शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

नववर्षाचा आरंभ करूया दासबोधाने आणि प्रारंभ करुया गणेशाच्या स्मरणाने! 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 1, 2021 17:35 IST

शीर्षकात आरंभ आणि प्रारंभ हे दोन्ही शब्द वापरण्याचे प्रयोजन असे, की आरंभ नवीन गोष्टींचा असतो आणि प्रारंभ खंडित झालेल्या गोष्टीची पुन्हा सुरुवात असते. म्हणून आरंभ दासबोधाचा आणि प्रारंभ ईश सेवेचा!

ज्योत्स्ना गाडगीळ 

इंग्रजी नववर्षाची सुरुवात झाली आणि आपण सगळेच आता नव्या दशकाशी जोडले गेलो आहोत. एकार्थाने एकवीशीत आलो आहोत. सद्यस्थितीतील आपले वय विसरून कालानुरूप आपणही नव्या दमाने, नव्या उत्साहाने येत्या काळाचे स्वागत करूया. यापुढेही आपल्या दैनंदिन जीवनात सुख-दु:खाचे प्रसंग येतील,  त्यांना सामोरे जाताना आपला मानसिक तोल ढळू नये, यासाठी मनाला आणि बुद्धीला थोडे सकस खाद्य पुरवणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांना शक्ती, भक्ती आणि युक्ती याचे मर्म समजवणारे समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोधाचे यथाशक्ती वाचन आणि चिंतन करूया. शीर्षकात आरंभ आणि प्रारंभ हे दोन्ही शब्द वापरण्याचे प्रयोजन असे, की आरंभ नवीन गोष्टींचा असतो आणि प्रारंभ खंडित झालेल्या गोष्टीची पुन्हा सुरुवात असते. म्हणून आरंभ दासबोधाचा आणि प्रारंभ ईश सेवेचा!

ऊँ नमोजि गणनायका। सर्वसिद्धिफळदायका।अज्ञानभ्रांतिछेदका। बोधरूपा।।

समर्थ रामदास स्वामी हे जरी रामभक्त, हनुमान भक्त असले, तरी त्यांनीदेखील सर्व कार्यारंभी मान असलेल्या गणरायाला नमन करूनच दासबोधाची सुरुवात केली आहे. गणरायाला वंदन का? कारण तो सर्वसिद्धी देणारा आहे, अज्ञान दूर करणारा आहे, बोध देणारा आहे आणि आयुष्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकवणारा आहे. 

हेही वाचा : उजव्या सोंडेचा गणपती घरात ठेवावा की नाही? शास्त्र काय सांगते?

कोणतेही काम सुरू करताना डोळ्यासमोर आदर्श हा असलाच पाहिजे. कोणासारखे तरी होण्याची धडपड आपल्या कार्याला गती देते, दिशा देते. गणनायक हा गणांचा अधिपती आहे. तो नायक झाला, कारण नेतृत्व करण्याचे गुण त्याच्या ठिकाणी आहेत. कार्यक्षम आहे. त्याच्या ठायी निर्णयक्षमता आहे. मनात कुठलेही द्वैत नाही. अशीच व्यक्ती इतरांना मार्गदर्शन करू शकते. 

हे मार्गदर्शन साधेसुधे नाही, तर आपल्या देहाला, इंद्रियांना आणि मनाला असणार आहे. त्यांच्यावर नियंत्रण मिळवले पाहिजे.  गणपती ही देवता ऊँकारस्वरूप असल्यामुळे विषयांचा विसर पाडून आत्मारामाशी आपली नाळ जोडण्यास मदत करणारी आहे. 

कोणतेही ज्ञान पदरात पाडून घ्यायचे, तर विद्यार्थ्याच्या ठायी पराकोटीची नम्रता आणि शिकण्याची जिज्ञासा हवी. गणपती स्वत: बुद्धीची देवता असूनही त्याने विद्यार्थी होऊन वेद, शास्त्र, पुराण, कला यात नैपुण्य मिळवले. तो युद्धातही अजेय आहे. संगीतात पारंगत आहे. नृत्य-नाट्याचा रसिक आहे. चांगला खवैयासुद्धा आहे. थोडक्यात, जगण्याचा पुरेपूर आस्वाद घेणारी ही मंगलमूर्ती आहे. 

अशा मंगलमूर्तीचे आशीर्वाद घेऊन समर्थ रामदास स्वामी आपल्याला अवगत झालेले ज्ञान, आपल्याला प्राप्त झालेला बोध आणि आपल्या हयातीत अनुभवलेले प्रसंग यांचे सार दासांना देण्यासाठी दासबोधाची रचना करतात. हे ज्ञानामृत पिऊन आपण बोध घ्यावा आणि आयुष्याला चांगले वळण द्यावे, हाच या ग्रंथाच्या निर्मितीचा हेतू. आपणही कणाकणाने हे ज्ञान दैनंदिन आयुष्यात घोळवुया आणि नरदेह सार्थकी लावूया.

हेही वाचा : 'संकटी पावावे, निर्वाणि रक्षावे' हीच प्रार्थना!