शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय!'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 29, 2020 07:30 IST

चांगल्या गोष्टी आत्मसात करणे, ही जर साधकाची वृत्ती असेल, तर त्याला पावलोपावली गुरु भेटतील.

ज्योत्स्ना गाडगीळ 

जो ज्ञान देतो, तो गुरु. ते ज्ञान व्यावहारिक असेल, पारमार्थिक असेल, प्रापंचिक असेल, नाहीतर अन्य कोणतेही असेल. चांगल्या गोष्टी आत्मसात करणे, ही जर साधकाची वृत्ती असेल, तर त्याला पावलोपावली गुरु भेटतील. मात्र, जो स्वत:च्या अभिमानापुढे इतरांना तुच्छ लेखतो, त्याला गुरुंची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. नम्र होणे, हा गुरुप्राप्तीचा कानमंत्र आहे. 

असेच एक महान तपस्वी चांगदेव, योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे. त्यांच्या गुरूचे नाव वटेश्वर, म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप. तापी-पूर्णा नदीच्या तीरावर गावाजवळच्या वनात, चांगदेव डोळे बंद करून तपश्चर्या करीत  योगी झाले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले. त्यांचे योगसामथ्र्य पाहून त्यांचा भला मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. 

हेही वाचा : मी मेल्याशिवाय देव दिसणार नाही- रामकृष्ण परमहंस!

एकदा तीर्थाटन करत असताना त्‍यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची कीर्ती पडली आणि त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली. ते ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी निघाले. आपले योगसामथ्र्य आणि शिष्य परिवार दाखवावा, या हेतून त्यांनी लवाजमाही सोबत घेतला. मात्र, आपणहून एवढ्याशा पोराची भेट काय घ्यायची, त्यापेक्षा त्याला आपल्या येण्याची वर्दी देऊ, म्हणजे तो आपणहून भेटायला येईल आणि आपला मान वाढेल, या विचाराने चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र पाठवायचे ठरवले.

त्यांनी पत्र लिहायला घेतले, पण मायना काय लिहावा या संभ्रमात पडले. आदरणीय म्हणावे, तर आपला मान कमी होतो, चिरंजीव म्हणावे तर त्यांचा अपमान होतो. अशा द्वंद्वात असताना त्यांनी कोरेच पत्र पाठविले. ते पत्र ज्ञानेश्वरांकडे येऊन पोहोचले. पत्रावर काहीच मजकूर नाही, असे ज्ञानेश्वरांनी म्हटल्यावर मुक्ताईने पत्र हाती घेतले. पत्राच्या दोन्ही बाजू नीट पाहिल्या आणि हसून म्हणाली, 'एवढा मोठा चांगदेव, पण कोरा रे, कोराच राहिला!' मुक्ताईच्या बोलण्यात व्यावहार ज्ञानाबद्दल 'कोरा' असा उल्लेख नसून पारमार्थिक ज्ञानाबद्दल होता. 

योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे, असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले, ते `चांगदेव पासष्टी' या नावाने प्रसिद्ध झाले. हे पत्र देण्यासाठी आणि चांगदेवांची भेट घेण्यासाठी चारही भावंडे बसल्या भिंतीला गती देत निघाली. आकाशमार्गे ही अनोखी स्वारी येताना पाहिली आणि अचल भिंतीला ज्ञानेश्वरांनी चैतन्य दिले, हे पाहून, त्यांच्याठायी असलेली सिद्धी ओळखून चांगदेवांनी शरणागती पत्करली. चांगदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली. 

चांगदेवांनी ज्ञानेश्वरांच्या चमत्कारासमोर नमस्कार केला नाही, तर निर्जीव वस्तुंना चैतन्य देण्याचे आणि रेड्यासाख्या जडमती असलेल्या लोकांकडून वेद वदवून घेण्याचे ज्ञानेश्वरांचे सामर्थ्य त्यांनी ओळखले. अहंकार दूर झाला आणि तिथल्या तिथे त्यांनी माऊलींना गुरु केले. त्यांच्या आध्यात्मिक कोऱ्या पाटीचा श्रीगणेशा मुक्ताईने केला, म्हणून चांगदेवांनी मुक्ताईला गुरू मानले. संत सहवासाने चांगदेवांचा उद्धार झाला, तसा आपलाही उद्धार व्हावा असे वाटत असेल, तर आपणही अहंकार दूर सारून सद्गुरुंना शरण गेले पाहिजे.

हेही वाचा : सुखी माणसाचा सदरा मिळेल का? 

टॅग्स :sant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर