शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:21 IST

Life Lesson: संकटं कोणालाही नको असतात, साधं सोपं सुटसुटीत पण आनंदी जीवन असावं एवढीच प्रत्येकाची अपेक्षा असते, तरी अवघड वळणं का येतात? वाचा...

एखाद्या मोठ्या, गुळगुळीत आणि ट्रॅफिक नसलेल्या रोडवरून गाडी जात असेल तर प्रवास आनंदादायी होतो. मात्र तिथेही स्पीडब्रेकर असतात. वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहावे यासाठी त्यांची रचना असते मान्य आहे, पण खाच खळगे, खड्डे, खडबडीत अरुंद रस्ते, ट्रॅफिक आले की प्रवासाच्या रंगाचा बेरंग होतो. हल्ली तर गुगल मॅपवर सुद्धा तो 'रेड, ऑरेंज, ग्रीन पॅच' दाखवतात. यावरून आपण पुढच्या रस्त्याचा अंदाज घेतो. पण त्यांच्या भीतीने प्रवास थांबवत नाही. आपले इप्सित ठिकाण गाठतो आणि सुटकेचा श्वास सोडतो. आयुष्याचा प्रवासही तसाच आहे... 

प्रेमानंद महाराज दुःख, संकटं, मनःस्ताप, मानहानी या आयुष्यात येणाऱ्या खाच-खळग्यांबद्दल बोलताना म्हणतात, ही सुद्धा आपला प्रवास अनुभवांनी समृद्ध व्हावा यासाठी केलेली योजना आहे. ते आलेच नाहीत तर आपल्याला गुळगुळीत रस्त्यांची सवय होईल आणि ते सगळीकडे मिळतीलच असे नाही. त्यामुळे प्रतिकूलतेत अनुकूलता शोधण्याचा प्रयत्न केला तर या अचानक आलेल्या संकटांचे ओझे वाटणार नाही. 

अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, काच दोन प्रकारची असते, एक जी दगड मारला तरी फुटते, दुसरी ती जी बंदुकीची गोळी लागली तरी फुटत नाही, तिलाच आपण बुलेट प्रूफ काच म्हणतो. ती ही काचच, तरी ती कणखर कशी झाली? तर आगीत तापवून, त्यावर थंड पाण्याचा मारा करून, परत आगीत तापवून, पाण्याचा मारा करून ती कणखर बनली. भगवंतदेखील आपल्याला सुख-दुःखाचा ससेमीरा पाठीशी लावून कणखर बनवतो. जेणेकरून आपल्याला सुख दुःख पचवण्याची ताकद मिळेल. 

म्हणून सगळं काही सुरळीत सुरु असताना अचानक काही गडबड, गोंधळ झाला तर बावरून जाऊ नका, सुखाचे क्षण जसे उपभोगले तसे दुःखाचे क्षण परीक्षेचे आहेत, असे समजून देव आपल्याला कणखर बनवतोय हे ध्यानात ठेवा आणि आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी भगवंताकडेच बळ मागा, तो ते देईल आणि आयुष्य सुखकर होत आपले इप्सित ध्येय अर्थात आपला शेवट सुखकर होईल. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी