शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

जगद्गुरु शंकराचार्यांनी वाटसरूकडून शिकून घेतली, अद्वैताची व्याख्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 18:11 IST

सूर्याचे प्रतिबिंब दूषित पाण्यात पडो, अथवा शुद्ध गंगाजलात, सूर्याच्या अस्तित्वावर काही फरक पडतो का? जर सूर्यामध्ये कोणताही दोष निर्माण होत नाही, तर एका देहातला आत्मा दुषित कसा असू शकतो?

आपल्या जीवनात अनेक घटना घडत असतात. कडू गोड अनुभव येतात. प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवून जातात. जीवनात परिवर्तन घडवून आणतात. भक्तांच्या जीवनात कोणतेही प्रसंग येवोत, त्याला ते ईश्वराची कृपा मानतात. आपल्याला प्रत्येक पावलागणिक भगवंत मार्गदर्शन करत असतो, फक्त तो ओळखता यायला हवा. जगद्गुरु शंकराचार्यांना एका वाटसरूच्या रूपाने भगवंत भेटला आणि त्यानेच शंकराचार्यांना अद्वैताची व्याख्या समजावून सांगितली. 

हेही वाचा : मोक्ष म्हणजे काय? मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वाच्या पाच गोष्टी लक्षात ठेवा!

एकदा उत्तर प्रदेशातील काशीच्या मणिकर्णिका घाटावर आदि शंकराचार्य आपल्या शिष्यांसमवेत चालले होते. दुपारची वेळ होती. त्यांना पूजा करायची होती. तेवढ्यात समोरून एक वाटसरू आला. तो दिसायला फारच भेसूर होता. काळाकभिन्न आणि राकट, धिप्पाड शरीरयष्टीचा! सोबत चार कुत्री होती. त्याने शंकराचार्यांचा मार्ग अडवला. शंकराचार्यांनी त्याला वाट सोडण्यास सांगितले.

आदिशंकराचार्य हे साधारण संन्यासी नव्हते. अद्वैत सिद्धांत मांडणारे व त्यावर शेकडो ग्रंथांची रचना करणारे ते जगद्गुरु होते. ईश्वर एक असून सर्व दिशात तोच एक भरून उरला आहे, हे अद्वैत तत्वज्ञान त्यांनी मांडले होते. 

वाटसरू म्हणाला, `महाराज, मी असे ऐकले आहे, की तुम्ही अद्वैत सिद्धांत मांडणारे मोठे तत्वज्ञ आहात. संपूर्ण विश्वात परब्रह्मच व्यापलेले आहे, मग कोणी तुमची वाट अडवली? आणि कोण बाजूला होणार? मला तर हे समजले नाही, की तुम्ही देहाला बाजूला हो म्हणून सांगितले, की देहात आत्मरूपाने राहणाऱ्या देहीला? तुम्ही जर मला देहाने बाजूला हो सांगत असाल, तर तुमचा देह सुद्धा पाच तत्वांचाच बनलेला आहे आणि माझा देहसुद्धा पाच तत्वांचाच बनलेला आहे. मग भेदभावाला वावच कुठे राहिला? आणि जर तुम्ही आत्म्याला बाजूला हो म्हणून सांगत असाल, तर तुमचा आणि माझा आत्मा एकच आहे. 

आपल्यासारखा थोर संन्यासी आपल्यात आणि माझ्यात भेद मानत असेल, यावर माझा विश्वासच बसत नाही. आपल्याला माहीत असेलच, की सूर्याचे प्रतिबिंब दूषित पाण्यात पडो, अथवा शुद्ध गंगाजलात, सूर्याच्या अस्तित्वावर काही फरक पडतो का? जर सूर्यामध्ये कोणताही दोष निर्माण होत नाही, तर एका देहातला आत्मा दुषित कसा असू शकतो?

आदि शंकराचार्य कल्पनाही करू शकत नव्हते, की एक वाटसरू अद्वैताची एवढी सुंदर व्याख्या करू शकेल. शंकराचार्य भावविभोर झाले. ते म्हणाले, `या अद्वैत परमात्म्याला संपूर्ण विश्वात जो अशा प्रकारे पाहू शकतो, तो सामान्य वाटसरू असला, तरी वंदनीय आहे.' असे म्हणत शंकराचार्यांनी वाटसरूचे पाय धरले. 

परंतु त्याक्षणी ना तिथे वाटसरू होता, ना चार कुत्री! जणू काही भगवान दत्तात्रेय वाटसरूच्या रूपाने येऊन शंकराचार्यांना अद्वैताची व्याख्या समजावून गेले. 

हेही वाचा : भगवान गौतम बुद्ध सांगतात, 'उक्तीला कृतीची जोड हवी!'