शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

जादूगाराने केली कमाल, राजाचा मुकुट झाला गहाळ; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 1:18 PM

शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचे आणि आजचा दिवस मजेत घालवायचा, हेच ध्येय ठेवायचे.

आपल्या सगळ्यांना वाईट सवय असते. आपण एकतर भूतकाळात जगतो नाहीतर भविष्यकाळाच्या काळजीत! परंतु, या दोन्ही काळातल्या गोष्टी आपल्या हातात नसतात. एक घडून गेलेली असते, दुसरी घडणार असते. त्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही. मग आपल्या हातात काय आहे? तर `आज'च्या दिवसाचा मनमुराद आनंद घेणे. एका जादूगारानेही तसेच केले आणि भविष्यातले संकट कसे घालवले, त्याची ही गोष्ट!

एका जादूगाराचा लौकिक ऐकून एका देशीचा राजा त्या जादूगाराला बोलावून घेतो. जादूगार विचार करतो, राजाने स्वत:हून बोलावून घेतले आहे, म्हणजे राजा खुश झाला, तर मोठे इनाम आपल्याला देईल. म्हणून आपल्या आजवरच्या कारकिर्दीतली कोणती सगळ्यात प्रभावी जादू करून दाखवू? या विचारात त्याचे दोन दिवस गेले. 

राजाने बोलावणे पाठवले, तो दिवस उगवला. राजाचा दरबार भरला होता. जादू बघायला सगळेच उत्सुक होते. अगदी राजाही! जादुगाराने अत्यंत कुशलतेने जादू दाखवायला सुरुवात केली. उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या आणि सर्वात शेवटची जादू त्याने केली. त्या जादूनुसार भर दरबारात राजाचा मुकुट जादूगाराने गायब केला. ते पाहून सगळे मोठमोठ्याने हसू लागले. राजाला ते अपमानास्पद वाटले. जादूगाराला हे प्रकरण अंगाशी आले. राजाने त्याला इनाम तर दूरच, पण फाशीची शिक्षा सुनावली. दोन दिवसांनी त्याला फाशी देण्यात येणार होती. 

जादूगाराने, त्याच्या बायकोने राजाकडे गयावया केली. पण उपयोग झाला नाही. जादूगार मरणाला सामोरा जाण्यासाठी सिद्ध झाला. फाशीच्या दिवशी राजा स्वत: घोड्यावर स्वार होऊन हजर झाला. जादूगार म्हणाला, `राजा, तुमचा अपमान करण्याचा माझा मानस नव्हता. तरीदेखील मी शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु माझी कला पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात होती. ती जर पूर्ण झाली असती, तर तुम्ही विराजमान झालेल्या घोड्याला पंख फुटून तुम्हालाही त्याच्यावर स्वार होऊन उडता आले असते. परंतु त्याला वर्ष लागले असते. जाऊदे, तुम्ही मला शिक्षा द्याच!'

राजाने विचार केला, एका कलाकाराला एवढी मोठी शिक्षा देणे योग्य नाही. शिवाय तो म्हणाला तसे उद्या घडले, तर इतर राजांमध्ये माझा लौकिक वाढेल. म्हणून त्याने जादूगाराला अभय दिले. जादूगार आनंदाने परत आला. त्याची बायको म्हणाली, `राजाला कशाला असा शब्द देऊन आलात? उद्या तुम्हाला जादू नाही दाखवता आली तर काय कराल?'

जादूगार म्हणाला, उद्याचे उद्या पाहू. त्या निमित्ताने मला ३६५ दिवस जगण्याची संधी मिळाली. उद्याची खात्री कोणाला आहे? मृत्यू आपल्या हातात नाही, आपण आनंदाने जगण्यावर भर देऊ.'

जादूगार म्हणाला तसेच घडले. राजाला तापाचे किरकोळ कारण झाले आणि राजाचा मृत्यू झाला. आपल्या मालकाच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या घोड्याचाही मृत्यू झाला. राजा गेला आणि घोडाही गेला. पण जादूगार बचावला. जादूगाराने तेव्हाच हातपाय गाळले असते, हार मानली असती, तर तो राजाच्या आधीच मेला असता. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचे आणि आजचा दिवस मजेत घालवायचा, हेच ध्येय ठेवायचे.