शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय!'

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 29, 2020 07:30 IST

चांगल्या गोष्टी आत्मसात करणे, ही जर साधकाची वृत्ती असेल, तर त्याला पावलोपावली गुरु भेटतील.

ज्योत्स्ना गाडगीळ 

जो ज्ञान देतो, तो गुरु. ते ज्ञान व्यावहारिक असेल, पारमार्थिक असेल, प्रापंचिक असेल, नाहीतर अन्य कोणतेही असेल. चांगल्या गोष्टी आत्मसात करणे, ही जर साधकाची वृत्ती असेल, तर त्याला पावलोपावली गुरु भेटतील. मात्र, जो स्वत:च्या अभिमानापुढे इतरांना तुच्छ लेखतो, त्याला गुरुंची प्राप्ती कधीच होऊ शकत नाही. नम्र होणे, हा गुरुप्राप्तीचा कानमंत्र आहे. 

असेच एक महान तपस्वी चांगदेव, योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे. त्यांच्या गुरूचे नाव वटेश्वर, म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप. तापी-पूर्णा नदीच्या तीरावर गावाजवळच्या वनात, चांगदेव डोळे बंद करून तपश्चर्या करीत  योगी झाले होते. त्यांच्या चांगल्या रूपावरून लोक त्यांना चांगदेव म्हणू लागले. त्यांचे योगसामथ्र्य पाहून त्यांचा भला मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. 

हेही वाचा : मी मेल्याशिवाय देव दिसणार नाही- रामकृष्ण परमहंस!

एकदा तीर्थाटन करत असताना त्‍यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची कीर्ती पडली आणि त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली. ते ज्ञानेश्वरांच्या भेटीसाठी निघाले. आपले योगसामथ्र्य आणि शिष्य परिवार दाखवावा, या हेतून त्यांनी लवाजमाही सोबत घेतला. मात्र, आपणहून एवढ्याशा पोराची भेट काय घ्यायची, त्यापेक्षा त्याला आपल्या येण्याची वर्दी देऊ, म्हणजे तो आपणहून भेटायला येईल आणि आपला मान वाढेल, या विचाराने चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र पाठवायचे ठरवले.

त्यांनी पत्र लिहायला घेतले, पण मायना काय लिहावा या संभ्रमात पडले. आदरणीय म्हणावे, तर आपला मान कमी होतो, चिरंजीव म्हणावे तर त्यांचा अपमान होतो. अशा द्वंद्वात असताना त्यांनी कोरेच पत्र पाठविले. ते पत्र ज्ञानेश्वरांकडे येऊन पोहोचले. पत्रावर काहीच मजकूर नाही, असे ज्ञानेश्वरांनी म्हटल्यावर मुक्ताईने पत्र हाती घेतले. पत्राच्या दोन्ही बाजू नीट पाहिल्या आणि हसून म्हणाली, 'एवढा मोठा चांगदेव, पण कोरा रे, कोराच राहिला!' मुक्ताईच्या बोलण्यात व्यावहार ज्ञानाबद्दल 'कोरा' असा उल्लेख नसून पारमार्थिक ज्ञानाबद्दल होता. 

योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे, असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले, ते `चांगदेव पासष्टी' या नावाने प्रसिद्ध झाले. हे पत्र देण्यासाठी आणि चांगदेवांची भेट घेण्यासाठी चारही भावंडे बसल्या भिंतीला गती देत निघाली. आकाशमार्गे ही अनोखी स्वारी येताना पाहिली आणि अचल भिंतीला ज्ञानेश्वरांनी चैतन्य दिले, हे पाहून, त्यांच्याठायी असलेली सिद्धी ओळखून चांगदेवांनी शरणागती पत्करली. चांगदेव, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई व सोपान यांची भेट झाली. 

चांगदेवांनी ज्ञानेश्वरांच्या चमत्कारासमोर नमस्कार केला नाही, तर निर्जीव वस्तुंना चैतन्य देण्याचे आणि रेड्यासाख्या जडमती असलेल्या लोकांकडून वेद वदवून घेण्याचे ज्ञानेश्वरांचे सामर्थ्य त्यांनी ओळखले. अहंकार दूर झाला आणि तिथल्या तिथे त्यांनी माऊलींना गुरु केले. त्यांच्या आध्यात्मिक कोऱ्या पाटीचा श्रीगणेशा मुक्ताईने केला, म्हणून चांगदेवांनी मुक्ताईला गुरू मानले. संत सहवासाने चांगदेवांचा उद्धार झाला, तसा आपलाही उद्धार व्हावा असे वाटत असेल, तर आपणही अहंकार दूर सारून सद्गुरुंना शरण गेले पाहिजे.

हेही वाचा : सुखी माणसाचा सदरा मिळेल का? 

टॅग्स :sant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वर