शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

धर्माचा त्याग करुन भगवंताला शरण जावे; श्रीकृष्णाने अर्जुनाला असा उपदेश का केला? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:35 IST

भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? जाणून घ्या

मासानां मार्गशीर्षोहम् असे श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत म्हटले आहे. याच मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाने ब्रह्मांडाला अमोघ, कालातीत भगवद्‌गीता दिली. गीतेचे ज्ञान अर्जुनाला दिले. भारतातील कोट्यवधी जनता अत्यंत श्रद्धेने आपापल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करत असतात. जीवन जगत असताना माणूस काही ना काही धारणा घेऊन जगत असतो. त्याप्रमाणे आचार, विचार, व्यवहार करत असतो. या सर्वांचा समावेश ईश्वराची भक्ती करतानाही होतो. मात्र, भगवंताची भक्ती कशी करावी, ती कशी असावी, याबाबत सर्वांचा कळस ठरलेल्या भगवद्गीतेत सविस्तर विवेचन केलेले दिसते. ईश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।

याचा अर्थ सर्व धर्माचा त्याग करून मला शरण या. पापातून मुक्तता करण्यासाठी आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी परमेश्वर कटीबद्द आहे, असा या श्लोकाचा साधा शब्दार्थ आहे. मात्र, धर्माचा त्याग करा म्हणजे नेमके काय करा? धर्म नावाचे जे काही आहे ते सोडून द्यायचं का? असे काही प्रश्न उपस्थित होतात. ज्यांचे अर्थ जो तो आपापल्यापरिने लावत असतो.

धर्म हा धृ धातूपासून बनलेला शब्द आहे. याचा अर्थ धारण करणे. धारयति इति धर्मः! म्हणजे जे काही चुकीचे किंवा बरोबर आपण धारण करू तो धर्म. थोडक्यात आपल्या धारणा हाच आपला धर्म असतो. धारणा चुकीच्या असू शकतात, तशा त्या बरोबरही असू शकतात. त्या असू शकतात किंवा नसूही शकतात. धारणांमध्ये गल्लत असू शकते. समजुती असू शकतात, तशा गैरसमजुतीही असू शकतात.

वास्तवात जे काही आहे, ते माझेच आहे. चांगले ही माझे आणि वाईट ही माझेच आहे. पाप ही माझेच आहे आणि पुण्य ही माझेच आहे. योग्य ही मीच आणि अयोग्य ही मीच आहे. तुम्ही धारणा बनवता, समजुती करून घेता, तथ्यांश तपासत राहता, धारणाच धारण करणे सोडून द्या, जे काही आहे ते मीच आहे, हे लक्षात घ्या. कर्ता मीच, क्रिया मीच, क्रियापद मीच आहे, हे एकदा लक्षात आले की, तुम्हांला यात टाकणारा मीच आहे आणि यातून बाहेर काढणाराही मीच आहे, हेही ध्यानात येईल. त्यामुळे कोणत्याही धारणा न ठेवता माझ्यावर प्रेम करा. जे काही कराल त्यात यश मिळवायला आणि परिणामी आयुष्य उत्तम जगायला एवढेही पुष्कळ आहे. 

टॅग्स :Mahabharatमहाभारत