शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

नववर्षाचा आरंभ करूया दासबोधाने आणि प्रारंभ करुया गणेशाच्या स्मरणाने! 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 1, 2021 17:35 IST

शीर्षकात आरंभ आणि प्रारंभ हे दोन्ही शब्द वापरण्याचे प्रयोजन असे, की आरंभ नवीन गोष्टींचा असतो आणि प्रारंभ खंडित झालेल्या गोष्टीची पुन्हा सुरुवात असते. म्हणून आरंभ दासबोधाचा आणि प्रारंभ ईश सेवेचा!

ज्योत्स्ना गाडगीळ 

इंग्रजी नववर्षाची सुरुवात झाली आणि आपण सगळेच आता नव्या दशकाशी जोडले गेलो आहोत. एकार्थाने एकवीशीत आलो आहोत. सद्यस्थितीतील आपले वय विसरून कालानुरूप आपणही नव्या दमाने, नव्या उत्साहाने येत्या काळाचे स्वागत करूया. यापुढेही आपल्या दैनंदिन जीवनात सुख-दु:खाचे प्रसंग येतील,  त्यांना सामोरे जाताना आपला मानसिक तोल ढळू नये, यासाठी मनाला आणि बुद्धीला थोडे सकस खाद्य पुरवणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांना शक्ती, भक्ती आणि युक्ती याचे मर्म समजवणारे समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधाचे यथाशक्ती वाचन आणि चिंतन करूया. शीर्षकात आरंभ आणि प्रारंभ हे दोन्ही शब्द वापरण्याचे प्रयोजन असे, की आरंभ नवीन गोष्टींचा असतो आणि प्रारंभ खंडित झालेल्या गोष्टीची पुन्हा सुरुवात असते. म्हणून आरंभ दासबोधाचा आणि प्रारंभ ईश सेवेचा!

ऊँ नमोजि गणनायका। सर्वसिद्धिफळदायका।अज्ञानभ्रांतिछेदका। बोधरूपा।।

समर्थ रामदास स्वामी हे जरी रामभक्त, हनुमान भक्त असले, तरी त्यांनीदेखील सर्व कार्यारंभी मान असलेल्या गणरायाला नमन करूनच दासबोधाची सुरुवात केली आहे. गणरायाला वंदन का? कारण तो सर्वसिद्धी देणारा आहे, अज्ञान दूर करणारा आहे, बोध देणारा आहे आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकवणारा आहे. 

हेही वाचा : उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवावा की नाही? शास्त्र काय सांगते?

कोणतेही काम सुरू करताना डोळ्यासमोर आदर्श हा असलाच पाहिजे. कोणासारखे तरी होण्याची धडपड आपल्या कार्याला गती देते, दिशा देते. गणनायक हा गणांचा अधिपती आहे. तो नायक झाला, कारण नेतृत्व करण्याचे गुण त्याच्या ठिकाणी आहेत. कार्यक्षम आहे. त्याच्या ठायी निर्णयक्षमता आहे. मनात कुठलेही द्वैत नाही. अशीच व्यक्ती इतरांना मार्गदर्शन करू शकते. 

हे मार्गदर्शन साधेसुधे नाही, तर आपल्या देहाला, इंद्रियांना आणि मनाला असणार आहे. त्यांच्यावर नियंत्रण मिळवले पाहिजे.  गणपती ही देवता ऊँकारस्वरूप असल्यामुळे विषयांचा विसर पाडून आत्मारामाशी आपली नाळ जोडण्यास मदत करणारी आहे. 

कोणतेही ज्ञान पदरात पाडून घ्यायचे, तर विद्यार्थ्याच्या ठायी पराकोटीची नम्रता आणि शिकण्याची जिज्ञासा हवी. गणपती स्वत: बुद्धीची देवता असूनही त्याने विद्यार्थी होऊन वेद, शास्त्र, पुराण, कला यात नैपुण्य मिळवले. तो युद्धातही अजेय आहे. संगीतात पारंगत आहे. नृत्य-नाट्याचा रसिक आहे. चांगला खवैयासुद्धा आहे. थोडक्यात, जगण्याचा पुरेपूर आस्वाद घेणारी ही मंगलमूर्ती आहे. 

अशा मंगलमूर्तीचे आशीर्वाद घेऊन समर्थ रामदास स्वामी आपल्याला अवगत झालेले ज्ञान, आपल्याला प्राप्त झालेला बोध आणि आपल्या हयातीत अनुभवलेले प्रसंग यांचे सार दासांना देण्यासाठी दासबोधाची रचना करतात. हे ज्ञानामृत पिऊन आपण बोध घ्यावा आणि आयुष्याला चांगले वळण द्यावे, हाच या ग्रंथाच्या निर्मितीचा हेतू. आपणही कणाकणाने हे ज्ञान दैनंदिन आयुष्यात घोळवुया आणि नरदेह सार्थकी लावूया.

हेही वाचा : 'संकटी पावावे, निर्वाणि रक्षावे' हीच प्रार्थना!