शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारी दर्शन घेऊया काशी येथील अन्नपूर्णा मातेचं; जाणून घ्या तिचा महिमा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 07:00 IST

Margashirsha Guruvar 2023: काशी क्षेत्र हे भगवान विष्णूंचे पहिले वसतीस्थान आणि तिथेच माता अन्नपूर्णेचेही अधिष्ठान; वाचा सविस्तर माहिती आणि महती!

काशी या धार्मिक शहराची गणना जगातील सर्वात जुन्या शहरांमध्ये केली जाते. या शहराचे वर्णन सनातन, बौद्ध आणि जैन धर्माच्या ग्रंथांमध्ये आढळते. सनातन धर्मग्रंथानुसार, दैवी काळातील हे भगवान विष्णूचे पहिले वसती स्थान होते. नंतर जेव्हा भगवान शिव ब्रह्मदेवांवर क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्माजींचे पाचवे मस्तक धडापासून तोडले, मात्र ते मस्तक शिवाच्या तळहाताला चिकटून राहिले. शिवाच्या अनेक प्रयत्नांनंतरही ब्रह्माजींचे मस्तक शिवाच्या तळहाताला चिकटून राहिले. 

जेव्हा भगवान शिव काशीला आले तेव्हा ब्रह्माजींचे मस्तक त्यांच्या तळहातापासून वेगळे झाले. त्यावेळी भगवान शिवांना ब्रह्मदेवाच्या वधातून मुक्ती मिळाली. हे जाणून भगवान शिव अतिशय प्रसन्न झाले, त्यांनी काशी नगरी स्थायिक होण्याच्या इच्छेने भगवान विष्णूंना काशी नगरीची मागणी केली. तेव्हापासून या शहराला भोले बाबांची नगरी म्हटले जाऊ लागले. काशीमध्ये शिवमंदिराची स्थापना प्राचीन काळापासून आहे. तेथील काशी विश्वनाथ मंदिर प्रचलित आहे. काशी विश्वनाथ मंदिरापासून काही अंतरावर माता अन्नपूर्णाचे मंदिर आहे. त्या मंदिराबद्दलही सविस्तर जाणून घेऊ. 

अन्नपूर्णा मातेची कथा 

अशी आख्यायिका आहे, की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे पृथ्वीवर हाहाकार माजला. (सद्यस्थितीतील अन्न नासाडी पाहता शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काळात जगाला पुनश्च अन्न तुटवड्याच्या आपत्तीतून जावे लागेल.) त्यावेळी पृथ्वीवरील लोकांनी त्रिदेवाची पूजा करून त्यांना अन्न टंचाईची माहिती दिली. यानंतर आदिशक्ती माता पार्वती आणि भगवान शिव पृथ्वीवर काशी क्षेत्री अवतरले. सृष्टीवर जगणारे लोक दुःखी असल्याचे पाहून माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले आणि भगवान शंकराला अन्नदान केले. त्याच वेळी, भगवान शिवाने पृथ्वीवरील लोकांमध्ये अन्न वाटप केले. पुढे या धान्याचा वापर शेतीत होऊ लागला. मग अन्न संकट संपले.

अन्नपूर्णा माता मंदिर 

बाबांची नगरी असलेल्या काशी येथील विश्वनाथ मंदिरापासून काही अंतरावर माता अन्नपूर्णा मंदिर आहे. या मंदिरात माता अन्नपूर्णाची पूजा केली जाते. दररोज अन्नपूर्णेची पूजा केल्याने घरात प्रतिकूल परिस्थितीतही अन्नाची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. 

अन्नाचा आदर आणि काळजी घेतली पाहिजे असे शास्त्रात सांगितले आहे. अन्नाचा अपमान करू नये. तसेच जेवढी भूक लागते तेवढेच अन्न द्यावे. अन्न कधीही फेकून देऊ नये. अन्न वाया गेल्याने आई अन्नपूर्णा रागावते. यामुळे घरातील लक्ष्मीही निघून जाते आणि घरात गरिबी राहू लागते. एकवेळ काशी क्षेत्री जाऊन अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेता आले नाही तरी चालेल, पण दैनंदिन जीवनात अन्नाची नासाडी करू नका. कारण त्यातही अन्नपूर्णा मातेचा वास आहे. ती रुष्ट होईल अशी कोणतीही कृती करू नका.  

या मंदिरात अनेक अद्वितीय प्रतिमा आहेत, ज्यामध्ये माता अन्नपूर्णा स्वयंपाकघरात आहे. त्याच वेळी, अनेक पुतळे अंगणात आहेत. त्यांच्यामध्ये माता काली, पार्वती, शिव यासह इतर अनेक देवता आहेत. दरवर्षी अन्नकूट उत्सवात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर बाबा विश्वनाथांचे दररोज दर्शन घेतल्यानंतर भाविक मातेच्या दर्शनासाठी नक्कीच जातात. 

टॅग्स :Templeमंदिर