शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Nirjala Ekadashi 2022: दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्यासाठी करा निर्जला एकादशीचे व्रत; सविस्तर माहिती वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 07:15 IST

Nirjala Ekadashi 2022:असे म्हणतात, की वर्षभरातील २३ एकादशी करता आल्या नाहीत तरी निर्जला एकादशीचे व्रत जरूर करावे. का आहे तिचे एवढे महत्त्व, चला जाणून घेऊ!

ज्येष्ठ मासातील एक महत्त्वाचे व्रत म्हणजे निर्जला एकादशी. यंदा ११ जून रोजी म्हणजे येत्या शनिवारी निर्जला एकादशी आहे. हिला 'भीमसेनी एकादशी' असेही म्हणतात. यासंबंधीची एक कथा आहे.

भीमाला भूक आवरत नसे. साहजिकच इच्छा असूनही तो उपवास करू शकत नव्हता. त्यामुळे खिन्न होऊन एके दिवशी त्याने आपली ही व्यथा व्यासांना सांगून उपाय विचारला. त्यावेळेस व्यासांनी त्याला `निर्जला एकादशी' चे व्रत करण्याचा सल्ला दिल. ही एकच एकादशी केल्याने इतर तेवीस एकादशी केल्याचे फळ मिळते. त्याप्रमाणे भीमाने ही एकादशी आनंदाने आणि भक्तीपूर्वक केली. 

गुजरातमध्ये या एकादशीला भीम एकादशी असे दुसरे नावही प्रचलित आहे. तशीच आणखीन एक प्रथाही गुजराथी मंडळी पाळतात. ती म्हणजे अजीर्ण-अपच या शारीरिक व्याधीपासून मुक्ती मिळावी, म्हणून या दिवशी उपास करतात. शिवाय भीमाचे नाव घेऊन दिवसभरात शक्य होईल तेवढ्या वेळा पोटावरून हात फिरवायचा. मात्र ही प्रथा केवळ गुजरातपुरतीच मर्यादित आहे. 

संपूर्ण वर्षातील दुसरी कोणतीही एकादशी न करता या एकादशीचे व्रत विधीपूर्वक केले, तर सर्व एकादशीचे पुण्य लाभते, अशी श्रद्धा आजही टिवूâन आहे. या दिवशी आचमनाखेरीज काहीही न खातापिता उपास करावा. रात्री विष्णूच्या मूर्तीची विधिवत पूजा करावी. गायन, नृत्य करून त्या रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णूंची यथासांग पूजा करून, गरजूंना दान दक्षिण देऊन मग उपास सोडावा. हे व्रत केल्याने दीर्घायुष्य व सुदृढ आरोग्य प्राप्त होत़े 

आजच्या धकाधकीच्या जीवनात, अनेक व्याधींनी ग्रस्त असल्यामुळे सगळ्यांनाच हे व्रत शक्य होईल असे नाही. त्यामुळे पूर्ण अन्न पाण्याचा त्याग करून नाही, तर निदान फक्त फलाहार करून हे व्रत करण्याचा प्रयत्न करावा. 

निर्जला एकादशीचा आदला दिवस हा गंगादशहरा चा आणि दुसरा दिवस निर्जला एकादशीचा. या दोन्ही दिवसांत पाण्याचे महत्त्व अधोरेखित करून आपल्या पूर्वजांनी निसर्गाशी सांगड घालून दिली आहे. जलाचे महत्त्व जाणून त्याची पूजा करावी आणि निसर्गासमोर नतमस्तक व्हावे, हा त्यामागचा शुद्ध भाव आहे.  

असे म्हणतात, की ज्याने मैलोनमैल पायी चालून पाणी भरण्याचा सराव केला असेल, त्याच्यापेक्षा जास्त पाण्याची किंमत दुसरे कोणीही समजू शकत नाही. निसर्गाने सहल उपलब्ध करून दिलेले पाणी हे नासवण्यासाठी नसून त्याची बचत करणे हे आपले कर्तव्य आहे, याचे भान करून देणाऱ्या या दोन तिथी आहेत. ऐन पावसाळ्यात या व्रतांचे आयोजन हे समाजभान राखण्याच्या दृष्टीनेच केले असावे. 

या औचित्याने गरजू लोकांना जलदानाच्या निमित्ताने छत्री, ताडपत्री, रेनकोट, उबदार कपडे यांचे दानही करता येईल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हीच तर आपल्या धर्माची खरी शिकवण आहे...!