शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

ज्ञान योग म्हणजे पुस्तकी ज्ञान नव्हे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 15:47 IST

ज्ञान म्हणजे एखादे तत्वज्ञान नसून ती आपली बुद्धी इतकी तल्लख करण्याची प्रक्रिया आहे जी “जीवनाच्या प्रक्रियेला आरपार भेदून खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला दाखवून देईल” असे सद्गुरू इथे आपल्याला समजून सांगतात.

सद्गुरू: तत्वचिंतन म्हणजे ज्ञान नव्हे; ज्ञान म्हणजे “जाणून घेणे”. दुर्दैवाने तत्वज्ञान हेच आजकाल ज्ञान-योग म्हणून खपवले जात आहे. मूलत:, तुम्हाला जर ज्ञान मार्गावर जायचे असेल तर तुमच्याकडे अतिशय सतर्क आणि तल्लख बुद्धी असणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी तुम्ही तुमच्या बुद्धीला हळूहळू इतके तीक्ष्ण केले पाहिजे की ती अगदी तल्लख व्हायला हवी. कुठलीच गोष्ट तिच्याकडून सुटायला नको. ती प्रत्येक गोष्टीला भेदून जायला हवी पण त्याच वेळी कुठलीच गोष्ट तिला चिकटायला नको; आसपास घडणार्‍या कोणत्याच गोष्टीने ती प्रभावित व्ह्यायला नको. हेच ज्ञान आहे.

तुम्ही जर तुमच्या बुद्धीला अश्या अवस्थेत ठेऊ शकलात तर ती सहजिकपणे जीवनाच्या प्रक्रियेला आरपार भेदून खरं काय आणि खोटं काय, वास्तव काय आणि भ्रम काय हे तुम्हाला दाखवून देईल. पण आजकाल लोक थेट निष्कर्षापर्यंत जाऊन पोचलेत. त्यांनी तत्वज्ञान रचून ठेवलेत. ते खुलेआम म्हणतात “सर्वकाही माया आहे. सर्वकाही भ्रम आहे, मग काळजी कशाला करायची?” ते स्वत:चं फक्त सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जेव्हा माया खरोखरच त्यांच्या मानगुटीवर बसते तेव्हा त्यांचे सर्व तत्वज्ञान हवेत विरून जाते.

एका तत्वचिंतकाच्या बाबतीत ही घटना घडली: तो मोठ्या छातीठोक पणे सांगत असे “सर्वकाही माया आहे, कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही अनुभवत असलेलं सर्व जग एक भ्रम आहे.” एकदा असं झालं – तो त्याच्या दोन भिक्षुंसोबात चाल्ला होता. एक पिसाळलेलं माकड चवताळून त्याच्या मागे लागलं. तो तत्वचिंतक किंचाळला आणि जोरात धावत सुटला. थोड्या वेळाने त्या माकडाला दुसरी काहीतरी आकर्षक वस्तु दिसली आणि त्याने त्या तत्वचिंतकाचा पिच्छा सोडला आणि तिथून निघून गेला. तो तत्वचिंतक थांबला आणि मग त्याच्या लक्षात आलंकी त्याची माया वगैरे ची सगळी शिकवण अचानक गळून पडली. “माकड माया आहे. माकडाचा पागलपणा माया आहे. माकड मला चावेल, हीसुद्धा मायाच आहे. मग मी असा का पळालो?” त्या क्षणी ही गोष्ट त्याला इतक्या तीव्रपणे जाणवली की त्यानंतर तो पुर्णपणे बदलून गेला.

जग एक भ्रम आहे असं म्हणणे, सृष्टी आणि सृष्टीकर्त्याबद्दल चर्चा करणे किंवा जग असं आहे अन् तसं आहे अश्या गप्पा करणे याला ज्ञान म्हणत नाही. ज्ञानयोगी कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवण्याचा किंवा कुठल्याच गोष्टीशी स्वत:ची ओळख बांधण्याचा धोका पत्करू शकत नाहीत. ज्याक्षणी ते तसं करतात त्याच क्षणी त्यांच्या बुद्धीची तल्लखता आणि तिची परिणामकारकता संपुष्टात येते. दुर्दैवाने ज्ञानाच्या नावाखाली लोक अश्या बर्‍याच गोष्टींवर नुसताच विश्वास ठेवत आहेत जसे “मी आत्मा आहे, मी परमात्मा आहे”. या विश्वाची रचना कशी आहे, आत्म्याचं रूप आणि आकार कसा आहे, तो मुक्त कसा होईल, अशा कितीतरी गोष्टींबद्दल फक्त पुस्तकं वाचून हे लोक स्वत:च्या मनात अनेक धारणा बनवत असतात. याला ज्ञानयोग म्हणत नाहीत कारण तुम्ही काही गोष्टींवर फक्त विश्वास ठेवत आहात. ज्ञानयोगाच्या मार्गावर चालणारे लोक अश्या बुद्धीचे असतात की ते कुठल्याच गोष्टीवर नुसता विश्वास ठेवत नाही आणि कुठल्याच गोष्टीवर अविश्वासही ठेवत नाहीत. “जे मला माहीती आहे, तेवढंच मला माहीती आहे. जे मला माहीती नाही, ते मला माहिती नाही.” – हेच ज्ञान आहे.