शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Mahabharata: महाभारत युद्धात एका क्षणी हनुमान-कर्ण आले आमनेसामने; श्रीकृष्ण मधे पडले नसते तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 20:44 IST

महाभारत युद्धात असा एक क्षण आला की, हनुमंत आणि कर्ण एकमेकांसमोर उभे ठाकले. हनुमंत कसे शांत झाले? श्रीकृष्णांनी कशी मध्यस्थी केली? जाणून घेऊया...

संपूर्ण महाभारत नीती, तत्त्वज्ञान, कुरघोडी, राजकारण, पराक्रम, शौर्य, संयम, धर्म या गोष्टींनी भारलेले आहे. कलियुगाची सुरुवात होण्याच्या ६ महिने आधी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला महाभारताच्या युद्धाचा आरंभ झाला होता, ते १८ दिवस चालले होते. सप्तचिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त असलेले हनुमंत श्रीरामाच्या आज्ञेवरून पुढील अवतार असलेल्या श्रीकृष्णांच्या सेवेला सदैव हजर असायचे, असे सांगितले जाते. हनुमंतांना कोणतेही शस्त्र भेदणार नाही, असे वरदान असल्यामुळे श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून हनुमंत अर्जुनाच्या रथाच्या वरील भागात विराजमान झाले होते. मात्र, महाभारत युद्धात असा एक क्षण आला की, हनुमंत आणि कर्ण एकमेकांसमोर उभे ठाकले. हनुमंत कसे शांत झाले? श्रीकृष्णांनी कशी मध्यस्थी केली? जाणून घेऊया...

महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर बसलेले हनुमान मधेच उभे राहून कौरवांच्या सैन्यावर टक लावून पहायचे. हनुमंतांची नजर पडताच कौरवांचे सैन्य वादळाच्या वेगाने रणांगण सोडून पळून जायचे. महाभारतात हनुमंतांनी कोणाशीही युद्ध केले नाही. आपल्या आराध्यांचे रक्षण करणे, हेच प्रमुख कर्तव्य ते बजावत होते. हनुमान प्रचंड पराक्रमी आणि अतिशय बुद्धिमान होते. महाभारतात त्यांची जबाबदारी अतिशय निराळी होती.

आत्मविश्वास वाढवण्यासाठी या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा आणि आचरणात आणा!

कर्णाच्या बाणांमुळे श्रीकृष्णाचे सुरक्षा कवच मोडून पडले

अर्जुनापुढे कुणाचाच टिकाव लागत नव्हता. अखेर कर्ण आणि अर्जुन यांच्यात युद्ध सुरू झाले. कर्ण अर्जुनावर एकसारखा अत्यंत भयंकर बाणांचा वर्षाव करत होता. त्यातील काही बाण श्रीकृष्णालाही लागत होते. कर्णाच्या बाणांमुळे श्रीकृष्णाच्या अंगांवरील सुरक्षा कवच मोडून पडले. त्यामुळे काही बाण श्रीकृष्णाला लागत होते. रथाच्या वरील बाजूस बसलेले हनुमान आपले आराध्य श्रीकृष्णाकडे पाहत बसले होते. अखेर एका क्षणी हनुमानाला हे सहन नाही झाले आणि हमुमानाने भयंकर मोठी गर्जना केली.

मधल्या बोटात अंगठी घालावी की घालू नये? ज्योतिषशास्त्र काय सांगते?

हनुमंता, राग प्रकट करण्याची योग्य वेळ नाही

हनुमानाने केलेल्या भयंकर गर्जनेमुळे विश्वाचा स्फोट झाला, असेच काही क्षण वाटू लागले होते. हनुमंतांचा क्रोध पाहून कर्णाच्या हातातील धनुष्यबाण खाली पडले. हे पाहून श्रीकृष्ण ताबडतोब उठले. हात उंचावत हनुमंतांना केवळ स्पर्श केला. श्रीकृष्ण म्हणाले की, हनुमंता, तुझा राग प्रकट करण्याची ही योग्य वेळ नाही. श्रीकृष्णांच्या सांगण्यावरूनही हनुमंतांचा राग शांत होत नव्हता.

विचार बदला, नशीब बदलेल...तुमचेही व इतरांचेही; वाचा ही मजेशीर गोष्ट!

केवळ तुझ्या दृष्टीचा सामनाही कर्ण करू शकत नाही

कर्णाच्या कृतीमुळे हनुमंत खूपच नाराज झाले होते. कर्णाकडे हनुमान नजर रोखून पाहात होते. तेवढ्यात श्रीकृष्ण मोठ्याने ओरडून हनुमंतांना म्हणाले की, हनुमाना, जर आणखी काही काळ तू असेच कर्णाकडे पाहत बसलास तर कर्ण तुझ्या दृष्टीरोखानेच मारला जाईल. या युद्धात मी तुला शांत बसण्यास सांगितले आहे.

शुक्र-मंगळाचा कर्क राशीत संयोग; ‘या’ ८ राशींना उत्तम लाभदायक

हनुमंत भानावर येऊन नतमस्तक झाले

हनुमाना, तुझ्या पराक्रमाला तोड नाही. मात्र, हे त्रेतायुग नाही, श्रीकृष्णाचे हे शब्द ऐकताच हनुमान एकदम भानावर आले. ते शांत झाले आणि पुन्हा रथाच्या वरच्या भागावर जाऊन बसले. महाभारत युद्धात हनुमंतांमुळे अर्जुनाला कोणतीही इजा झाली नाही. त्रेतायुगाप्रमाणे, द्वापारयुगातही हनुमानाने अप्रत्यक्ष पराक्रमातून आपल्या आराध्याचे संरक्षणच केले. महाभारताचे संपूर्ण युद्ध संपल्यावर श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून हनुमान रथ सोडून खाली आले आणि अर्जुनाचा रथ एका क्षणात भस्म झाला, असे सांगितले जाते. 

 

टॅग्स :Mahabharatमहाभारत