शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

Life lesson: हो! जीवंतपणी स्वर्ग आणि नरक पाहणे शक्य आहे; 'असा' घ्या अनुभव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 12:05 IST

Life Lesson : आपले जसे कर्म त्यानुसार मृत्यूपश्चात आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात गती मिळते, पण ते जिवंतपणी पाहणे शक्य असेल तर? वाचा!

एक आजी होती. ती एकटीच राहत होती. तिने आयुष्यभर अपार कष्ट केले होते. मृत्यूनंतर पुन्हा जन्ममरणाचा फेर नको, मोक्ष हवा, अशी ती रोज देवाकडे प्रार्थना करत असे. तिची स्वर्गप्राप्तीची तीव्र ईच्छा होती. ते पाहून एक दिवस खुद्द देव वेषांतर करून तिच्या भेटीस आले आणि आजीशी बोलू लागले.बोलण्याच्या ओघात आजीने आपली स्वर्गप्राप्तीची ईच्छाही बोलून दाखवली. त्यावर वेषांतर करून आलेले देव म्हणाले, `त्यासाठी मृत्यूची गरज काय? स्वर्ग तर जिवंतपणीदेखील पाहता येतो!'

हे ऐकून आजी मोहरली. `खरंच की काय? तसे असेल तर मलाही स्वर्ग बघायचा आहे. देवाने आजीला आपल्या बरोबर नेले. एक मोठे प्रशस्त सभागृह होते. परीकथेतले चित्र वाटावे, असे भव्य आलिशान सभागृह पाहून आजीचे डोळे विस्फारले. आजी कुतुहलाने तो नजारा पाहत होती. तिथे एका दालनात जेवणाची सोय केली होती. स्वर्गातली भोजनव्यवस्था पाहण्यासाठी आजी उत्सुक होती. त्या दालनात तिने प्रवेश केला, तर तिथे तिला विचित्र गोष्टी आढळल्या. तिथे प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी भांडत होता, हाणामारी करत होता, अपशब्द उच्चारत होता. ते पाहून आजीचा भ्रमनिरास झाला. 

मग देवाने आजीला दुसऱ्या दालनात नेले. ते दालन तिथल्या भव्य वास्तुला शोभतही नव्हते. कारण सर्वसाधारण घरांमधले चित्र तिथे दिसत होते. परंतु तिथल्या लोकांचे चेहरे समाधानाने तृप्त होते. लोक हक्कासाठी नाही, तर कर्तव्यासाठी धडपडत होती. एकमेकांना मदत करत होती. त्यांना पाहून आजीच्या तोंडून नकळत निघून गेले, हा खरा स्वर्ग!

आजीचे हे उद्गार ऐकून देवाने आपल्या मूळ रूपात आजीला दर्शन देत म्हटले, `स्वर्ग आणि नरक यातला खरा भेद तुला कळला. स्वर्ग ही आलिशान वास्तू नसून स्वर्ग ही आपण निर्माण केलेली जागा आहे. स्वर्ग या शब्दाची व्युत्पत्ती आहे, स्व म्हणजे स्वत: आणि ग म्हणजे आकाश, आपण स्वत: निर्माण केलेले आकाश, ज्याला आदि नाही आणि अंत नाही. जे विस्तीर्ण आहे. ज्यात सर्वांना सामावून घेण्याची ताकद आहे. असा स्वर्ग आपण मरणोत्तर नाही, तर जिवंतपणी निर्माण करू शकतो. आपल्या स्वभावाने, कर्तृत्त्वाने, चांगुलपणाने आपण स्वत:साठी आणि इतरांसाठी स्वर्ग निर्माण करू शकतो.'

हे ऐकून आजी म्हणाली, 'मग देवा नरक म्हणजे काय?'देव म्हणाले, 'नरक शब्दातच त्याचे उत्तर आहे, नराने निर्माण केलेले. फक्त फरक एवढाच, की स्वर्ग चांगल्या कृतींनी तयार होतो, तर नरक वाईट कृतींनी तयार होतो. तुम्ही मानवाने सद्यस्थितीत निसर्गाची केलेली हानी, रोगराई, प्रदुषण, लोकसंख्यावाढ या गोष्टी नरक आहेत. तुम्ही नरकात जगत आहात. परंतु, काही लोकांच्या चांगुलपणामुळे पृथ्वीवर स्वर्गनिर्मिती होऊन लोकांचे जगणे सुसह्य होत आहे. म्हणून मृत्यूनंतरच्या स्वर्ग-नरकाची कल्पना सोडा आणि वास्तवात नरक असलेल्या जागी स्वर्ग कसा निर्माण करता येईल, याचा विचार करा!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी