शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बोरन्हाण, शबरीची बोरे आणि रामायणातील कथा यांचा परस्परसंबंध किती छान आहे बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 12:23 IST

संक्रांतीपासून सुरु झालेले बोरन्हाण रथसप्तमीपर्यंत चालेल. त्यात मुलांच्या डोक्यावर बोरं घातली जातात त्यामागे शाबरी विद्या आहे, कशी ते पहा!

>> उन्नती गाडगीळ 

मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळाचे तसेच पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे बोरन्हाण केले जाते. बोरन्हाण हा एक शिशुसंस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी, ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे. यात संस्कारांबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो. अगदीच तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे, म्हणून पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोरन्हाण केले जाते. नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी, परंपरेशी, निसर्गाशी त्यांचीही नाळ जोडली जाते.

बोरन्हाण घालताना बाळाला लागणार नाहीत अशा बेताने वजनाने हलक्या पण आकर्षक, तरी आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरन्हाण घातले जाते. त्यात चुरमुरे, लाह्या, हलव्याचे दाणे, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, तसेच रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट, बिस्कीट अशा गोष्टींचाही समावेश केला जातो. या सोहळ्यात सहभागी झालेल्या इतर मुलांनी तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो. यानिमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि उत्सवमूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते. यात जी बोरं टाकली जातात ती शाबरी विद्येचे प्रतीक मानली जातात. त्यामागील कथा जाणून घेऊ. 

श्रमणा उर्फ शबरी भिल्ल समाजातील सुंदर राजकुमारी होती.विवाह प्रसंगी पशूबळी द्यावा लागतो हे  हळव्या शबरीला मान्य नव्हते. विवाह न करता ती मातंग ऋषींच्या आश्रमात राहून तिने धर्म शास्त्र विद्या प्राप्त केली.ती श्री. रामाची भक्त होती.भजनकार होती. मातंग ऋषिंनी मृत्यू समयी सांगितले, "'आश्रमाचे व औषधी  वनस्पती(बोर) चे रक्षण कर.रामाची प्रतीक्षा कर."

काही काळानंतर श्रीराम, लक्ष्मण तिचा शोध घेत आश्रमात आले. तिने द्विमूर्तींचे स्वागत व पूजन केले. श्रीरामांना आदेश होता, वनवासात गुरुवाणीतून विद्या घ्यायची नाही. म्हणून विद्यावती शबरीने चतुराईने बोरातून (संजीवनी) शाबरी विद्या दिली. ''पंपासरोवरात जाऊन सुग्रीवाच्या भेटीचा'' मार्ग दाखवला. लक्ष्मण परान्न घेत नसे. म्हणून त्याने बोरे खाल्ली नाहीत. म्हणून संजीवनी विद्या तो घेऊ शकला नाही. त्यामुळेच इंद्रजितच्या बाणाने तो बेशुद्ध झाला. म्हणून रामाज्ञेनुसार हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन आला. श्रीरामाने संजीवनी सहाय्याने लक्ष्मणास पुनर्जन्म दिला.

म्हणूनच बोरन्हाण घालताना मुलांच्या डोक्यावर बोरं घातली जातात. आरोग्य वर्धक म्हणून बोरीचे स्नान बाळाला घालतात. थोडक्यात आपले सण, संस्कृती आणि संस्कार किती परस्पर संबंधित आहेत, याचा अंदाज वरील कथांवरून येतो. ही साखळीच आपल्याला एकमेकांशी बांधून ठेवणारी आहे, त्यानिमित्ताने का होईना, जमेल तसे, जमेल तेव्हा संस्कृतीचे जतन, संवर्धन करायला हवे, नाही का?

Makar Sankranti 2024: वयाच्या पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे संक्रात ते रथसप्तमी काळात बोरन्हाण का करायचे ते वाचा!

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीramayanरामायणPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३