शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:21 IST

Life Lesson: संकटं कोणालाही नको असतात, साधं सोपं सुटसुटीत पण आनंदी जीवन असावं एवढीच प्रत्येकाची अपेक्षा असते, तरी अवघड वळणं का येतात? वाचा...

एखाद्या मोठ्या, गुळगुळीत आणि ट्रॅफिक नसलेल्या रोडवरून गाडी जात असेल तर प्रवास आनंदादायी होतो. मात्र तिथेही स्पीडब्रेकर असतात. वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहावे यासाठी त्यांची रचना असते मान्य आहे, पण खाच खळगे, खड्डे, खडबडीत अरुंद रस्ते, ट्रॅफिक आले की प्रवासाच्या रंगाचा बेरंग होतो. हल्ली तर गुगल मॅपवर सुद्धा तो 'रेड, ऑरेंज, ग्रीन पॅच' दाखवतात. यावरून आपण पुढच्या रस्त्याचा अंदाज घेतो. पण त्यांच्या भीतीने प्रवास थांबवत नाही. आपले इप्सित ठिकाण गाठतो आणि सुटकेचा श्वास सोडतो. आयुष्याचा प्रवासही तसाच आहे... 

प्रेमानंद महाराज दुःख, संकटं, मनःस्ताप, मानहानी या आयुष्यात येणाऱ्या खाच-खळग्यांबद्दल बोलताना म्हणतात, ही सुद्धा आपला प्रवास अनुभवांनी समृद्ध व्हावा यासाठी केलेली योजना आहे. ते आलेच नाहीत तर आपल्याला गुळगुळीत रस्त्यांची सवय होईल आणि ते सगळीकडे मिळतीलच असे नाही. त्यामुळे प्रतिकूलतेत अनुकूलता शोधण्याचा प्रयत्न केला तर या अचानक आलेल्या संकटांचे ओझे वाटणार नाही. 

अधिक स्पष्टीकरण देताना ते म्हणतात, काच दोन प्रकारची असते, एक जी दगड मारला तरी फुटते, दुसरी ती जी बंदुकीची गोळी लागली तरी फुटत नाही, तिलाच आपण बुलेट प्रूफ काच म्हणतो. ती ही काचच, तरी ती कणखर कशी झाली? तर आगीत तापवून, त्यावर थंड पाण्याचा मारा करून, परत आगीत तापवून, पाण्याचा मारा करून ती कणखर बनली. भगवंतदेखील आपल्याला सुख-दुःखाचा ससेमीरा पाठीशी लावून कणखर बनवतो. जेणेकरून आपल्याला सुख दुःख पचवण्याची ताकद मिळेल. 

म्हणून सगळं काही सुरळीत सुरु असताना अचानक काही गडबड, गोंधळ झाला तर बावरून जाऊ नका, सुखाचे क्षण जसे उपभोगले तसे दुःखाचे क्षण परीक्षेचे आहेत, असे समजून देव आपल्याला कणखर बनवतोय हे ध्यानात ठेवा आणि आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी भगवंताकडेच बळ मागा, तो ते देईल आणि आयुष्य सुखकर होत आपले इप्सित ध्येय अर्थात आपला शेवट सुखकर होईल. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी