शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Mental Health: 'या' गोष्टी एकदा का आत्मसात केल्या, की मनःशांती कधीच ढळणार नाही याची गॅरेंटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 07:00 IST

Mental Health: सद्यस्थितीत मानसिक आजार झपाट्याने वाढत आहेत, त्यावर मात करण्यासाठी जाणून घ्या मनःशांतीचे उपाय... 

सद्यस्थितीत प्रत्येक व्यक्ती तणावग्रस्त आहे. तणाव त्यांना येतो, जे शरीराला, मनाला थोडीही विश्रांती देत नाहीत. स्वत:ला सतत कामात गुंतवून घेतात. कामात असणे केव्हाही चांगले, परंतु कामाचा अतिरिक्त ताण मनाला त्रासदायक ठरतो. 

कोणतेही काम करताना आनंद मिळत असेल, तर त्या कामाचा ताण येत नाही. याउलट ताण घेऊन केलेल्या कामातून कधीच आनंद मिळू शकत नाही. ज्ञान आणि ध्यान, काम आणि आराम हे जीवनरथाचे दोन चक्र आहेत. पैकी एकही चाक निकामी झाले, तर जीवनरथ चालणार नाही. परंतु, हे लक्षात न घेता अलीकडे एका रथावर जीवनरथ ओढण्याचा लोकांचा अट्टहास सुरू आहे. 

चंचल मनाला विषयात गुंतवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु अस्थिर मनाला शांत करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सगळे काही ठीक आहे, सुरळीत सुरु आहे, हे दाखवण्यासाठी लोक मुखवटे धारण करतात. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असते. 

एकदा एक मनुष्य अशांत मनावर तोडगा काढण्यासाठी डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला विविध उपाय सांगितले. संगीत ऐक, पुस्तक वाच, चित्रपट बघ. तो मनुष्य म्हणाला, मी सगळे उपाय करून पाहिले, तरी मन रमेना. त्यावर डॉक्टर म्हणाले, जवळच्या नाट्यगृहात एक छान हास्यविनोदाचा कार्यक्रम सुरू आहे असे ऐकले आहे, तो ऐकून या, अनेक लोकांना त्याचा फायदा झाला असे ऐकले. तुम्हीही जाऊन या, तुम्हाला बरे वाटेल.' यावर तो मनुष्य डॉक्टरांना म्हणाला, `डॉक्टर, तो कार्यक्रम मीच सादर करतो.' तात्पर्य, हसणारे चेहरे आनंदी असतीलच असे नाही. म्हणून मन शांत असणे सर्वात महत्त्वाचे आहे. 

सद्यस्थितीत जगभरात सर्वात जास्त रुग्ण असतील, तर ते मानसकि आजाराचे. या आजारावर ठराविक औषधेही नाहीत. मानसोपचार तज्ज्ञ समजूत काढू शकतील, परंतु, मनाची जडण घडण ही प्रत्येकाला स्वत:लाच करावी लागते आणि ती केलीही पाहिजे. शरीर स्वास्थ्याची आपण काळजी घेतो, तशी मन:स्वास्थ्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

कोणतेही कारण आपले मन अस्थिर करू शकत नाही, जोवर आपण ते मनाला लावून घेत नाही. मात्र, बारीक सारीक गोष्टींचा विचार मन:शांती हिरावून घेऊ शकतो. मन अस्थिर तेव्हाच होते, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते. परंतु, दर वेळी आपल्या मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत, हे आपल्यालाही माहित असते. तरीदेखील आपण अकारण अपेक्षा ठेवतो आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत, की खेद करतो. 

मनशांती शोधायला जाऊ नका. मन शांतच असते. एखाद्या नदीच्या डोहाप्रमाणे. आपणच त्यात खडा टाकून त्यात अस्थिरता निर्माण करतो. ती शांतता अबाधित ठेवण्यासाठी, कोणत्या विषयांना किती महत्त्व द्यायचे, कोणत्या आठवणी किती काळ मनात ठेवायच्या, कोणाचे बोलणे मनाला लावून घ्यायचे या गोष्टींची मनाशी आखणी करायला हवी. तरच, मन कायमस्वरूपी शांत आणि आनंदी राहू शकेल.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य