शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
5
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
6
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
7
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
8
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
9
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
10
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
11
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
12
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
13
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
14
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
15
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
16
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
17
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
18
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

Makarsankranti 2022 : 'एक तीळ सात जणांनी वाटून खावा' असे का म्हटले जाते, याबद्दल वाचा शास्त्रशुद्ध माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 4:03 PM

Makarsankranti 2022 : धार्मिक कार्यांमध्ये, व्रतांमध्ये नैवेद्यासाठी चणे गूळ, पुरण, पुरणपोळी, गुळपोळी असे पदार्थ आवर्जून वापरले जातात. प्रसाद म्हणून नंतर ते खाल्ले जातात. त्यामागचेही कारण जाणून घेऊ.

>>मकरंद करंदीकर 

भारतभर मकरसंक्रांतीला खास महत्व आहे. हा सण साजरा करण्याची प्रत्येक राज्यामधील तऱ्हा वेगवेगळी आहे. महाराष्ट्रात सुगड पूजन, वाण देणे, लहान मुलांचे हलव्याचे दागिने घालून तिळवण, बोरन्हाण, नवविवाहितेचे हलव्याचे दागिने घालून साजरे केले जाणारे हळदीकुंकू अशा अनेक गोष्टी मोठ्या हौसेने केल्या जातात. या सर्वांमध्ये काळ्या वस्त्राला फार महत्व असते. स्वामी अय्यप्पाचे भक्त तर काळे कपडे परिधान करूनच ४० दिवसांचे व्रत करतात. काळ्या कपड्यांमध्ये सूर्यकिरण म्हणजेच पर्यायाने उष्णता सर्वाधिक शोषली जाते. या काळात सर्वत्र खूप थंडी पडत असल्याने या उष्णतेची शरीराला खूप गरज असते. आहारातही तीळ, गूळ, ऊस, भुईमुगाच्या शेंगा इ उष्ण आणि स्निग्ध पदार्थांचा उपयोग केला जातो. 

 तिळाच्या  छोट्याशा  दाण्यात काय काय सामावले आहे हे वाचले तर थक्क व्हायला होते. तांबे, मँगेनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी १ आणि बी ६, थायामीन फॉलेट, नायासिन, झिंक, मॉलिब्डेनम, सेलेनियम तसेच  सिसॅमिन व  सिसॅमोलीन हे दोन अत्यंत महत्वाचे दुर्मीळ  पोषक घटक या तिळाच्या टीचभर दाण्यात असतात. सिसॅमिन व  सिसॅमोलीन हे लिग्नन्स म्हणून ओळखले जातात आणि ते रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करणारे तसेच इ व्हिटॅमिन देणारे आहेत.

अत्यंत महत्वाच्या  घटकयुक्त अशा तिळांमुळे मधुमेहाला प्रतिबंध करायला आणि त्याचे  नियंत्रण करायला मदत होते. या शिवाय कॅन्सरचा धोका कमी करणे, हाडांची शक्ती वाढवणे, सूज प्रतिबंध, पचनक्रिया सुधारणे, पचनक्रियेत सर्व अवयवांची शक्ती वाढविणे इत्यादी गोष्टीदेखील हा इवलासा तीळ करतो. हृदयाची कार्यक्षमता वाढविणे, उच्च रक्तदाब कमी करणे, स्नायू आणि केसांची ताकत वाढविणे, अकाली वृद्धत्व टाळणे, इत्यादी गोष्टींसाठी तीळ फार उपयुक्त आहे.  एवढासा तीळ असा अत्यंत बहुगुणी असल्यामुळेच मराठीत ' १ तीळ ७ जणांनी वाटून खावा ' ही  वरकरणी विनोदी वाटावी अशी म्हण रुजली असावी. 

गूळ हा पदार्थही तसाच गुणी आहे. गुळामध्येदेखील व्हिटॅमिन बी ६, बी १२,आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस,प्रोटीन्स, फॉलेट, सेलेनियम असा खजिना भरलेला असतो. आपल्याकडील लोकांमध्ये विशेषत: स्त्रियांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि पोषक द्रव्यांची कमतरता आढळते. म्हणूनच आपल्या अनेक धार्मिक कार्यांमध्ये, व्रतांमध्ये नैवेद्यासाठी चणे गूळ, पुरण, पुरणपोळी, गुळपोळी असे पदार्थ आवर्जून वापरले जातात. प्रसाद म्हणून नंतर ते खाल्ले जातात.

तिळगुळ घ्या, मास्क लावा आणि गोड गोड बोला !( तिळाची पोषणमूल्ये संदर्भ : प्रा. मीनाक्षी भट्टाचारजी, राईस युनिव्हर्सिटी, ह्यूस्टन,टेक्सास, यांचा लेख )

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीfoodअन्न