शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
“मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही”; राज-एकनाथ शिंदे भेटीवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले
3
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
4
“सोनिया गांधी-राहुल गांधींवरील ED कारवाई सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही”: चेन्नीथला
5
गुरुवारी लक्ष्मी नारायण त्रिकोण योग: ९ राशींना घवघवीत यश, भरघोस लाभ; ऐश्वर्य, वैभव प्राप्ती!
6
IPL 2025: बुमराह पाठोपाठ आणखी एक गोलंदाज फिटनेस टेस्टमध्ये पास; झाला संघात सामील
7
Sharvari Wagh : "गेल्या ५ वर्षात मी दररोज नापास होत होते..."; अभिनेत्री शर्वरी वाघने केला रिजेक्शनचा सामना
8
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार आदर्श पत्नी कोण? वाचा 'हा' श्लोक आणि जाणून घ्या लक्षणं!
9
युट्यूबर पत्नीला तिच्या सहकारी युट्यूबरसोबत नको त्या अवस्थेत पाहिले...; लगेचच तिने बाजुला पडलेली ओढणी...
10
शेवटच्या दिवशी क्रेडिट कार्डचं बिल भरलं तर सीबील स्कोअर खराब होतो का? काय आहे सत्य?
11
IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' प्रकार, KKR च्या इनिंगमध्ये दोन वेळा घडली अशी घटना
12
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
13
अ‍ॅपलनंतर 'ही' स्मार्टफोन कंपनी बनवणार 'मेड इन इंडिया' डिव्हाइस; देशातील ५वा सर्वात मोठा ब्रँड
14
"दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र, राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज’’,हर्षवर्धन सपकाळ .
15
हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, स्फोटात दोन मुले जखमी
16
गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...
17
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
18
Kitchen Tips: फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड, हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स!
19
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपीचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...
20
मुलीने मारला वडिलांच्याच घरावर डल्ला, नवऱ्याच्या मदतीने चोरले ९० लाख; एका चुकीने पर्दाफाश

Lata Mangeshkar: 'ऐरणीच्या देवा...' हे लता दीदींनी स्वर आणि संगीतबद्ध केलेलं गाणं जणू सर्वसामान्यांनी केलेली प्रार्थनाच!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 6, 2023 12:26 IST

Lata Mangeshkar: लता दीदींचा आज पहिला स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेल्या या गोड गाण्याची उजळणी करूया. 

लता दीदी आपल्यात नाहीत, हे स्वीकारणं अवघडच, तरी नाही म्हणता म्हणता वर्ष झालं. आज त्यांचा पहिला स्मृतिदिन. त्यांच्या आठवणीत त्यांनी गायलेली अनेक गाणी मनात रेंगाळत असतील, पण त्यांनी संगीत दिलेल्या निवडक गाण्यांपैकी एक गाणं म्हणजे 'साधी माणसं' या चित्रपटातील 'ऐरणीच्या देवा' हे गाणं! हे गाणं नुसतं चित्रपटगीत नाही तर देवाकडे काय मागावं याचा सुंदर वस्तुपाठ आहे. शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे आणि स्वरसाज आहे लता दीदी यांचा. 

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊं देआभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे

लोहारांचा देव 'ऐरण' आणि फुलं म्हणजे कोळशातून उडणाऱ्या 'ठिणग्या'. असं लोहारकाम करणारं जोडपं आपलं काम करता करता ऐरणीच्या देवाला ठिणगी ठिणगी म्हणजे फुलं वाहतंय आणि मोबदल्यात फक्त तुझी माया आमच्यावर राहू दे, हे दान मागतंय!

लेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचंलेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचंजिनं व्हावं आबरुचं धनी मातुर माझा देवा वाघावानी आसुं दे

लेणं म्हणजे अलंकार, तोही कसला तर गरिबीचा, अलंकार असा तर पोटभरीला काय तर आपल्या लोहार व्यवसायाच्या कष्टातुन मिळवलेले चणे. एवढ्यात समाधानी आहोत आणि ते स्वाभिमानाने जगणं हेच आमची अब्रू संभाळणारं आहे, फक्त घरचा कर्ता पुरुष वाघाच्या काळजाचा असू दे, जो प्रत्येक संकटाला निधड्या छातीने तोंड देऊ शकेल. 

लक्षुमीच्या हातातली चवरी व्हावी वरखालीइडा पिडा जाईल आली किरपा तुझी भात्यातल्या सुरासंगकिरपा तुझी भात्यातल्या सुरासंग गाऊं दे

लक्ष्मी विष्णूंच्या सेवेत रत असते. तिच्या हातात कुंचल्यासारखी चवरी असते. ती वर खाली होत राहते. तशी सुख दुःखाची चवरी आपल्याही आयुष्यात वर खाली होत राहते. येईल त्या परिस्थितीला सामोरं जायची ताकद आहे, फक्त तुझी कृपा पाठीशी राहू दे. 

सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरीसुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरीघाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊं दे

'सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे' याचा अनुभव आपण घेतोच, अशातच लोकांच्या बऱ्या वाईट स्वभावाचा अनुभव येतो. मात्र आपलेच आपल्याशी दगा करतात तेव्हा घावावर घाव बसून दोन तुकडे होतात, ते दुःख सहन करण्याचं बळ आमच्या अंगात असू दे! 

भालजी पेंढारकर यांच्या साधी माणसं चित्रपटातलं हे गीत अजरामर झालं. दीदींनी आनंदघन या नावाने संगीत दिलं, तेही शब्दांना शोभेल इतकं साधं, तरी मनावर खोलवर परिणाम करणारं! दीदींच्या आवाजाने त्या शब्दांचं सोनं झालं. यापुढे हे गीत केवळ चित्रपट गीत म्हणून न पाहता प्रार्थना म्हणून पाहिलं तरी काही वावगं ठरणार नाही. बरोबर ना?

आनंदघन नावाने दीदींची आणखीही गाजलेली मराठी गाणी - अखेरचा हा तुला दंडवत, डौल मोराच्या मानाचा, नको देवराया अंत आता पाहू, निळ्या आभाळी कातरवेळी, बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला, माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं, रेशमाच्या रेघांनी, शूर आम्ही सरदार, ई... 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकर