शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

Margashirsha Guruvar 2022: मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त घेऊ अन्नपूर्णेचे दर्शन, तिच्या कृपेशिवाय महालक्ष्मीदेखील होणार नाही प्रसन्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:58 IST

Margashirsha Guruvar 2022: मार्गशीर्ष गुरुवारी आपण महालक्ष्मीचे व्रत करतोच, त्याबरोबर अन्नदात्री अन्नपूर्णेचे महात्म्यही जाणून घेऊया. 

काशी या धार्मिक शहराची गणना जगातील सर्वात जुन्या शहरांमध्ये केली जाते. या शहराचे वर्णन सनातन, बौद्ध आणि जैन धर्माच्या ग्रंथांमध्ये आढळते. सनातन धर्मग्रंथानुसार, दैवी काळातील हे भगवान विष्णूचे पहिले वसती स्थान होते. नंतर जेव्हा भगवान शिव ब्रह्मदेवांवर क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्माजींचे पाचवे मस्तक धडापासून तोडले, मात्र ते मस्तक शिवाच्या तळहाताला चिकटून राहिले. शिवाच्या अनेक प्रयत्नांनंतरही ब्रह्माजींचे मस्तक शिवाच्या तळहाताला चिकटून राहिले. 

जेव्हा भगवान शिव काशीला आले तेव्हा ब्रह्माजींचे मस्तक त्यांच्या तळहातापासून वेगळे झाले. त्यावेळी भगवान शिवांना ब्रह्मदेवाच्या वधातून मुक्ती मिळाली. हे जाणून भगवान शिव अतिशय प्रसन्न झाले, त्यांनी काशी नगरी स्थायिक होण्याच्या इच्छेने भगवान विष्णूंना काशी नगरीची मागणी केली. तेव्हापासून या शहराला भोले बाबांची नगरी म्हटले जाऊ लागले. काशीमध्ये शिवमंदिराची स्थापना प्राचीन काळापासून आहे. तेथील काशी विश्वनाथ मंदिर प्रचलित आहे. काशी विश्वनाथ मंदिरापासून काही अंतरावर माता अन्नपूर्णाचे मंदिर आहे. त्या मंदिराबद्दलही सविस्तर जाणून घेऊ. 

अन्नपूर्णा मातेची कथा 

अशी आख्यायिका आहे, की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे पृथ्वीवर हाहाकार माजला. (सद्यस्थितीतील अन्न नासाडी पाहता शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काळात जगाला पुनश्च अन्न तुटवड्याच्या आपत्तीतून जावे लागेल.) त्यावेळी पृथ्वीवरील लोकांनी त्रिदेवाची पूजा करून त्यांना अन्न टंचाईची माहिती दिली. यानंतर आदिशक्ती माता पार्वती आणि भगवान शिव पृथ्वीवर काशी क्षेत्री अवतरले. सृष्टीवर जगणारे लोक दुःखी असल्याचे पाहून माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले आणि भगवान शंकराला अन्नदान केले. त्याच वेळी, भगवान शिवाने पृथ्वीवरील लोकांमध्ये अन्न वाटप केले. पुढे या धान्याचा वापर शेतीत होऊ लागला. मग अन्न संकट संपले.

अन्नपूर्णा माता मंदिर 

बाबांची नगरी असलेल्या काशी येथील विश्वनाथ मंदिरापासून काही अंतरावर माता अन्नपूर्णा मंदिर आहे. या मंदिरात माता अन्नपूर्णाची पूजा केली जाते. दररोज अन्नपूर्णेची पूजा केल्याने घरात प्रतिकूल परिस्थितीतही अन्नाची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. 

अन्नाचा आदर आणि काळजी घेतली पाहिजे असे शास्त्रात सांगितले आहे. अन्नाचा अपमान करू नये. तसेच जेवढी भूक लागते तेवढेच अन्न द्यावे. अन्न कधीही फेकून देऊ नये. अन्न वाया गेल्याने आई अन्नपूर्णा रागावते. यामुळे घरातील लक्ष्मीही निघून जाते आणि घरात गरिबी राहू लागते. एकवेळ काशी क्षेत्री जाऊन अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेता आले नाही तरी चालेल, पण दैनंदिन जीवनात अन्नाची नासाडी करू नका. कारण त्यातही अन्नपूर्णा मातेचा वास आहे. ती रुष्ट होईल अशी कोणतीही कृती करू नका.  

या मंदिरात अनेक अद्वितीय प्रतिमा आहेत, ज्यामध्ये माता अन्नपूर्णा स्वयंपाकघरात आहे. त्याच वेळी, अनेक पुतळे अंगणात आहेत. त्यांच्यामध्ये माता काली, पार्वती, शिव यासह इतर अनेक देवता आहेत. दरवर्षी अन्नकूट उत्सवात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर बाबा विश्वनाथांचे दररोज दर्शन घेतल्यानंतर भाविक मातेच्या दर्शनासाठी नक्कीच जातात.