शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

महाशिवरात्री: रुद्राक्ष धारण करायची इच्छा आहे? राशीनुसार निवडा; लाभेल महादेवाची अपार कृपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 16:49 IST

Mahashivratri 2024: राशीनुसार रुद्राक्ष धारण केला, तर त्याचे अनेक लाभ मिळू शकतात, असे म्हटले जाते. जाणून घ्या...

Mahashivratri 2024: ०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. प्रत्येक जण आपापल्या परिने यथाशक्ती शंकराची आराधना, उपासना, नामस्मरण, व्रताचरण करत असतो. रुद्राक्ष एक शिवाचे प्रतीक आहे. रुद्राक्षाचे अनेक फायदे आहेत. केवळ धार्मिकदृष्ट्या नाही, तर आरोग्यासाठीही अनेकदा रुद्राक्ष वापरला जातो. रुद्राक्ष धारण करण्याची अनेकांची इच्छा असते. 

महाशिवरात्रीला शिवतत्त्व सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर असते. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व कैक पटीने वाढते, असे मानतात. महाशिवरात्रीला अनेक जण आवर्जून रुद्राक्ष धारण करतात किंवा रुद्राक्ष माळ गळ्यात घालतात. रुद्राक्ष धारण करण्याचे काही नियम सांगितले जातात. शास्त्रशुद्ध पद्धतीनेच रुद्राक्ष किंवा रुद्राक्ष माळ धारण करावी, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, राशीनुसार रुद्राक्ष धारण केला, तर त्याचे अनेक लाभ मिळू शकतात, असे म्हटले जाते. तुमची रास कोणती? जाणून घ्या...

तुमच्या राशीनुसार रुद्राक्ष धारण करा अन् अपार लाभ मिळवा

मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी तीन मुखी रुद्राक्ष धारण करावे, असे सांगितले जाते. महादेवांच्या शुभाशिर्वादासह अनेकविध फायदे होऊ शकतात, असे म्हटले जाते.

वृषभ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी सहा मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे भाग्यवृद्धी होऊन समस्या, अडचणी दूर होऊ शकतात, असे सांगितले जाते.

मिथुन: या राशीचा स्वामी बुध आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी चार मुखी रुद्राक्ष धारण करावे. यश-प्रगती आणि समस्या दूर होण्यासाठी लाभदायक ठरू शकतो, असे म्हटले जाते. 

कर्क: या राशीचा स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनी दोन मुखी रुद्राक्ष धारण करावा. भाग्योदयासह कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होऊ शकते, असे मानले जाते. 

सिंह: या राशीचा स्वामी सूर्य आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी बारा मुखी रुद्राक्ष धारण करावा. आव्हानांचा सामना करण्याचे बळ मिळू शकते. तसेच सूर्याची कुंडलीतील स्थिती मजबूत होऊ शकते, अशी मान्यता आहे. 

कन्या: या राशीचा स्वामी बुध आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी चार मुखी रुद्राक्ष धारण करावे. कामे सुलभतेने पार पडावीत, यश-प्रगती व्हावी, यासाठी फलदायी ठरू शकतो, असे सांगितले जाते.  

तूळ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. तूळ राशीच्या व्यक्तींनी सहा मुखी रुद्राक्ष धारण करावा. यामुळे कामातील अडचणी, समस्या दूर होऊ शकतात. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात, असे सांगितले जाते.

वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी तीन मुखी रुद्राक्ष धारण करावे, असे सांगितले जाते. महादेवांच्या शुभाशिर्वादासह धन-धान्य-वैभव लाभू शकते. कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होऊ शकते, असे म्हटले जाते.

धनु: या राशीचा स्वामी गुरु आहे. धनु राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश-प्रगती साध्य करता येऊ शकते. तसेच कुंडलीतील गुरु स्थिती मजबूत करता येऊ शकते, असे मानले जाते.

मकर: या राशीचा स्वामी शनी आहे. महादेव शनीचे आराध्य आहेत. मकर राशीच्या व्यक्तींनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावा. यशाचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. शंकरासह शनीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. शनीची कुंडलीतील स्थिती मजबूत होऊ शकते, अशी मान्यता आहे.

कुंभ: या राशीचा स्वामी शनी आहे. महादेव शनीचे आराध्य आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावा. समस्या, अडचणी दूर होऊ शकतात. महादेवांसह शनीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. शनीची कुंडलीतील स्थिती मजबूत होऊ शकते, असे सांगितले जाते.

मीन: या राशीचा स्वामी गुरु आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. रुद्राक्षाचे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. तसेच कुंडलीतील गुरु स्थिती मजबूत करता येऊ शकते, असे मानले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक