शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

स्वामींचे लाडके शिषोत्तम; मोहातून मुक्तीचा मार्ग दाखवणारे श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 17:07 IST

Shri Krishna Saraswati Kumbhar Swami Maharaj Jayanti 2024: श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंती आहे.

Shri Krishna Saraswati Kumbhar Swami Maharaj Jayanti 2024: माघ महिन्यातील कृष्ण पंचमीला श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांची जयंती असते. यंदा सन २०२४ मध्ये गुरुवार, २९ फेब्रुवारी रोजी श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंती आहे. श्रीकृष्ण सरस्वती महाराज हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्य होते, असे म्हटले जाते. गुरुवार हा दिवस दत्तगुरू, स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. त्यामुळे त्यांचेच शिष्य असलेल्या श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांचा जयंतीदिन याच दिवशी आल्याने या दिवसाचे महत्त्व वाढल्याचे सांगितले जाते. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांच्या जीवनचरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा...

राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम, प.पू.सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज दत्त संप्रदायातील ते एक थोर सत्पुरुष होते. सांप्रदायिक श्रद्धेनुसार स्वामीजी दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात. कोल्हापुरातील कुंभार आळीत वास्तव्यास असल्याने ते मुख्यत: कुंभारस्वामी या नावाने ओळखले जात असत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावी राहणाऱ्या वे.मू. अप्पा जोशी व अन्नपूर्णाबाई या सत्शील दांपत्याच्या पोटी, अपार दत्तसेवेचे फळ म्हणून ७ फेब्रुवारी १८३६, माघ कृष्ण पंचमीला श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचा जन्म झाला. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी बालपणीपासूनच अलौकिक लीला करीत असत.

स्वामी समर्थांची आज्ञा आणि श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचे अवतारकार्य

तरुणपणी ते सद्गुरुभेटीच्या ओढीने अक्कलकोटला गेले. इकडे श्री स्वामी समर्थ महाराज सारखे, "माझा कृष्णा येणार !" असे म्हणत खुशीत होते. श्रीकृष्ण स्वामी अक्कलकोटाच्या वेशीजवळ पोचले नाहीत तोवरच स्वामी महाराज मठातून घाईने निघाले. लहानग्या श्रीकृष्णाचा हात धरून ते जवळच्या जंगलात गेले. ते दोघेही देहाचा व्यापार विसरले. नृसिंहभान सावध झाले. समोर कृष्णाला पाहिले. त्याच्या पाठीवर हात फिरवून म्हणाले की, बाळा, सावध हो. अजून खूप कार्य करावयाचे आहे. तेव्हा आत्ताच हे उचित नाही. आता आमचे वसतिस्थान गाणगापुरी राहिले. आम्ही तेथे तीन महिने राहू. तुमच्याकडे एक सांगाती येईल. त्याला बरोबर घेऊन करवीर नगरीत जावे. तोपर्यंत येथेच रहावे. यावर, कृष्ण म्हणाला, तुमची आज्ञा ती प्रमाण. यानंतर तब्बल सात दिवसांनी हे दोघे गुरु-शिष्य परत आले. थोड्याच दिवसांनी सलग रात्रंदिवस याप्रमाणे दोन दिवस रस्ता क्रमीत श्रीकृष्ण सरस्वती स्वामी करवीरक्षेत्रात आले व राममंदिरात त्यांनी वस्ती केली. अद्याप हे राममंदिर करवीरक्षेत्री आहे. श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या लीला अद्भुत आहेत. ते बालोन्मत्तपिशाचवत् राहात असत. ते कुंभार गल्ली मध्ये राहात असत, म्हणून त्यांना "कुंभारस्वामी" असेही म्हटले जाते.

स्वामीजींनी भक्तांसाठी अनेक चमत्कार केल्याचे उल्लेख आढळतात

श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी आपले सर्व आयुष्य कोल्हापूर येथील कुंभार आळीतील ताराबाई शिर्के यांच्या घरी व्यतीत केले. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंपासून मानवास मुक्त करणे व त्याचे देवस्वरूप दाखविण्याचे काम श्रीकृष्ण सरस्वती स्वामी यांनी केले. या वाड्याला स्वामीजींनी वैराग्यमठी असे नाव दिले. स्वामीजी अखंड बालभावात राहत असत. स्वामीजींनी भक्तांसाठी अनेक चमत्कार केल्याचे उल्लेख ग्रंथात आढळून येतात. गाणगापूर व नरसोबाची वाडी येथे तप करणाऱ्या अनेक भक्तांना प्रत्यक्ष दत्तगुरूंनी स्वप्नदृष्टांत देऊन, करवीर येथे मी कुंभार स्वामी या नावानी अवतार घेतला असून तेथे जावे, असे सांगितले. स्वामीजी त्यांना भेटत असत व काही वाक्ये बोलून खूण पटवत असत. स्वामी कोल्हापूर सोडून कधीही बाहेर जात नसत. मात्र, अनेकदा नरसोबाच्या वाडीस काही लोकांना स्वामींची भेट होत असे. तसेच अक्कलकोटवासी स्वामी समर्थांनी अवतारकार्य समाप्त केल्यानंतर काही भक्तांना, मी कुंभारस्वामी या नावाने कोल्हापूर येथे आहे, असे दृष्टांत स्वामी समर्थांनी दिल्याच्या आख्यायिका आहेत. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी त्या भक्तांना अक्कलकोट स्वामी स्वरूपात दर्शन दिल्याच्या घटना घडलेल्या आहेत, असे मानले जाते.

अवतार समाप्ती अन् थोर सद्गुरुपरंपरा

श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज श्रावण वद्य दशमी म्हणजेच २० ऑगस्ट १९०० रोजी समाधीस्त झाले. स्वामींचे संपूर्ण चरित्र, स्वामींचे कोल्हापुरातील शिष्य गणेश नारायण मुजुमदार यांनी लिहिले असून, ते 'श्रीकृष्ण विजय' या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या भक्तांनी त्यांच्याच दृष्टांतानुसार आणखी एक मठ गंगावेशीपाशी बांधला, त्याला "निजबोध मठी" म्हणतात. प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांची श्रीगुरुपरंपरा, श्रीकृष्ण सरस्वती स्वामींपासूनच सुरू होते. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज - प.पू.श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज, कोल्हापूर - प.पू.धोंडीबुवा महाराज, पलूस - प.पू.श्रीकृष्णदेव महाराज, पुसेसावळी - प.पू.श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज, फलटण - प.पू.बागोबा कुकडे महाराज, दौंड ; अशी ही थोर सद्गुरुपरंपरा आहे.

श्रीकृष्णसरस्वती दत्ता जय जय कृष्णसरस्वती दत्ता।श्रीसमर्था जय गुरुदत्ता अनाथांच्या नाथा।। 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकkolhapurकोल्हापूर