शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
2
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
3
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
4
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
5
"दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट
6
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड
7
मोठा खुलासा! आरसीबीला त्याच दिवशी करायचा होता सत्कार; पोलिसांनी ८ जून तारीख सुचविलेली तरी...
8
Raja Raghuvanshi and Sonam: हनिमूनला गेलेल्या राजा आणि सोनमचा पोलिसांना मिळाला सीसीटीव्ही व्हिडीओ
9
अभिनेते जितेंद्र यांनी विकली मुंबईतील जमीन, तब्बल ८५५ कोटींचा सौदा; नवीन मालक कोण?
10
Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना RCB टीमकडून प्रत्येकी १० लाखांची मदत, त्याशिवाय...
11
महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अ‍ॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार
12
Viral : एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी मुलीने बुक केली गाडी, कारण ऐकलंत का?
13
IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा
14
या देशात जन्माला येणार जगातील 50% मुलं, कमी होऊ लागणार भारताची लोकसंख्या; टेन्शन वाढवणारा आहे तज्ज्ञांचा अनुमान
15
"समृद्धी महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल’’, काँग्रेसचं आव्हान   
16
सामान्यांचा खर्च वाढतोय अन् उत्पन्न कमी..; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
17
'रमैय्या वस्तावैय्या'चा हिरो बऱ्याच वर्षांनी दिसला, ओळखणंही कठीण; नेटकरी म्हणाले...
18
'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा! 
19
जपानला ६४ लाख कामगारांची गरज, पदवी मिळताच करू शकता नोकरी! कोणत्या क्षेत्रात किती जागा? जाणून घ्या
20
बिजापूरमध्ये भीषण चकमक, आणखी एक बडा नक्षलवादी ठार, ४० लाख रुपये बक्षीस असलेला सुधाकर मारला गेला 

आयुष्यात कितीही पैसा कमवला तरी तो कमीच पडणार, जोवर तुमच्याकडे 'ही' पाच रत्न नसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 07:05 IST

श्रीमंती तुम्ही फक्त पैशांत मोजत असाल तर तुम्ही चुकताय, श्रीमंती कशी मोजावी, तर ज्याच्याकडे भगवान बुद्ध यांनी संगीतलेली पाच रत्न असतात.

एकदा एक शिष्य भगवान बुध्दांजवळ आला आणि म्हणाला, 'भगवान, मी श्रीमंत का नाही?'भगवान म्हणाले, 'कारण तू उदार नाहीस!'शिष्य म्हणाला, 'भगवान, उदार तीच व्यक्ती असते, जी श्रीमंत असते. मी दरिद्री कसली उदारता दाखवणार?'भगवान म्हणाले, 'दरिद्री? तू तर श्रीमंत आहेस. तूच नाही, जगातली प्रत्येक व्यक्ती श्रीमंत आहे. कारण प्रत्येकाकडे पाच रत्न आहेत.'शिष्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला, 'रत्न आणि माझ्याजवळ? कोणती रत्न भगवान? कृपया सविस्तर सांगा.' भगवान स्मित वदनाने सांगू लागले... 

'पहिले रत्न, स्मित हास्य. लोकांकडे एवढे प्रश्न आहेत, समस्या आहेत की ते हसणे विसरले आहेत. तुझ्याकडे हास्य आहे. ते तू देऊन बघ. तुला पाहून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर स्मित आल्यावाचून राहणार नाही. एक स्मित हास्य समोरच्याला क्षणभर का होईना दुःख विसरायला भाग पाडते. 

' दुसरे रत्न, डोळे. या डोळ्यांनी आपण जगाकडे पाहतो. पण आपली नजर स्नेहार्द्र असेल, तर केवळ नजरेने समोरच्याला दिलासा मिळू शकतो. आश्वासक नजर फार महत्त्वाची असते. ती नजर कोणाला सकारात्मकता तर कोणाच्या जगण्याला बळ देते. नजरेत प्रेम, माया, वात्सल्य, सहानुभूती असे अनेक भाव दडलेले असतात. अशा प्रेमळ नजरेसाठी अनेक जण आसुसलेले आहेत. 

'तिसरे रत्न, जीभ. ही केवळ विविध पदार्थांचे रस चाखण्यासाठी नाही, तर चांगले बोलण्यासाठी देखील वापरली पाहिजे. आपल्या बोलण्याने दुसऱ्याला प्रोत्साहन देता आले, विश्वास देता आला, कौतुक करता आले, तर त्याचा सकारात्मक परिणाम दुसऱ्याच्या आयुष्यावर नक्कीच होऊ शकतो. म्हणून चांगले बोला. खोटे कौतुक किंवा खोटी प्रशंसा नाही, तर जगायला बळ देणारे दोन शब्द पुरेसे असतात. 

'चौथे रत्न, हृदय. तुमच्या हृदयात दुसऱ्यांबद्दल केवळ मत्सर, राग, द्वेष आणि अहंभाव भरलेला आहे. या गोष्टी हृदयाला उपयोगाच्या नाहीत. उलट त्या हानिकारक आहेत. त्या काढून टाकून हृदयाची जागा प्रेमाने भरून टाका. ज्याचे हृदय प्रेमाने, आनंदाने भरलेले असेल, तोच दुसऱ्याला प्रेम आणि आनंद देऊ शकेल.'

'पाचवे रत्न, शरीर. आपल्याला मिळालेल्या सुदृढ शरीराचा वापर केवळ स्वतः साठी न करता दुसऱ्यांसाठी सुद्धा करा. जेव्हा तुम्ही लोकोपयोगी ठराल, तेव्हा त्या जाणिवेने तुम्ही अधिकाधिक समृद्ध व्हाल. ही जाणीव म्हणजे खरी श्रीमंती! आता मला सांग, ही पाच रत्न तुझ्याजवळ असताना तू गरीब आहेस की श्रीमंत?'

शिष्य उत्तरला, 'भगवान माझ्या श्रीमंतीची तुम्ही मला जाणीव करून दिलीत. या रत्नांचा मी सदुपयोग करेन आणि दुसऱ्यांनाही त्याची जाणीव करून देईन. सगळ्यांना या रत्नांची ओळख झाली आणि प्रत्येकाने त्याचा योग्य वापर करायचा ठरवला, तर हे जगच किती श्रीमंत होईल नाही?'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी