शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

धर्माचा त्याग करुन भगवंताला शरण जावे; श्रीकृष्णाने अर्जुनाला असा उपदेश का केला? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:35 IST

भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? जाणून घ्या

मासानां मार्गशीर्षोहम् असे श्रीकृष्णाने भगवद्‌गीतेत म्हटले आहे. याच मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाने ब्रह्मांडाला अमोघ, कालातीत भगवद्‌गीता दिली. गीतेचे ज्ञान अर्जुनाला दिले. भारतातील कोट्यवधी जनता अत्यंत श्रद्धेने आपापल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करत असतात. जीवन जगत असताना माणूस काही ना काही धारणा घेऊन जगत असतो. त्याप्रमाणे आचार, विचार, व्यवहार करत असतो. या सर्वांचा समावेश ईश्वराची भक्ती करतानाही होतो. मात्र, भगवंताची भक्ती कशी करावी, ती कशी असावी, याबाबत सर्वांचा कळस ठरलेल्या भगवद्गीतेत सविस्तर विवेचन केलेले दिसते. ईश्वराला किंवा भगवंताला शरण जाण्याबाबत अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण नेमके काय सांगतात? पाहूया...

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज।अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः।।१८.६६।।

याचा अर्थ सर्व धर्माचा त्याग करून मला शरण या. पापातून मुक्तता करण्यासाठी आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी परमेश्वर कटीबद्द आहे, असा या श्लोकाचा साधा शब्दार्थ आहे. मात्र, धर्माचा त्याग करा म्हणजे नेमके काय करा? धर्म नावाचे जे काही आहे ते सोडून द्यायचं का? असे काही प्रश्न उपस्थित होतात. ज्यांचे अर्थ जो तो आपापल्यापरिने लावत असतो.

धर्म हा धृ धातूपासून बनलेला शब्द आहे. याचा अर्थ धारण करणे. धारयति इति धर्मः! म्हणजे जे काही चुकीचे किंवा बरोबर आपण धारण करू तो धर्म. थोडक्यात आपल्या धारणा हाच आपला धर्म असतो. धारणा चुकीच्या असू शकतात, तशा त्या बरोबरही असू शकतात. त्या असू शकतात किंवा नसूही शकतात. धारणांमध्ये गल्लत असू शकते. समजुती असू शकतात, तशा गैरसमजुतीही असू शकतात.

वास्तवात जे काही आहे, ते माझेच आहे. चांगले ही माझे आणि वाईट ही माझेच आहे. पाप ही माझेच आहे आणि पुण्य ही माझेच आहे. योग्य ही मीच आणि अयोग्य ही मीच आहे. तुम्ही धारणा बनवता, समजुती करून घेता, तथ्यांश तपासत राहता, धारणाच धारण करणे सोडून द्या, जे काही आहे ते मीच आहे, हे लक्षात घ्या. कर्ता मीच, क्रिया मीच, क्रियापद मीच आहे, हे एकदा लक्षात आले की, तुम्हांला यात टाकणारा मीच आहे आणि यातून बाहेर काढणाराही मीच आहे, हेही ध्यानात येईल. त्यामुळे कोणत्याही धारणा न ठेवता माझ्यावर प्रेम करा. जे काही कराल त्यात यश मिळवायला आणि परिणामी आयुष्य उत्तम जगायला एवढेही पुष्कळ आहे. 

टॅग्स :Mahabharatमहाभारत