शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

Mahabharata: महाभारत युद्धात एका क्षणी हनुमान-कर्ण आले आमनेसामने; श्रीकृष्ण मधे पडले नसते तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 20:44 IST

महाभारत युद्धात असा एक क्षण आला की, हनुमंत आणि कर्ण एकमेकांसमोर उभे ठाकले. हनुमंत कसे शांत झाले? श्रीकृष्णांनी कशी मध्यस्थी केली? जाणून घेऊया...

संपूर्ण महाभारत नीती, तत्त्वज्ञान, कुरघोडी, राजकारण, पराक्रम, शौर्य, संयम, धर्म या गोष्टींनी भारलेले आहे. कलियुगाची सुरुवात होण्याच्या ६ महिने आधी मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला महाभारताच्या युद्धाचा आरंभ झाला होता, ते १८ दिवस चालले होते. सप्तचिरंजीवांपैकी एक असलेल्या रामभक्त असलेले हनुमंत श्रीरामाच्या आज्ञेवरून पुढील अवतार असलेल्या श्रीकृष्णांच्या सेवेला सदैव हजर असायचे, असे सांगितले जाते. हनुमंतांना कोणतेही शस्त्र भेदणार नाही, असे वरदान असल्यामुळे श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून हनुमंत अर्जुनाच्या रथाच्या वरील भागात विराजमान झाले होते. मात्र, महाभारत युद्धात असा एक क्षण आला की, हनुमंत आणि कर्ण एकमेकांसमोर उभे ठाकले. हनुमंत कसे शांत झाले? श्रीकृष्णांनी कशी मध्यस्थी केली? जाणून घेऊया...

महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर बसलेले हनुमान मधेच उभे राहून कौरवांच्या सैन्यावर टक लावून पहायचे. हनुमंतांची नजर पडताच कौरवांचे सैन्य वादळाच्या वेगाने रणांगण सोडून पळून जायचे. महाभारतात हनुमंतांनी कोणाशीही युद्ध केले नाही. आपल्या आराध्यांचे रक्षण करणे, हेच प्रमुख कर्तव्य ते बजावत होते. हनुमान प्रचंड पराक्रमी आणि अतिशय बुद्धिमान होते. महाभारतात त्यांची जबाबदारी अतिशय निराळी होती.

आत्मविश्वास वाढवण्यासाठी या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा आणि आचरणात आणा!

कर्णाच्या बाणांमुळे श्रीकृष्णाचे सुरक्षा कवच मोडून पडले

अर्जुनापुढे कुणाचाच टिकाव लागत नव्हता. अखेर कर्ण आणि अर्जुन यांच्यात युद्ध सुरू झाले. कर्ण अर्जुनावर एकसारखा अत्यंत भयंकर बाणांचा वर्षाव करत होता. त्यातील काही बाण श्रीकृष्णालाही लागत होते. कर्णाच्या बाणांमुळे श्रीकृष्णाच्या अंगांवरील सुरक्षा कवच मोडून पडले. त्यामुळे काही बाण श्रीकृष्णाला लागत होते. रथाच्या वरील बाजूस बसलेले हनुमान आपले आराध्य श्रीकृष्णाकडे पाहत बसले होते. अखेर एका क्षणी हनुमानाला हे सहन नाही झाले आणि हमुमानाने भयंकर मोठी गर्जना केली.

मधल्या बोटात अंगठी घालावी की घालू नये? ज्योतिषशास्त्र काय सांगते?

हनुमंता, राग प्रकट करण्याची योग्य वेळ नाही

हनुमानाने केलेल्या भयंकर गर्जनेमुळे विश्वाचा स्फोट झाला, असेच काही क्षण वाटू लागले होते. हनुमंतांचा क्रोध पाहून कर्णाच्या हातातील धनुष्यबाण खाली पडले. हे पाहून श्रीकृष्ण ताबडतोब उठले. हात उंचावत हनुमंतांना केवळ स्पर्श केला. श्रीकृष्ण म्हणाले की, हनुमंता, तुझा राग प्रकट करण्याची ही योग्य वेळ नाही. श्रीकृष्णांच्या सांगण्यावरूनही हनुमंतांचा राग शांत होत नव्हता.

विचार बदला, नशीब बदलेल...तुमचेही व इतरांचेही; वाचा ही मजेशीर गोष्ट!

केवळ तुझ्या दृष्टीचा सामनाही कर्ण करू शकत नाही

कर्णाच्या कृतीमुळे हनुमंत खूपच नाराज झाले होते. कर्णाकडे हनुमान नजर रोखून पाहात होते. तेवढ्यात श्रीकृष्ण मोठ्याने ओरडून हनुमंतांना म्हणाले की, हनुमाना, जर आणखी काही काळ तू असेच कर्णाकडे पाहत बसलास तर कर्ण तुझ्या दृष्टीरोखानेच मारला जाईल. या युद्धात मी तुला शांत बसण्यास सांगितले आहे.

शुक्र-मंगळाचा कर्क राशीत संयोग; ‘या’ ८ राशींना उत्तम लाभदायक

हनुमंत भानावर येऊन नतमस्तक झाले

हनुमाना, तुझ्या पराक्रमाला तोड नाही. मात्र, हे त्रेतायुग नाही, श्रीकृष्णाचे हे शब्द ऐकताच हनुमान एकदम भानावर आले. ते शांत झाले आणि पुन्हा रथाच्या वरच्या भागावर जाऊन बसले. महाभारत युद्धात हनुमंतांमुळे अर्जुनाला कोणतीही इजा झाली नाही. त्रेतायुगाप्रमाणे, द्वापारयुगातही हनुमानाने अप्रत्यक्ष पराक्रमातून आपल्या आराध्याचे संरक्षणच केले. महाभारताचे संपूर्ण युद्ध संपल्यावर श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून हनुमान रथ सोडून खाली आले आणि अर्जुनाचा रथ एका क्षणात भस्म झाला, असे सांगितले जाते. 

 

टॅग्स :Mahabharatमहाभारत