शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Life Lesson: प्रियजनांना गमावण्याची भीती अस्वस्थ करते? गौर गोपाल दास सांगतात... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:20 IST

Life Lesson: आपली प्रिय व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असावी असे आपल्याला वाटते, पण कधी ना कधी साथ सुटतेच; ती भीती मनातून काढायची कशी ते पाहू. 

प्रिय व्यक्ती मग ती कोणीही असो, आपले आई, बाबा, बहीण, भाऊ, मित्र, मैत्रीण, आजी, आजोबा, गुरुजन...ही न संपणारी यादी आहे. आपल्याला ऊर्जा देणाऱ्या, जगायला बळ देणाऱ्या लोकांचा गराडा आपल्या भोवती असावा असे आपल्याला कायम वाटते. काही काळासाठी झालेला विरहसुद्धा आपल्याला सहन होत नाही आणि ती व्यक्ती हे जग सोडून जाईल या नुसत्या कल्पनेनेही त्रास होतो, अस्वस्थ वाटते. यावर गौर गोपाल दास यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे. 

'दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ' गदिमा यांनी लिहिलेल्या या सुंदर ओळी मनुष्य जीवनाचे सार आहे. जे जे आपण आपलं म्हणत जीवापाड जपतो, एकतर त्या गोष्टी, माणसं कालपरत्वे आपल्यापासून दुरावतात किंवा आपणच जग सोडून जाताना त्यांच्यापासून दुरावतो. म्हणजे असा नाहीतर तसा विरह होणार हे ठरलेले आहे. हेच सूत्र धरून गौर गोपाल दास म्हणतात, 'भेटी होतात तेव्हा विरह होणार हे ठरलेलेच असते. हे गृहीत धरूनच मनाशी चंग बांधून ठेवायचा, की हा विरह पचवावा लागणारच आहे. खुद्द आईलाही नऊ मास आपल्या पोटात वाढणारे बाळ आपल्यापासून विलग व्हावे असे वाटत नाही, पण ते तो धागा तुटल्याशिवाय पुढची गाठही पडणार नाही हे तिला माहीत असते म्हणून ती प्रसूती वेदना सहन करून, बाळाला स्वतंत्र अस्तित्त्व देते.'

'व्यक्तीचा विरह होऊ नये, हे जग सोडून जाऊ नये, आपल्यापासून दूर होऊ नये हा कितीही विचार केला तरी तसे होणे शक्य नाही. आपल्या सगळ्यांच्या शेवटच्या प्रवासाचे तिकीट आधीच काढून तयार आहे. बोलावणे आले की त्या प्रवासात आवडत्या वस्तू घेऊन जायलाही उसंत मिळणार नाही. जे काही आहे ते इथेच सोडून नेसल्या वस्त्रानिशी जावे लागणार आहे. हेच आपल्या प्रिय व्यक्तींचाही बाबतीत घडणार आहे. हे लक्षात घेऊन ती व्यक्ती दूर गेली किंवा कायमची सोडून गेली तर माझे कसे होणार? या विचारात वेळ वाया घावण्यापेक्षा ती व्यक्ती जवळ असताना, समोर असताना तिच्या सान्निध्यात चांगल्या आठवणी तयार करा. ते क्षण भरभरून जगा. खेळा, हसा, बोला, आनंद, दुःख यांची देवाण घेवाण करा. त्यामुळे ती व्यक्ती समोर नसली तरी तिच्या संबंधित याच आठवणी भविष्यात तुम्हाला जगण्याचे बळ देतील. त्यामुळे विरहाची चिंता सोडा, आत्ताचा क्षण आनंदाने जगा, हेच जीवनाचे गुपित आहे.' 

गौर गोपाल दास यांनी केलेले मार्गदर्शन पाहता गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या गाण्याचे शब्द आठवतात, 

आगे भी जाने ना तू, पीछे भी जाने ना तूजो भी है बस यही एक पल है

अनजाने सायों का राहों में डेरा हैअनदेखी बाहों ने हम सब को घेरा हैये पल उजाला है, बाकी अँधेरा हैये पल गँवाना ना, ये पल ही तेरा हैजीने वाले सोच लेयही वक़्त है कर ले पूरी आरज़ू

टॅग्स :relationshipरिलेशनशिपRelationship TipsरिलेशनशिपInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी