शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Narsimha Navratri 2024: आजपासून सुरु होत आहे नृसिंह नवरात्र; जाणून घ्या अनोख्या नृसिंह मंदिराबद्दल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 07:00 IST

Narsimha Navratri 2024: नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते.

>> सर्वेश फडणवीस

ॐ उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् । 

'वाकाटक' म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक इतिहासात क्रांती घडवणारे प्राचीन राजघराणे होते. या राजघराण्याच्या दोन शाखा होत्या. एक नंदिवर्धन अर्थात आजचे नगरधन, नागपूर आणि दुसरी शाखा वत्सगुल्म अर्थात आजचे वाशीम. पूर्व विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या भागावर याच नंदिवर्धन शाखेने राज्य केले. ही शाखा तशी फार प्रबळ होती. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मंदिर बांधणारे हे घराणे होते. 

वाकाटक यांच्या राज्यात संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगाणा आणि छत्तीसगडचे राज्यदेखील होते. या शाखेच्या ‘रुद्रसेन' नावाच्या राजाबरोबर 'प्रभावतीगुप्ता' चे लग्न झाले. भारताला सुवर्णयुग दाखवणारे राजघराणे म्हणजे गुप्त घराणे होते आणि प्रभावतीगुप्त याच घराण्यातील होती. वाकाटक राजघराणे हा शैवधर्माचे आचरण करणारा तर गुप्त घराणे वैष्णवाचे आचरण करणारे होते. परंतु वाकाटकांच्या राजघराण्यात प्रवेश करूनही प्रभावतीगुप्तने अखेरपर्यंत वैष्णवधर्माचे पालन केले. तिला तीचे धार्मिक स्वातंत्र्य वाकाटक राजवंशाने देऊ केले होते. इसवी सन 'चौथ्या' शतकाच्या अखेरची ही घटना,पण आधुनिक काळापेक्षाही प्रगत विचारसरणीचे लक्षण यातून दिसून जाते.  

पुढे काही काळाने तिचा नवरा 'रुद्रसेन' मरण पावला. तेव्हा प्रभावतीने सारा राज्यकारभार दहा वर्षे एकहाती चालवला. हा राज्यकारभार करण्यासाठी तीने मातीचा शिक्का करून घेतला होता, ज्यावर "श्री प्रभावतीगुप्तयाः" अशी ब्राम्ही लिपीमधील अक्षरे कोरलेली आढळतात. पतीच्या निधनानंतर राजकारभार पाहण्याची ही परंपरा फार प्राचीन आहे. महाराष्ट्रात प्रभावशाली महिला शासक म्हणून 'प्रभावतीगुप्त' ठळकपणे आपल्या नजरेस सहज भरतात. याच प्रभावतीगुप्त राणीने आपल्या कार्यकाळात केवल नृसिंह मंदिराची स्थापना केली. 

रामटेक आणि मनसर या दोन ठिकाणी वाकाटकांच्या धार्मिक विविधतेची झलक आपल्याला पाहावयास मिळते. रामटेक येथे असणारे केवल नृसिंह मंदिर, रुद्र नृसिंह मंदिर, वराह मंदिर, त्रिविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातील आद्य- वैष्णवांचे ठळक उदाहरण म्हणून पाहीले जातात. नृसिंहाची आपण अनेक प्रकारची शिल्पे पाहिली असतील पण केवल नृसिंह हे त्यातील एक दुर्मिळ शिल्प आहे. केवल नृसिंह मंदिराचा इतिहास समोर येण्यामागेही एक कथा दडलेली आहे. १९८२-८३ मध्ये डॉ. अरविंद जामखेडकर आणि त्यांची संपूर्ण टीम रामटेक येथे असणाऱ्या मंदिरांची साफसफाई करण्यासाठी पोहोचले. खरंतर नागपूरकर भोसले यांच्या काळात बऱ्याच मंदिरांचा जिर्णोध्दार झाला आहे. याच काळातील नृसिंह मंदिरातील अर्थात लोकमान्यता असलेल्या मारुती मंदिराच्या भिंतीवरील चुन्याचा लेप काढत असताना गर्भगृहात दोन आणि मंडपात एक, असे तीन प्राचीन शिलालेख आढळून आले.

चौथ्या शतकात उत्तर भारतात गुप्त नृपती अर्थात समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, कुमारगुप्त राज्य करीत होते. त्याच काळात विदर्भात वाकाटक राजे प्रबरसेन, रुद्रसेन, पृथ्वीसेन, दिवाकरसेन राज्य करीत होते. एका अर्थाने हा काळ १६०० वर्षे इतका प्राचीन आहे. या काळात मंदिरे कशी बांधत असत. निदान त्याची रचना कशी असायची हे ही आपल्याला रामटेकच्या केवल नृसिंह मंदिरावरून कळते. त्या काळाची मंदिरे आजच्या मंदिरासारखी नव्हती, तर मागे चार स्तंभ त्यावर सपाट चौकोनी शिळा व त्यासमोर पूजनीय मूर्तीचे गर्भगृहातील स्थान असे त्याचे स्वरुप होते. नुकताच रामटेक येथील या केवल नृसिंह मंदिरात जाऊन आलो आणि 'कोण होते वाकाटक' या डॉ. अरविंद जामखेडकर सरांच्या पुस्तकातून याबद्दल अधिक माहिती मिळाली. 

१५०० वर्षांपूर्वीच्या केवल नृसिंह मंदिरातील पूजनीय प्रतिमेस केवलनृसिंह का म्हणतात, तर येथे भगवान नृसिंह एकटे आहेत. साधारण नृसिंह प्रतिमा म्हटली की, नृसिंह भगवान आपल्या मांडीवर हिरण्यकश्यपु राजास घेवून आपल्या तीक्ष्ण नखांनी त्याचे पोट फाडत आहे, असे दृश्य असते. बाजूला भक्त प्रल्हाद व त्यांची माता कयाधू असते. किंवा बऱ्यापैकी मंदिरात श्री नृसिंह आणि त्यांच्या मांडीवर लक्ष्मी आपल्याला दिसते पण येथे नृसिंह प्रतिमा लाल पाषाणाची असून प्रतिमेची उंची साधारणपणे ८ फूट आहे व ती स्वतंत्र पाषाणात कोरलेली असून द्विभुज आहे. 

केवल नृसिंह मंदिराचे गर्भगृह साधारणपणे १० फूट बाय १२ फूट रुंद असून ७ फूट उंच आहे पण या मंदिरास शिखर नाही. सपाट शिळा आहे. श्री प्रतिमेचा भाव रौद्र असून प्रतिमा बलदंड, प्रमाणबद्ध व सुंदर आहे. प्रतिमेच्या भोवती प्रदक्षिणा पथ असून आज मात्र गाभाऱ्यात जाता येत नाही.  कारण महाराष्ट्र शासनाने प्रवेशद्वारास कुलूप लावलेले आहे आणि हे मंदिर शासनाचे संरक्षित स्मारक आहे. गर्भगृहाच्या समोर प्रवेशद्वार असून त्यानंतर चार स्तंभांवर असलेला सभामंडप आहे. सभामंडपाभोवती दगडाचीच भिंत आहे. स्तंभ वरच्या अंगास कोरीव असून छताची शिळा सपाट आहे. चार खांब आणि त्यावरील शिळा व गर्भगृह म्हणजेच तत्कालीन भारतातील मंदिर स्थापत्य होय. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर मात्र इ.स. च्या १२-१३ व्या शतकातील यादवकालीन देवनागरी लिपीतील शिलालेख आहे. सभामंडपाभोवती ४ फुटांचा व्हरांडा आहे. या प्राचीन मंदिरास भेट देणारे भारतीयांपेक्षा पश्चिमात्य इंग्लंड, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया जास्त आहे. 

खरंतर ४ -५ व्या शतकापर्यंत मध्य भारतावर जवळ जवळ २५० वर्षे राज्य केलेल्या ह्या साम्राज्याचे स्थापत्यकलेतील योगदान उलगडले आणि समोर आला एक वैभवशाली इतिहास आज ऊन - वारा - पाऊस याची तमा न बाळगता वैभवाने उभा आहे. हा ऐतिहासिक वारसा प्रत्येकाने प्रत्यक्ष आवर्जून बघण्यासारखा आहे.

टॅग्स :Templeमंदिर