शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

मार्गशीर्ष गुरुवारनिमित्त काशी क्षेत्री अवतरलेल्या अन्नपूर्णा मातेचे मंदिर आणि त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 14:56 IST

एकवेळ काशी क्षेत्री जाऊन अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेता आले नाही तरी चालेल, पण दैनंदिन जीवनात अन्नाची नासाडी करू नका. कारण त्यातही अन्नपूर्णा मातेचा वास आहे.

काशी या धार्मिक शहराची गणना जगातील सर्वात जुन्या शहरांमध्ये केली जाते. या शहराचे वर्णन सनातन, बौद्ध आणि जैन धर्माच्या ग्रंथांमध्ये आढळते. सनातन धर्मग्रंथानुसार, दैवी काळातील हे भगवान विष्णूचे पहिले वसती स्थान होते. नंतर जेव्हा भगवान शिव ब्रह्मदेवांवर क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्माजींचे पाचवे मस्तक धडापासून तोडले, मात्र ते मस्तक शिवाच्या तळहाताला चिकटून राहिले. शिवाच्या अनेक प्रयत्नांनंतरही ब्रह्माजींचे मस्तक शिवाच्या तळहाताला चिकटून राहिले. 

जेव्हा भगवान शिव काशीला आले तेव्हा ब्रह्माजींचे मस्तक त्यांच्या तळहातापासून वेगळे झाले. त्यावेळी भगवान शिवांना ब्रह्मदेवाच्या वधातून मुक्ती मिळाली. हे जाणून भगवान शिव अतिशय प्रसन्न झाले, त्यांनी काशी नगरी स्थायिक होण्याच्या इच्छेने भगवान विष्णूंना काशी नगरीची मागणी केली. तेव्हापासून या शहराला भोले बाबांची नगरी म्हटले जाऊ लागले. काशीमध्ये शिवमंदिराची स्थापना प्राचीन काळापासून आहे. तेथील काशी विश्वनाथ मंदिर प्रचलित आहे. काशी विश्वनाथ मंदिरापासून काही अंतरावर माता अन्नपूर्णाचे मंदिर आहे. त्या मंदिराबद्दलही सविस्तर जाणून घेऊ. 

अन्नपूर्णा मातेची कथा 

अशी आख्यायिका आहे, की एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे पृथ्वीवर हाहाकार माजला. (सद्यस्थितीतील अन्न नासाडी पाहता शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काळात जगाला पुनश्च अन्न तुटवड्याच्या आपत्तीतून जावे लागेल.) त्यावेळी पृथ्वीवरील लोकांनी त्रिदेवाची पूजा करून त्यांना अन्न टंचाईची माहिती दिली. यानंतर आदिशक्ती माता पार्वती आणि भगवान शिव पृथ्वीवर काशी क्षेत्री अवतरले. सृष्टीवर जगणारे लोक दुःखी असल्याचे पाहून माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले आणि भगवान शंकराला अन्नदान केले. त्याच वेळी, भगवान शिवाने पृथ्वीवरील लोकांमध्ये अन्न वाटप केले. पुढे या धान्याचा वापर शेतीत होऊ लागला. मग अन्न संकट संपले.

अन्नपूर्णा माता मंदिर 

बाबांची नगरी असलेल्या काशी येथील विश्वनाथ मंदिरापासून काही अंतरावर माता अन्नपूर्णा मंदिर आहे. या मंदिरात माता अन्नपूर्णाची पूजा केली जाते. दररोज अन्नपूर्णेची पूजा केल्याने घरात प्रतिकूल परिस्थितीतही अन्नाची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. 

अन्नाचा आदर आणि काळजी घेतली पाहिजे असे शास्त्रात सांगितले आहे. अन्नाचा अपमान करू नये. तसेच जेवढी भूक लागते तेवढेच अन्न द्यावे. अन्न कधीही फेकून देऊ नये. अन्न वाया गेल्याने आई अन्नपूर्णा रागावते. यामुळे घरातील लक्ष्मीही निघून जाते आणि घरात गरिबी राहू लागते. एकवेळ काशी क्षेत्री जाऊन अन्नपूर्णा मातेचे दर्शन घेता आले नाही तरी चालेल, पण दैनंदिन जीवनात अन्नाची नासाडी करू नका. कारण त्यातही अन्नपूर्णा मातेचा वास आहे. ती रुष्ट होईल अशी कोणतीही कृती करू नका.  

या मंदिरात अनेक अद्वितीय प्रतिमा आहेत, ज्यामध्ये माता अन्नपूर्णा स्वयंपाकघरात आहे. त्याच वेळी, अनेक पुतळे अंगणात आहेत. त्यांच्यामध्ये माता काली, पार्वती, शिव यासह इतर अनेक देवता आहेत. दरवर्षी अन्नकूट उत्सवात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर बाबा विश्वनाथांचे दररोज दर्शन घेतल्यानंतर भाविक मातेच्या दर्शनासाठी नक्कीच जातात.