मासह निर्माण केल्या आणि त्यांना तो म्हणाला, या धर्माचे आचरण करा, म्हणजे तुमचे मनोरथ पूर्ण होईल. वरील गीतावचनांत यज्ञ या शब्दाचा अर्थ आहे धर्म! कारण `यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्' या वेदवचनात यज्ञ म्हणजेच धर्म असा अर्थ दिला आहे. तर्कानेही सिद्ध होते की ८४ लक्ष प्राण्यांतील प्रत्येक प्राण्याचा धर्म, त्याचा आहार, विहार, संरक्षण, रोगनिवारण, भोग, अपत्य, संगोपन इ. प्राण्याच्या उत्पत्तिबरोबर लावून दिलेला असतो. त्याप्रमाणे मानव प्राण्यालाही धर्म उत्पत्तीबरोबर लावून दिला आहे. माऊली लिहितात-

ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा,देवा येथ आश्रयो काय आम्हा,तव तो म्हणे कमळजन्मा, भूताप्रति,तुम्हा वर्णाश्रमवशे, स्वधर्मू हा विहिला अस,यात उपासा मग आपैसे, पुरती काम।

अर्थ- वर्णाश्रमाची व्यवस्था ब्रह्मदेवाने मानवाच्या उत्पत्तीबरोबर प्रगट केली. धर्म, धर्माचार, सदाचार, संस्कृती परमेश्वराने सृष्टीबरोबरच निर्माण केली आणि वेदद्वारा प्रगट केली. यावरून वैदिक धर्म, संस्कृती सृष्ट्युप्तत्ती किती प्राचीन आहे हे कळते.