शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 15:24 IST

ब्रह्माचा आनंदरुप, परमसुखरुप, ज्ञानमूर्ती, द्वंद्वापासून दूर, आकाशासारखा निर्लेप व सूक्ष्म, तत्त्वमसि, तोच तू आहेस - हे ईशतत्त्व तूच आहेस, त्याची अनुभूती हेच ज्याचे लक्ष्य आहे; अद्वितीय, नित्य, विमल, अचल, कोणत्याही भावाच्या पलीकडे, त्रिगुणरहित अशा सद्गरुला मी नमस्कार करतो..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

संत कबीरांनी भावपूर्ण अंतःकरणाने म्हटले आहे -

गुरु गोविंद दोऊ खडे काके  लागू पाय ।बलिहारी गुरुदेव को गोविंद दियो बताय ॥

कबीरांनी त्यांच्या ह्या दोह्यात गुरुची श्रेष्ठता स्पष्टरित्या आपल्या समोर मांडली आहे. गोविंद दाखविणारा गुरु हा गोविंदापेक्षा श्रेष्ठ आहे कारण त्याच्याशिवाय गोविंदाचा महिमा आपण कसा काय जाणू शकणार..? परंतु एक स्थिती अशी देखील येते की, गुरु आणि गोविंद यांच्यात शिष्याला भेदच कळत नाही. त्याचे अंतःकरण गाते -

'गुरु गोविंद उभे दोन्ही'

पण हा प्रश्न गोंधळात टाकीत नाही कारण गुरु आणि गोविंद मला 'पांडुरंग' भासतात.

असे असले तरीही कबीरांच्या ह्या दोह्यात एक दुसरे माधुर्य समजावलेले आहे. जरा वेगळ्या संदर्भात तो दोहा समजण्याचा प्रयत्न केला तर कबीर सांगतात की, गुरु आणि गोविंद ह्या दोघांपैकी कोणाला नमस्कार करु.? हा गोंधळ ज्यावेळी माझ्या मनांत निर्माण झाला त्यावेळी मी माझ्या गुरुदेवाला नमस्कार केला कारण त्यानेच मला गोविंद दाखविला. प्रभूकडे इशारा करून त्यानेच मला नमस्कार करायला सुचविले.

खरा गुरु हा नेहमी सर्वांचीच गोविंदनिष्ठा, ईश्वरनिष्ठाच वाढवित असतो..!

ब्रह्माचा आनंदरुप, परमसुखरुप, ज्ञानमूर्ती, द्वंद्वापासून दूर, आकाशासारखा निर्लेप व सूक्ष्म, तत्त्वमसि, तोच तू आहेस - हे ईशतत्त्व तूच आहेस, त्याची अनुभूती हेच ज्याचे लक्ष्य आहे; अद्वितीय, नित्य, विमल, अचल, कोणत्याही भावाच्या पलीकडे, त्रिगुणरहित अशा सद्गुरुला मी नमस्कार करतो..!

परंतु आजच्या ह्या काळात असा सद्गुरु मिळाला नाही तर..?

कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।

भगवान श्रीकृष्णाला गुरु बनवून त्याने दाखविलेल्या जीवन पंथावरुन चालणे हेच श्रेयस्कर आहे.

श्रीकृष्णाचा गीता संदेश वाचून, समजून, त्यावर विचार करून व आचरणात आणून घरोघरी घेऊन जायचा संकल्प करायचा. गावोगावी ह्या जगद्गुरुची आश्वासने पोचवून निद्रीस्तांना जागृत करायचे व मेलेल्यांना संजीवनी पाजायची.

ज्याने भारतीय संस्कृतीच्या वृक्षाला स्वतःच्या रक्त सिंचनाने वाढविले आहे, पोसले आहे अशा या जगद्गुरुचे आपणावर फार मोठे ऋण आहे. या ऋणाचा विचार करून कृतज्ञभावाने त्याचे कार्य करण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. गीतेच्या ज्योतीने झोपडी झोपडी प्रकाशित करणाराच श्रीकृष्णाचा खरा उपासक होय.

खरी गुरुपूजा करता करता गुरुजीवनाचा गौरव आपल्या जीवनात प्रगटावा, हीच सद्गुरु व जगद्गुरु असलेल्या श्रीकृष्णचरणकमली प्रार्थना..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

 ( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक