शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

Navratri 2021 : विवेक सांभाळून विजय मिळवायचा असेल तर देवी ब्रह्मचारिणीची करा आराधना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 16:48 IST

Navratri 2021 : ब्रह्मचारिणी शक्तीचे स्थान आपल्या शरीरात स्वाधिष्ठान चक्रात आहे व त्या चक्रापाशी जाणीवा नेणीवा नेऊन या शक्तीची साधना केली तर अध्यात्मिकतेची साधना होते व सिद्धिप्राप्त होते. 

>> आचार्य विदुला शेंडे

आश्विन शुद्ध द्वितीया म्हणजेच घटाची दुसरी माळ. या दिवशी देवीचे दुसरे रूप `ब्रह्मचारिणी' याची आराधना, साधना केली जाते. ब्रह्म तत्व म्हणजेच वेद व तपाचरण करणे होय. कोणतीही तपस्या करण्यासाठी संयम लागतो व संयामाने इंद्रियनिग्रह होतो व पुन:पुन्हा स्वाध्यायाने, मननाने तपसिद्धी होते. विजय प्राप्त होतो. तपाचरण करणाऱ्याच्या हातात कोणतेही आयुध नसते या प्रमाणेच या देवीच्या हातात कोणतेही आयुध नसते. या देवीच्या एका हातात कमंडलू व दुसऱ्या हातात जपाची अक्षय माला असते व गळ्यात रुद्राक्षाची माळ असते. 

नारदांनी सांगितल्याप्रमाणे या देवीने शंकर प्राप्तीसाठी उग्र तपश्चर्या केली. फळे व नंतर खाली पडलेली बिल्वपत्रे खाऊन तिने तपश्चर्या केली व नंतर तिने ती पाने खाणेही सोडून दिले तेव्हा तिला `अपर्णा' हे नाव मिळाले. तिचे तप चालू असताना प्रचंडासुराने आपल्या सैन्यासह सगळीकडे हल्ला केला होता व तो तिच्यापर्यंत पोहोचणार तोच लक्ष्मी व सरस्वती तिच्या मदतीला आल्या. कारण तिची तपश्चर्या पूर्ण व्हायची होती. पण त्या दोघींना हे असूर मारले जाईनात. तेव्हा या धामधूमीत तिच्या कमंडलूतील पाणी सांडले व त्याच्या सामथ्र्यामुळे महापूर येऊन प्रचंडासुराचे सर्व सैन्य वाहून मेले व ब्रह्मचारिणीने अर्धे नेत्र उघडले त्या तप:सामर्थ्याने त्यांच्या ज्वाळात प्रचंडासूर जळून मेला. 

ब्रह्मचारिणी शक्तीचे स्थान आपल्या शरीरात स्वाधिष्ठान चक्रात आहे व त्या चक्रापाशी जाणीवा नेणीवा नेऊन या शक्तीची साधना केली तर अध्यात्मिकतेची साधना होते व सिद्धिप्राप्त होते. 

ब्रह्मचारिणी ही देवी पायांवर उभी आहे कारण तिला तपाचरण  करायचे आहे. ब्रह्मचारिणी देवीच्या भक्तीने परिपक्वता, ज्ञानप्राप्ती होते व ज्ञानानुसार आचरण म्हणजेच विवेक. कुठे काय, का, केव्हा व कसे करावे, अशा ज्ञानी विवेकाची आजच्या जगात तर खूपच आवश्यकता आहे. हेच खरे संरक्षक कवच आहे. 

ब्रह्माचरण म्हणजेच नीती नियमांचे पालन. त्यामुळेच या शक्तीच्या उपासनेने सर्जनशीलता निरोगी जीवन, इमानदार व नैतिक चारित्र्य व आनंददायी आयुष्य होते. ब्रह्म तत्त्व हे सगळ्या चराचरात राहिलेले म्हणजेच इन्फीनिटी आहे. `ब्रह्म चारयितुं शीलं यस्य: सा ब्रह्मचारिणी' या शक्तीमुळे आपले मनोदौर्बल्य जाते. विविध क्षमता जागृत होतात, उदात्तता येते व समरसतेकडे प्रवास चालू होतो. 

या शक्तीसाधनेचा बीजमंत्र अगदी सोपा व सहज म्हणता येण्यासारखा आहे. ऊँ ऐं ऱ्हीम क्लीं चामुण्डायै विचैऊँ ब्रह्मचारिणी रुपेण संस्थित:नम:स्तस्यै नम:स्तस्यै नम:स्तस्यै नमो नम:।

स्वाधिष्ठान चक्र जिथे ब्रह्मचारिणी शक्तीची आराधना केली जाते, ते सृजन, नवनिर्मिती, नवज्ञान, प्रज्ञा, नवकल्पनांचे स्थान आहे. ज्यामुळे स्वत:च्या खऱ्या ओळखीकडे, मी कोण? हे फक्त उपभोगासाठी नाही तर त्यागासाठी, दानासाठी व ब्रह्म साधनेसाठी आहे, हे समजते. योग्य वयात, योग्य वेळी, योग्य गोष्टी करून मानव निर्मोही होतो. 

Navratri 2021 : शरीर व मन कणखर, खंबीर करायचे असेल, तर 'अशी' करा देवी शैलपुत्रीची साधना!

या शक्तीचे तत्त्व जलतत्त्व आहे. जे सगळ्यांना आपल्यात मिसळून घेऊन स्वत:सारखे स्वच्छ, निर्मळ बनवते व त्रिगुणाकडून निर्गुणाकडे वाटचाल होते. अहंकार नष्ट झाल्यामुळे विकार नाहीसे होतात व माणूस आत्मोन्नतीकडे जातो. जीवनातली खरी समृद्धी कळते व आयुष्य आनंदमय होते. आपण सगळे जण ही साधना, शक्ती जागरण करूयात आणि निर्मोही होऊयात.

टॅग्स :Navratriनवरात्री