शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

धर्माचा त्याग करुन भगवंताला शरण जावे; श्रीकृष्णाने अर्जुनाला असा उपदेश का केला? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:35 IST

भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? जाणून घ्या

मासानां मार्गशीर्षोहम् असे श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत म्हटले आहे. याच मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाने ब्रह्मांडाला अमोघ, कालातीत भगवद्‌गीता दिली. गीतेचे ज्ञान अर्जुनाला दिले. भारतातील कोट्यवधी जनता अत्यंत श्रद्धेने आपापल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करत असतात. जीवन जगत असताना माणूस काही ना काही धारणा घेऊन जगत असतो. त्याप्रमाणे आचार, विचार, व्यवहार करत असतो. या सर्वांचा समावेश ईश्वराची भक्ती करतानाही होतो. मात्र, भगवंताची भक्ती कशी करावी, ती कशी असावी, याबाबत सर्वांचा कळस ठरलेल्या भगवद्गीतेत सविस्तर विवेचन केलेले दिसते. ईश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।

याचा अर्थ सर्व धर्माचा त्याग करून मला शरण या. पापातून मुक्तता करण्यासाठी आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी परमेश्वर कटीबद्द आहे, असा या श्लोकाचा साधा शब्दार्थ आहे. मात्र, धर्माचा त्याग करा म्हणजे नेमके काय करा? धर्म नावाचे जे काही आहे ते सोडून द्यायचं का? असे काही प्रश्न उपस्थित होतात. ज्यांचे अर्थ जो तो आपापल्यापरिने लावत असतो.

धर्म हा धृ धातूपासून बनलेला शब्द आहे. याचा अर्थ धारण करणे. धारयति इति धर्मः! म्हणजे जे काही चुकीचे किंवा बरोबर आपण धारण करू तो धर्म. थोडक्यात आपल्या धारणा हाच आपला धर्म असतो. धारणा चुकीच्या असू शकतात, तशा त्या बरोबरही असू शकतात. त्या असू शकतात किंवा नसूही शकतात. धारणांमध्ये गल्लत असू शकते. समजुती असू शकतात, तशा गैरसमजुतीही असू शकतात.

वास्तवात जे काही आहे, ते माझेच आहे. चांगले ही माझे आणि वाईट ही माझेच आहे. पाप ही माझेच आहे आणि पुण्य ही माझेच आहे. योग्य ही मीच आणि अयोग्य ही मीच आहे. तुम्ही धारणा बनवता, समजुती करून घेता, तथ्यांश तपासत राहता, धारणाच धारण करणे सोडून द्या, जे काही आहे ते मीच आहे, हे लक्षात घ्या. कर्ता मीच, क्रिया मीच, क्रियापद मीच आहे, हे एकदा लक्षात आले की, तुम्हांला यात टाकणारा मीच आहे आणि यातून बाहेर काढणाराही मीच आहे, हेही ध्यानात येईल. त्यामुळे कोणत्याही धारणा न ठेवता माझ्यावर प्रेम करा. जे काही कराल त्यात यश मिळवायला आणि परिणामी आयुष्य उत्तम जगायला एवढेही पुष्कळ आहे. 

टॅग्स :Mahabharatमहाभारत