शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मनासारखे घडले नाही म्हणून अधर्म करणे योग्य नाही; वाचा कृष्ण आणि कर्ण यांचा अंतर्मुख करायला लावणारा संवाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 12:00 IST

दुर्दैव आपल्याच वाट्याला का? यावर श्रीकृष्णाने दिलेलं उत्तर केवळ कर्णासाठी नाही तर आपल्यासाठीही आहे!

हल्ली समाज माध्यमांवर गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेजच्या भाऊगर्दीत अनेक चांगले विचार वाचायचे राहून जातात. कधी कधी तर प्रबोधनाचा महापूर आल्यासारखा वाटतो. अशा महापुरात नाईलाजाने सगळे मेसेज डिलीट करत मोबाईल महापुरातून वाहून गेले, तरी स्टार्ड केलेले काही शंख शिंपले मागे राहतातच! अशातच सापडलेला एक सुंदर कृष्ण-कर्ण संवाद, जो निनावी व्हाट्स अप युनिव्हर्सिटीमध्ये व्हायरल झाला. खरे पाहता लेखकाचे श्रेय त्याला मिळायला हवे. परंतु तसे न करता लोक नाव काढून टाकून विचार पुढे पाठवतात. निदान आपण आपल्याकडून तशी चूक होणार नाही याची काळजी बाळगूया आणि हे वैचारिक मोती वेचुया. 

कर्ण कृष्णाला विचारतो - "माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती? मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नाही मानला जात होतो.  परशुरामांनी मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल. कारण मी क्षत्रिय नव्हतो! एक गाय चुकून माझ्या बाणांनी मारली गेली, आणि गायवाल्यानी माझी चूक नसताना मला शाप दिला. द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला.  कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचवण्यासाठीच सांगितले. मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले.  तर मगं मी त्याची बाजू घेतली यात माझे काय चुकले?"

कृष्णाने उत्तर दिले: "कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला. जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होती. रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांपासून वेगळे करावे लागले. तुम्ही तलवारी, रथघोडे, धनुष्यबाणांच्या आवाजात लहानाचे मोठे झालात. मला गौशाला, शेणमाती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. ना कोणती सेना, ना शिक्षण. मीच त्यांच्या वाईटाचा कारण आहे, असे लोकांकडून मला ऐकायला मिळायचे. तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही. संदीपनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी १६ वर्षाचा होतो. तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले.  माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्यांची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या. मला माझ्या सर्व समाजबांधवांना जरासंधाच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी (द्वारका) वसवावे लागले. मला पळपुटा (रणछोडदास) म्हणतात.  जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल... फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष.  एक गोष्ट लक्षात घे कर्णा...

प्रत्येकाला आयुष्यात कष्ट आहेत! आयुष्य कोणासाठीही कधीही सोपे नाही, दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आहेत आणि तसेच युधिष्ठिराच्या पण! परंतु काय योग्य (धर्म) आहे हे तुझ्या अंतरात्माला पण कळते... कितीही वेळा आपल्या बरोबर अयोग्य गोष्टी झाल्या, कितीही वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला,  कितीही वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले, तरीही त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्व आहे. 

तक्रारी थांबव कर्णा! आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनांमुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही.

म्हणून , तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण व अतिवाईट प्रसंगी देखिल तुम्ही चांगलाच विचार करा, स्वाध्यायी व्हा, भगवतांचे नामस्मरण करा, कृतज्ञता व्यक्त करा, चांगलंच वागा आणि प्रत्येक माणसाला आणि प्राण्याला सहकार्य करा. स्वच्छंदी व्हा आणि हे विसरून जा कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद...!