शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Life Lesson: प्रियजनांना गमावण्याची भीती अस्वस्थ करते? गौर गोपाल दास सांगतात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:20 IST

Life Lesson: आपली प्रिय व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असावी असे आपल्याला वाटते, पण कधी ना कधी साथ सुटतेच; ती भीती मनातून काढायची कशी ते पाहू. 

प्रिय व्यक्ती मग ती कोणीही असो, आपले आई, बाबा, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रीण, आजी, आजोबा, गुरुजन...ही न संपणारी यादी आहे. आपल्याला ऊर्जा देणाऱ्या, जगायला बळ देणाऱ्या लोकांचा गराडा आपल्या भोवती असावा असे आपल्याला कायम वाटते. काही काळासाठी झालेला विरहसुद्धा आपल्याला सहन होत नाही आणि ती व्यक्ती हे जग सोडून जाईल या नुसत्या कल्पनेनेही त्रास होतो, अस्वस्थ वाटते. यावर गौर गोपाल दास यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे. 

'दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ' गदिमा यांनी लिहिलेल्या या सुंदर ओळी मनुष्य जीवनाचे सार आहे. जे जे आपण आपलं म्हणत जीवापाड जपतो, एकतर त्या गोष्टी, माणसं कालपरत्वे आपल्यापासून दुरावतात किंवा आपणच जग सोडून जाताना त्यांच्यापासून दुरावतो. म्हणजे असा नाहीतर तसा विरह होणार हे ठरलेले आहे. हेच सूत्र धरून गौर गोपाल दास म्हणतात, 'भेटी होतात तेव्हा विरह होणार हे ठरलेलेच असते. हे गृहीत धरूनच मनाशी चंग बांधून ठेवायचा, की हा विरह पचवावा लागणारच आहे. खुद्द आईलाही नऊ मास आपल्या पोटात वाढणारे बाळ आपल्यापासून विलग व्हावे असे वाटत नाही, पण ते तो धागा तुटल्याशिवाय पुढची गाठही पडणार नाही हे तिला माहीत असते म्हणून ती प्रसूती वेदना सहन करून, बाळाला स्वतंत्र अस्तित्त्व देते.'

'व्यक्तीचा विरह होऊ नये, हे जग सोडून जाऊ नये, आपल्यापासून दूर होऊ नये हा कितीही विचार केला तरी तसे होणे शक्य नाही. आपल्या सगळ्यांच्या शेवटच्या प्रवासाचे तिकीट आधीच काढून तयार आहे. बोलावणे आले की त्या प्रवासात आवडत्या वस्तू घेऊन जायलाही उसंत मिळणार नाही. जे काही आहे ते इथेच सोडून नेसल्या वस्त्रानिशी जावे लागणार आहे. हेच आपल्या प्रिय व्यक्तींचाही बाबतीत घडणार आहे. हे लक्षात घेऊन ती व्यक्ती दूर गेली किंवा कायमची सोडून गेली तर माझे कसे होणार? या विचारात वेळ वाया घावण्यापेक्षा ती व्यक्ती जवळ असताना, समोर असताना तिच्या सान्निध्यात चांगल्या आठवणी तयार करा. ते क्षण भरभरून जगा. खेळा, हसा, बोला, आनंद, दुःख यांची देवाण घेवाण करा. त्यामुळे ती व्यक्ती समोर नसली तरी तिच्या संबंधित याच आठवणी भविष्यात तुम्हाला जगण्याचे बळ देतील. त्यामुळे विरहाची चिंता सोडा, आत्ताचा क्षण आनंदाने जगा, हेच जीवनाचे गुपित आहे.' 

गौर गोपाल दास यांनी केलेले मार्गदर्शन पाहता गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या गाण्याचे शब्द आठवतात, 

आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तूजो भी है बस यही एक पल है

अनजाने सायों का राहों में डेरा हैअनदेखी बाहों ने हम सब को घेरा हैये पल उजाला है, बाकी अँधेरा हैये पल गँवाना ना, ये पल ही तेरा हैजीने वाले सोच लेयही वक़्त है कर ले पूरी आरज़ू

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship TipsरिलेशनशिपInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी