शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

Navratri 2021 : परिपूर्ण आत्मसमर्पण करणाऱ्याला देवी कात्यायनी दर्शन देतेच; वाचा तिचा महिमा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 12:37 IST

Navratri 2021 : ही शक्ती साधकाला विज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून पारलौकिक ज्ञानाकडे घेऊन जायला साधकाला मदत करते.

>> आचार्य विदुला शेंडे

या देवी सर्वभुतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः ||

अश्विन शुद्ध षष्टी म्हणजे घटाची सहावी माळ, या दिवशी दुर्गेचे कात्यायानी देवीम्हणून पूजन केले जाते. परिपूर्ण आत्मज्ञान समर्पण करणाऱ्याला ही देवी नक्कीच दर्शन देते, या देवीचे शक्तीस्थान हे "आज्ञाचक्र". जे दोन भुवयांमध्ये अंतस्थ खोलवर आहे. यामुळे योग साधनेत या शक्ती आराधनेला खूप महत्व आहे.

कात्यायानीहे नाव या शक्तिरूपाला का दिले याची पुराणात एक कथा आहे. कत नावाचे ऋषी त्यांना कात्य नावाचा पुत्र व या कात्या च्या गोत्रात , कात्यायनाने जन्म घेतला व त्याने जगन्माता पार्वतीची आराधना केली, आणि देवीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली . आणि ही पराम्बा महिशासुराच्या विनाशासाठी ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या तेजामधून उत्पन्न झाली तिची कात्यायनाने सप्तमी-अष्टमी आणि नवमी अशी तीन दिवस पूजा केली आणि दहाव्या दिवशी तिने महिशासूर राक्षसाचा वध केला. कात्यायनानेतिची पूजा केली म्हणूनसुद्धा तिला कात्यायानी देवीअसे नाव पडले.

या शक्तीची पूजा कालिंदीच्या तीरी ब्रज गोपिकांनी श्रीकृष्णाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी केली म्हणून तिला ब्रज मंडळाची अधिष्ठात्री देवी असेही म्हणतात. अत्यंत तेजपपुंज , दैदिप्यमान असे तेज असलेली ही चतुर्भूजु देवी आहे. जिच्या उजव्या वरच्या हाताची अभय मुद्रा व खालच्या हाताची वरदमुद्रा व डाव्या वरील हातातील तलवार व खालच्या हातात कमळ आहे.

या देवीचे विज्ञान युगात खूप महत्व आहे. कारण ही संशोधनाची देवता आहे. त्यामुळे साधक आत्मसंशोधन करून आपल्या गंतव्य स्थानाकडे ध्येयाकडे वाटचाल करतो..कात्यायानी शक्तीच्या आराधनेने भक्तांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष सरळपणे प्राप्त होतात.या भूलोकात राहून साधक अलौकिक, तेजस्वी, दिसू लागतो कारण ही शक्ती अंतर्गत जागृतीने भक्ताला " स्व " च्या संशोधनाकडे नेते व आत्मोन्नतीची जाणीव होते..

या शक्तीचे स्थान आज्ञाचक्र असल्यामुळे साधकांमध्ये समत्व येण्यासाठी मदत होते. प्रत्येक गोष्ट साक्षीभावाने पाहण्यास साधक उद्युक्त होतो. सगळ्या गोष्टींचा मुलामा भासमान रूप लक्षात घेऊन खरे रूप प्रकट होते मग ती व्यक्ती किंवा वस्तू काहीही असू देत साधकाच्या मनातील भय, शोक, मनःस्ताप नष्ट होऊन जन्म जन्मतारीचे कर्मभोग नष्ट होतात असे ऋषी मुनींनी सांगितले आहे. दिल्लीमध्ये छत्तरपूर या ठिकाणी या देवीचे मंदिर आहे.

ही शक्ती साधकाला विज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून पारलौकिक ज्ञानाकडे घेऊन जायला साधकाला मदत करते. त्यामुळे या भक्तांमध्ये दूरदर्शीपणा आणि काळाची पावले ओळखण्याची ताकद निर्माण होते. या कात्यायानी देवी  शक्तीचा बीजमंत्र व श्लोक पुढील प्रमाणे-

मंत्र - ऊँ क्लिं श्रीं त्रिनेत्राय नम:

 श्लोक- कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकुटोज्जवलंस्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते।

टॅग्स :Navratriनवरात्री