शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

Gautam Buddha Panchsheel: सुखमय, समृद्ध जीवनासाठी गौतम बुद्धांच्या ‘या’ ५ गोष्टींचे आचरण आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 12:42 IST

Gautam Buddha Panchsheel: गौतम बुद्धांनी सांगितलेले पंचशील कोणते? चांगले जीवन जगण्यासाठी नेमके काय करावे? जाणून घ्या...

सुखी, समृद्धी आणि आनंददायी जीवनासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. कोणत्याही वयोगटातील, समाजाच्या कोणत्याही स्तरातील व्यक्तीला शांततामय आणि चांगले जीवन हवे असते. त्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. ताण-तणाव विरहीत जीवन जगता यावे, यासाठी माणूस कायम काही ना काही करत असतो. आपल्याला सुख, समाधान मिळाले आले नाही, तर किमान आपल्या मुलांना मिळावे, म्हणून मेहनत, परिश्रम घेत असतो. जीवनात सुख, समृद्धी, आनंद हवा असेल, तर गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पाच गोष्टींचे आचरण, पालन आवर्जुन करावे, असे म्हटले जाते. खुद्द गौतम बुद्धांनी एका प्रसंगात त्या पाच गोष्टी कोणत्या हे समजावून सांगितले आहे. जाणून घेऊया...

मर्यादेचे ‘लॉक’ आणि अपेक्षा ‘डाऊन’; सुखी, समृद्ध जीवनाचे सोपान

यश नावाचा एक तरुण बनारस येथील श्रीमंत घरात, अगदी सुखात वाढला होता. त्याच्या वडिलांचे नाव श्रेष्ठ होते. यशच्या घरात सुख, सोयी, समृद्धी यांची बिलकूल कमतरता नव्हती. एका रात्री मित्रांसोबत जेवण केल्यानंतर नृत्य पाहता पाहता तेथेच त्याचा डोळा लागला. मध्यरात्री अचानक त्याला जाग आली. पाहतो तर, त्याचे मित्र नर्तकींसोबत बेधुंद अवस्थेत पडले होते. ते दृश्य पाहून त्याला या सर्व प्रकाराची घृणा वाटू लागली. तत्काळ तो तेथून निघाला आणि वाट मिळेल तेथे धावत सुटला. जंगलात खूप वेळ भटकल्यानंतर एका झाडाखाली गौतम बुद्ध ध्यानस्थ बसलेले दिसले. यश त्यांच्यापाशी गेला आणि गौतम बुद्धांना सांगू लागला की, या जगात सर्वकाही घृणास्पद आहे. चांगले काहीच नाही.

यशचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. नेमका प्रकार जाणून घेतला आणि गौतम बुद्ध त्याला म्हणाले की, जगभरात अनेकविध चांगल्या गोष्टी आहेत. वृक्षांची सुंदरता पाहा. नदी, पर्वत, तारे-तारका, चंद्र आणि सूर्यही पाहा. पक्षांची किलबिल, वाऱ्याचा मंजूळ ध्वनी, खळाळत्या पाण्याचा नाद. या सर्वांतून आपल्याला निखळ, निर्मळ आनंद मिळतो. निसर्गाच्या या अद्भूत सौंदर्याला अजून आपण नीटसे पाहिलेले दिसत नाही. केवळ आजूबाजूच्या गोष्टींवरून तर्क लावणे चुकीचे आहे. आपल्या जीवनातील दुःख हे चुकीचे आचरण आणि चुकीच्या धारणा यांमुळे अधिक येते, असे गौतम बुद्ध म्हणाले. 

'हे' आहेत समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले ११ मारुती

यशचे वडील त्याला शोधत शोधत आले. गौतम बुद्धांच्या विचारांनी तेही प्रभावित झाले आणि त्या दोघांनी बुद्धांचे शिष्यत्व पत्करले. सुखी जीवन जगायचे असेल, तर कोणत्या गोष्टींचे आचरण आवश्यक आहे, असे गौतम बुद्धांना विचारले असता, ते म्हणाले की, अहिंसा, अचोर्य म्हणजे चोरी न करणे, इंद्रिय भोग विरक्ती, असत्य कथन न करणे आणि मदिरा म्हणजेच उत्तेजक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे. या पाच गोष्टींचे आचरण केल्यास आपण नेहमी सुखमय जीवन जगू शकाल, असे गौतम बुद्धांनी सांगितले. गौतम बुद्धांच्या याच आचरणांना पंचशील म्हटले जाते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी