शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जगद्गुरु शंकराचार्यांनी वाटसरूकडून शिकून घेतली, अद्वैताची व्याख्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 18:11 IST

सूर्याचे प्रतिबिंब दूषित पाण्यात पडो, अथवा शुद्ध गंगाजलात, सूर्याच्या अस्तित्वावर काही फरक पडतो का? जर सूर्यामध्ये कोणताही दोष निर्माण होत नाही, तर एका देहातला आत्मा दुषित कसा असू शकतो?

आपल्या जीवनात अनेक घटना घडत असतात. कडू गोड अनुभव येतात. प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी शिकवून जातात. जीवनात परिवर्तन घडवून आणतात. भक्तांच्या जीवनात कोणतेही प्रसंग येवोत, त्याला ते ईश्वराची कृपा मानतात. आपल्याला प्रत्येक पावलागणिक भगवंत मार्गदर्शन करत असतो, फक्त तो ओळखता यायला हवा. जगद्गुरु शंकराचार्यांना एका वाटसरूच्या रूपाने भगवंत भेटला आणि त्यानेच शंकराचार्यांना अद्वैताची व्याख्या समजावून सांगितली. 

हेही वाचा : मोक्ष म्हणजे काय? मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वाच्या पाच गोष्टी लक्षात ठेवा!

एकदा उत्तर प्रदेशातील काशीच्या मणिकर्णिका घाटावर आदि शंकराचार्य आपल्या शिष्यांसमवेत चालले होते. दुपारची वेळ होती. त्यांना पूजा करायची होती. तेवढ्यात समोरून एक वाटसरू आला. तो दिसायला फारच भेसूर होता. काळाकभिन्न आणि राकट, धिप्पाड शरीरयष्टीचा! सोबत चार कुत्री होती. त्याने शंकराचार्यांचा मार्ग अडवला. शंकराचार्यांनी त्याला वाट सोडण्यास सांगितले.

आदिशंकराचार्य हे साधारण संन्यासी नव्हते. अद्वैत सिद्धांत मांडणारे व त्यावर शेकडो ग्रंथांची रचना करणारे ते जगद्गुरु होते. ईश्वर एक असून सर्व दिशात तोच एक भरून उरला आहे, हे अद्वैत तत्वज्ञान त्यांनी मांडले होते. 

वाटसरू म्हणाला, `महाराज, मी असे ऐकले आहे, की तुम्ही अद्वैत सिद्धांत मांडणारे मोठे तत्वज्ञ आहात. संपूर्ण विश्वात परब्रह्मच व्यापलेले आहे, मग कोणी तुमची वाट अडवली? आणि कोण बाजूला होणार? मला तर हे समजले नाही, की तुम्ही देहाला बाजूला हो म्हणून सांगितले, की देहात आत्मरूपाने राहणाऱ्या देहीला? तुम्ही जर मला देहाने बाजूला हो सांगत असाल, तर तुमचा देह सुद्धा पाच तत्वांचाच बनलेला आहे आणि माझा देहसुद्धा पाच तत्वांचाच बनलेला आहे. मग भेदभावाला वावच कुठे राहिला? आणि जर तुम्ही आत्म्याला बाजूला हो म्हणून सांगत असाल, तर तुमचा आणि माझा आत्मा एकच आहे. 

आपल्यासारखा थोर संन्यासी आपल्यात आणि माझ्यात भेद मानत असेल, यावर माझा विश्वासच बसत नाही. आपल्याला माहीत असेलच, की सूर्याचे प्रतिबिंब दूषित पाण्यात पडो, अथवा शुद्ध गंगाजलात, सूर्याच्या अस्तित्वावर काही फरक पडतो का? जर सूर्यामध्ये कोणताही दोष निर्माण होत नाही, तर एका देहातला आत्मा दुषित कसा असू शकतो?

आदि शंकराचार्य कल्पनाही करू शकत नव्हते, की एक वाटसरू अद्वैताची एवढी सुंदर व्याख्या करू शकेल. शंकराचार्य भावविभोर झाले. ते म्हणाले, `या अद्वैत परमात्म्याला संपूर्ण विश्वात जो अशा प्रकारे पाहू शकतो, तो सामान्य वाटसरू असला, तरी वंदनीय आहे.' असे म्हणत शंकराचार्यांनी वाटसरूचे पाय धरले. 

परंतु त्याक्षणी ना तिथे वाटसरू होता, ना चार कुत्री! जणू काही भगवान दत्तात्रेय वाटसरूच्या रूपाने येऊन शंकराचार्यांना अद्वैताची व्याख्या समजावून गेले. 

हेही वाचा : भगवान गौतम बुद्ध सांगतात, 'उक्तीला कृतीची जोड हवी!'