शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

दान करण्यासाठी श्रीमंती लागत नाही तर मनाचा मोठेपणा लागतो!- सुधा मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 17:56 IST

दानाचा आणि श्रीमंतीचा दुरान्वये संबंध नाही, पैसे असूनही देण्याची दानत नसेल तर काय उपयोग? याचबाबत अनुभव कथन करत आहेत लेखिका सुधा मूर्ती!

शिक्षण क्षेत्र, लेखन, व्यवसाय आणि समाजकार्याच्या निमिताने लेखिका सुधा मूर्ती यांनी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा अनुभव घेतला. यातून त्यांच्या लक्षात आले, दान करण्यासाठी श्रीमंती लागत नाही तर मनाचा मोठेपणा लागतो. दान केल्याने खूप फायदे होतात, हे कळल्यावर दान करणारे लोक कमी नाहीत, पण तो स्वार्थ झाला, दान नाही! याबाबत सुधाजींनी आपला एक स्वानुभव सांगितला. त्या म्हणाल्या -

शैक्षणिक व्याख्यानासाठी परप्रांतात गेले असता समारंभाच्या ठिकाणी मला इंग्रजीत बोलायचे होते, पण स्थानिकांशी बोलताना भाषेचा अडसर येणार होता. माझ्याबरोबर एक भाषांतकार होता. कार्यक्रमाला जात असताना आम्ही एकेठिकाणी अडकलो. रस्ता निर्मनुष्य होता आणि जवळच गाव होते. ड्रायव्हर गाडी सुरू करण्याच्या प्रयत्नात होता. मी आणि भाषांतकार दोघे गावातल्या एका झोपडीवजा घरात गेलो. काही वेळ त्यांच्याकडे थांबण्याची अनुमती मागितली. त्यांनी ती आनंदाने स्वीकारली. 

त्या घरात पदोपदी दारिद्र्याच्या खुणा दिसत होत्या. तरीसुद्धा त्याक्षणी आम्हाला डोक्यावर छप्पर मिळाल्याने आम्हाला हायसे वाटले. 'अतिथी देवो भव' या भारतीय संस्कृतीप्रमाणे त्यांनी पाहुणचार म्हणून काय घेणार असे विचारले. आपल्यामुळे त्यांना त्रास नको या भावनेने मी चहा पाण्याला दोनदा नकार दिला. निदान दूध तरी? असे त्यांनी विचारल्यावर क्षणभर थांबले. पुन्हा नकार दिला तर त्यांच्या परिस्थितीकडे पाहून नकार दिला असे त्यांना वाटेल, म्हणून मी होकार दिला. 

तो गृहस्थ त्यांच्या घरातल्या ओट्याकडे वळला, तसा बायकोने रागाचा कटाक्ष टाकला. ती काहीतरी बोलली. त्याने तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. त्यांची भाषा मला कळणारी नव्हती, भाषांतकाराकडून मला कळले, की त्या माउलीने आपल्या मुलांसाठी राखीव ठेवलेलं दूध तिच्या नवऱ्याने मला विचारले. त्या गृहस्थाची द्विधा मनस्थिती झाली. सगळे दूध मला दिले तर मुलाची उपासमार झाली असती म्हणून त्याने अर्धे दूध बाजूला ठेवून उरलेल्या दुधात थोडे पाणी घालून आम्हाला देऊ केले. ते देत असताना त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड अपराधी भाव होता. मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून तो दूर केला. यथाशक्ती त्यांना आर्थिक मदत केली आणि निघाले. पण तो प्रसंग आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेला. आपले पोट भरल्यावर दुसऱ्याला कोणीही खाऊ घालेल, पण घासातला घास काढून देण्याची संस्कृती आणि संस्कार भारतातच बघायला मिळेल. 

हा संस्कार आपणही जतन करूया आणि शक्य तेवढी दुसऱ्यांना मदत करूया आणि आपणही अधिकाधिक सक्षम होऊया!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी