शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Jyeshtha Amavasya 2025: अमावस्या तिथी शुभ मानावी की अशुभ? जाणून घेऊया संदर्भ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 17:31 IST

Amavasya Good or Bad Day: २५ जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे, मात्र २४ जून रोजी अमावास्या तिथी सुरू होत असल्याने या विषयाशी निगडीत माहिती जाणून घ्या.

Jyeshtha Amavasya 2025: 'एक भयाण रात्र होती...अमावस्येची! सर्वत्र अंधार...सगळ्या काळ्या जादुई शक्ती सज्ज झाल्या होत्या...आणि मग....'' भयकथांची अशी सुरुवात उत्कंठावर्धक असली, तरी ती कुठेतरी मनावर नकारात्मक परिणाम करणारी ठरते. अमावस्येची रात्र अशुभ असते, नकारात्मक शक्तींनी व्यापलेली असते वगैरे विचार आपल्या मनात थैमान घालू लागतात आणि आपण घाबरून अमावस्येच्या तिथीला अशुभ असे लेबल लावून मोकळे होतो. पण ती खरंच अशुभ असते का? २५ जून रोजी ज्येष्ठ अमावास्या आहे, त्यानिमित्त हा लेखनप्रपंच!

Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

अमावस्या या तिथीला अनेक जण अशुभ मानतात. उलट तसे मानण्याचे काहीच कारण नाही. निसर्ग हा आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दर्शवतो. जगण्याला उम्मेद देतो. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र आल्हाददायक वाटतो, तसा बीजेचा चंद्र शीतल वाटतो. अमावस्येला तो नाहीसा होतो. कलेकलेलने वाढत जाणे आणि कलेकलेने कमी होत जाणे हा नियम जसा निसर्गाला आहे तसा मानवालासुद्धा आहे, हे आपल्याला अमावस्येची रात्र शिकवते! 

ज्याप्रमाणे कोणीही मनुष्य एका रात्रीत प्रसिद्ध होत नाही आणि झालाच तर ती प्रसिद्धी फार काळ टिकत नाही. मात्र कलेकलेने ज्यांची प्रगती होते ते एक ना एक दिवस पौर्णिमेच्या चंद्रासारखे आकाश व्यापून टाकतात. सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मात्र ही स्थिती देखील फार काळात राहत नाही. कलेकलेने चन्द्र अस्त पावतो आणि अमावस्येला नाहीसा होतो, तसेच मनुष्याचेही होते. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचून आल्यानंतरही ही निवृत्तीची अवस्था माणसानेही मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे. 

सूर्याच्या अनुपस्थितीत चन्द्र पृथ्वीला प्रकाश देण्याचे काम करतो. सूर्य दिवस- रात्र तळपत राहिला असता तर आपल्याला जगणे असह्य झाले असते. सूर्य-चन्द्र दोघेही महत्त्वाचे. सुदैवाने आपल्या देशातून दोहोंचे नियोजित वेळी दर्शन होते. ज्या देशांमध्ये सहा सहा महिने सूर्यदर्शनच होत नाही, त्यांची स्थिती विचारा! त्यामुळे सूर्याची प्रखरता जेवढी महत्त्वाची तेवढीच चंद्राची शीतलताही महत्त्वाची! सुर्याइतके तेज नसले तरी चंद्राचे येणे हवेहवेसे वाटते. त्याच्या उगवण्याने सकल जीवांना काही काळ शांतता लाभते. रात्रीच्या अंधारात चंद्राचे शीतल चांदणे पथदर्शक ठरते. मात्र अमावस्येच्या रात्री मिट्ट अंधारात पाऊल टाकणे भयावह वाटते. ती भयाण रात्र कोणत्याही विपरीत घटनांशिवाय पार पडावी यासाठी आपल्या पूर्वजांनी अमावस्येच्या रात्री धार्मिक कृत्यांचा आग्रह धरला आहे. त्यानिमित्ताने जागृत राहणे हे अपेक्षित असते.

Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

आता सर्वत्र वीज आल्याने पौर्णिमा- अमावस्या आपल्याला सारख्या वाटतात. मात्र ग्रामीण भागात आजही लोक निसर्गचक्रावर विसंबून आहेत. एवढेच काय तर शहरी माणसाचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निसर्गाशी संबंध येतच असतो. चंद्राच्या तिथीवर समुद्राची भरती ओहोटी अवलंबून असते आणि एवढेच काय तर महिलांचे निसर्ग चक्र, मानसिक स्थिती यांचाही चन्द्र तिथीशी घनिष्ट संबंध असतो. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पौर्णिमेच्या दिवशी प्रसन्नवदनीं असणारी गृहिणी अमावस्येला चिडचिडी, रागीट, भांडखोर असल्यासारखी जाणवते, ते निसर्ग चक्रामुळेच! प्रकृती आणि स्त्री यांचा जवळचा संबंध असल्याने निसर्गाचे पडसाद स्त्री मनावर चटकन उमटतात. या सर्व गोष्टी भौगोलिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत. म्हणून धर्मानेही त्यांना अनुष्ठान दिले आहे. 

म्हणून अमावस्येला अशुभ न मानता, त्या रात्री सूर्य आणि चन्द्राच्या अनुपस्थितीत आपले मन चांगल्या विचारांनी कसे प्रकाशित होईल यादृष्टीने आपण विचार आणि कृती केली पाहिजे. तसेच अमावस्येच्या तिथीला अशुभ न मानता आपल्या मनातल्या अंधःकारावर प्रकाश टाकला पाहिजे!

टॅग्स :Astrologyफलज्योतिषIndian Festivalsभारतीय उत्सव-सणPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिक