शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Life Lesson: प्रियजनांना गमावण्याची भीती अस्वस्थ करते? गौर गोपाल दास सांगतात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:20 IST

Life Lesson: आपली प्रिय व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असावी असे आपल्याला वाटते, पण कधी ना कधी साथ सुटतेच; ती भीती मनातून काढायची कशी ते पाहू. 

प्रिय व्यक्ती मग ती कोणीही असो, आपले आई, बाबा, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रीण, आजी, आजोबा, गुरुजन...ही न संपणारी यादी आहे. आपल्याला ऊर्जा देणाऱ्या, जगायला बळ देणाऱ्या लोकांचा गराडा आपल्या भोवती असावा असे आपल्याला कायम वाटते. काही काळासाठी झालेला विरहसुद्धा आपल्याला सहन होत नाही आणि ती व्यक्ती हे जग सोडून जाईल या नुसत्या कल्पनेनेही त्रास होतो, अस्वस्थ वाटते. यावर गौर गोपाल दास यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे. 

'दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ' गदिमा यांनी लिहिलेल्या या सुंदर ओळी मनुष्य जीवनाचे सार आहे. जे जे आपण आपलं म्हणत जीवापाड जपतो, एकतर त्या गोष्टी, माणसं कालपरत्वे आपल्यापासून दुरावतात किंवा आपणच जग सोडून जाताना त्यांच्यापासून दुरावतो. म्हणजे असा नाहीतर तसा विरह होणार हे ठरलेले आहे. हेच सूत्र धरून गौर गोपाल दास म्हणतात, 'भेटी होतात तेव्हा विरह होणार हे ठरलेलेच असते. हे गृहीत धरूनच मनाशी चंग बांधून ठेवायचा, की हा विरह पचवावा लागणारच आहे. खुद्द आईलाही नऊ मास आपल्या पोटात वाढणारे बाळ आपल्यापासून विलग व्हावे असे वाटत नाही, पण ते तो धागा तुटल्याशिवाय पुढची गाठही पडणार नाही हे तिला माहीत असते म्हणून ती प्रसूती वेदना सहन करून, बाळाला स्वतंत्र अस्तित्त्व देते.'

'व्यक्तीचा विरह होऊ नये, हे जग सोडून जाऊ नये, आपल्यापासून दूर होऊ नये हा कितीही विचार केला तरी तसे होणे शक्य नाही. आपल्या सगळ्यांच्या शेवटच्या प्रवासाचे तिकीट आधीच काढून तयार आहे. बोलावणे आले की त्या प्रवासात आवडत्या वस्तू घेऊन जायलाही उसंत मिळणार नाही. जे काही आहे ते इथेच सोडून नेसल्या वस्त्रानिशी जावे लागणार आहे. हेच आपल्या प्रिय व्यक्तींचाही बाबतीत घडणार आहे. हे लक्षात घेऊन ती व्यक्ती दूर गेली किंवा कायमची सोडून गेली तर माझे कसे होणार? या विचारात वेळ वाया घावण्यापेक्षा ती व्यक्ती जवळ असताना, समोर असताना तिच्या सान्निध्यात चांगल्या आठवणी तयार करा. ते क्षण भरभरून जगा. खेळा, हसा, बोला, आनंद, दुःख यांची देवाण घेवाण करा. त्यामुळे ती व्यक्ती समोर नसली तरी तिच्या संबंधित याच आठवणी भविष्यात तुम्हाला जगण्याचे बळ देतील. त्यामुळे विरहाची चिंता सोडा, आत्ताचा क्षण आनंदाने जगा, हेच जीवनाचे गुपित आहे.' 

गौर गोपाल दास यांनी केलेले मार्गदर्शन पाहता गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या गाण्याचे शब्द आठवतात, 

आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तूजो भी है बस यही एक पल है

अनजाने सायों का राहों में डेरा हैअनदेखी बाहों ने हम सब को घेरा हैये पल उजाला है, बाकी अँधेरा हैये पल गँवाना ना, ये पल ही तेरा हैजीने वाले सोच लेयही वक़्त है कर ले पूरी आरज़ू

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship TipsरिलेशनशिपInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी