शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

धर्माचा त्याग करुन भगवंताला शरण जावे; श्रीकृष्णाने अर्जुनाला असा उपदेश का केला? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:35 IST

भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? जाणून घ्या

मासानां मार्गशीर्षोहम् असे श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत म्हटले आहे. याच मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाने ब्रह्मांडाला अमोघ, कालातीत भगवद्‌गीता दिली. गीतेचे ज्ञान अर्जुनाला दिले. भारतातील कोट्यवधी जनता अत्यंत श्रद्धेने आपापल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करत असतात. जीवन जगत असताना माणूस काही ना काही धारणा घेऊन जगत असतो. त्याप्रमाणे आचार, विचार, व्यवहार करत असतो. या सर्वांचा समावेश ईश्वराची भक्ती करतानाही होतो. मात्र, भगवंताची भक्ती कशी करावी, ती कशी असावी, याबाबत सर्वांचा कळस ठरलेल्या भगवद्गीतेत सविस्तर विवेचन केलेले दिसते. ईश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।

याचा अर्थ सर्व धर्माचा त्याग करून मला शरण या. पापातून मुक्तता करण्यासाठी आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी परमेश्वर कटीबद्द आहे, असा या श्लोकाचा साधा शब्दार्थ आहे. मात्र, धर्माचा त्याग करा म्हणजे नेमके काय करा? धर्म नावाचे जे काही आहे ते सोडून द्यायचं का? असे काही प्रश्न उपस्थित होतात. ज्यांचे अर्थ जो तो आपापल्यापरिने लावत असतो.

धर्म हा धृ धातूपासून बनलेला शब्द आहे. याचा अर्थ धारण करणे. धारयति इति धर्मः! म्हणजे जे काही चुकीचे किंवा बरोबर आपण धारण करू तो धर्म. थोडक्यात आपल्या धारणा हाच आपला धर्म असतो. धारणा चुकीच्या असू शकतात, तशा त्या बरोबरही असू शकतात. त्या असू शकतात किंवा नसूही शकतात. धारणांमध्ये गल्लत असू शकते. समजुती असू शकतात, तशा गैरसमजुतीही असू शकतात.

वास्तवात जे काही आहे, ते माझेच आहे. चांगले ही माझे आणि वाईट ही माझेच आहे. पाप ही माझेच आहे आणि पुण्य ही माझेच आहे. योग्य ही मीच आणि अयोग्य ही मीच आहे. तुम्ही धारणा बनवता, समजुती करून घेता, तथ्यांश तपासत राहता, धारणाच धारण करणे सोडून द्या, जे काही आहे ते मीच आहे, हे लक्षात घ्या. कर्ता मीच, क्रिया मीच, क्रियापद मीच आहे, हे एकदा लक्षात आले की, तुम्हांला यात टाकणारा मीच आहे आणि यातून बाहेर काढणाराही मीच आहे, हेही ध्यानात येईल. त्यामुळे कोणत्याही धारणा न ठेवता माझ्यावर प्रेम करा. जे काही कराल त्यात यश मिळवायला आणि परिणामी आयुष्य उत्तम जगायला एवढेही पुष्कळ आहे. 

टॅग्स :Mahabharatमहाभारत