शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Janmashtami 2023: आपल्या जन्माचे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर श्रीकृष्ण जन्मकथा जरूर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 07:00 IST

Janmashtami 2023: ६ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माचा उत्सव आहे; या दिवशी गोपालकृष्णाच्या पूजेबरोबर त्याची जन्मकथा आवर्जून वाचा!

श्रीकृष्णाच्या प्रत्येक कृतीतून बोध घेण्यासारखा आहे. धर्म नीतीसाठी आयुष्यभर झगडूनही तो सरळ सरळ मान्य करतो, 'माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा!' याचाच अर्थ त्याने आपले मोठेपण कधी बिंबवले नाही, तर त्याच्या कर्तुतत्वातून ते उलगडत गेले, अगदी जन्मापासून! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने त्याचे जन्मरहस्य काय होते, ते जाणून घेऊया!

कंस भगिनी देवकी आणि वसुदेव यांच्या लग्नप्रसंगी वरातीचे वेळी त्या उभयतांच्या रथाचे सारथ्य प्रत्यक्ष कंस करत होता. त्यावेळेस आकाशवाणी झाली, की देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल. ही आकाशवाणी ऐकताच संतप्त होऊन कंसाने देवकी वसुदेवाला बंदिवासात टाकले. पुढची कथा आपल्याला माहीत आहेच. यथावकाश श्रीकृष्ण जन्म झाला. कृष्णाच्या सांगण्यावरून वसुदेवाने श्रीकृष्णाला गोकुळात नेण्याचे ठरवले.

श्रीकृष्णाच्या योगमायेने बंदिवासाचे दार आपोआप उघडले. श्रीकृष्णाला टोपलीत ठेवण्यात आले. यमुना नदी पार करून जायचे होते. यमुना नदीला पूर आला होता. त्या नदीला कृष्णाच्या चरणांचे दर्शन घ्यायचे होते. वसुदेवाने श्रीकृष्णाला यशोदा नंदराजाकडे सुखरूप नेऊन सोडले. त्यांची कन्या प्रत्यक्ष माया घेऊन वसुदेव तिथून बंदिवासात आले. तोच देवकीचा आठवा पुत्र आहे असे समजून कंस त्या बाळाला मारायला धावला. त्याच्या हातून ती माया निसटली आणि म्हणाली तुझा काळ जन्माला आला आहे. सावध हो...! 

अशी ही कृष्णकथा! तुम्ही म्हणाल, ही तर आम्हालाही माहीत आहे, मग यात नेमके रहस्य काय? तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कृष्णाने आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून दिला. अगदी आपल्या जन्म कथेतूनही. कृष्णाच्या जन्मकथेतून माणसाच्या जन्माच रहस्य देखील आपोआप उलगडत जातं. ते रहस्य असे - मातेच्या उदर बंदिवासातून आपण बाहेर पडतो. आईशी नाळ तुटते. जन्माला एकटे आलो, जाणारही एकटेच! सर्व नाती लौकिकातील नाती आहेत. त्या नात्यांना कर्तव्य दशे पुरतेच मर्यादित ठेवले पाहिजे. प्रेमपाशात अडकून न राहता जो कर्तव्याला जागतो त्याचेच भले होते. नाती आज ना उद्या सुटणार आहेतच. म्हणून ती मुद्दामून तोडायची असे नाही. तर त्या नात्यांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडून आपल्या जीवनाचे उद्दिष्ट गाठले पाहिजे. वसुदेव देवकीला कृष्णाचे जन्मदात्रे म्हणून मान मिळाला, परंतु पुत्रासहवास नंद यशोदेला मिळाला. कृष्णाने त्यांना हे सौभाग्य दिले परंतु तो धर्मकार्यार्थ जन्माला आला होता. ते अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी ना तो माता पित्यांजवळ थांबला ना गोप गोपिकांमध्ये फार काळ रमला. तो कर्तव्याला जागला म्हणूनच प्रत्येकाच्या हृदयात कृष्ण कायमस्वरूपी घर करून राहिला! आहे की नाही हे सुंदर रहस्य, आपल्या आणि कृष्णाच्या जन्माचे? 

गोपालकृष्ण भगवान की जय!

टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीShravan Specialश्रावण स्पेशल