शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

मातापित्याच्या निधनानंतर एका वर्षाच्या आत लग्नाळू मुला-मुलीचे लग्न लावणे सक्तीचे असते का?वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 14:36 IST

धर्मशास्त्राचा आणि वैचारिक परंपरा व संस्कृती यांचा कुठलाही आधार नसताना समाजात ज्या घातक गैर प्रथा प्रसृत होतात, त्यात वरील ...

धर्मशास्त्राचा आणि वैचारिक परंपरा व संस्कृती यांचा कुठलाही आधार नसताना समाजात ज्या घातक गैर प्रथा प्रसृत होतात, त्यात वरील रुढीचा समावेश होतो. लग्नासारखा आयुष्यभराचा निर्णय अशा प्रथांमुळे घाईगाईत घेतला जातो व त्याची किंमत अनेकदा नवदांपत्याला आणि पर्यायाने दोन्ही कुटुंबांना भोगावी लागते. एकमेकांची पसंती नाही, परस्पर आकर्षण नाही, एकमेकांना समजून घेणे नाही, विचारांचे आदान प्रदान नाही, या सगळ्या महत्त्वाच्या पायऱ्या वगळून केवळ वर्षश्राद्धाच्या आत लग्न लावून देण्याचा घेतलेला निर्णय दोन जीवांचे आयुष्य उध्वस्त करणारा ठरू शकतो. म्हणून असे मोठे निर्णय आतेतायीपणा करून घेणे योग्य नाही. खुद्द धर्मशास्त्रानेही अशा निर्णयांना पुष्टी दिलेली नाही. 

वास्तविक, निधन पावलेल्या व्यक्तीला किमान एक वर्षभर प्रेतत्व असल्यामुळे पितृत्वाचे अधिकार येत नाहीत. यास्तव ते वर्ष लाक्षणिक अशौच मानले जाणे इष्ट आहे व सद्यकालीन ते मानले जाते. त्या कालावधीत नित्य, नैमित्तिक, कुळाचार, कुळधर्म व व्रताचार करणे अपरिहार्य ठरते. ते मुळीच टाळता येत नाहीत. पण ज्या कर्मासाठी पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध करणे आवश्यक असते, ते कार्य निदान वर्षसमाप्तीपर्यंत तरी करू नये. 

पर्यायी व्यवस्था 

त्यातही अगदी निकड असल्यास व चैत्र महिना समीप नसल्यास निधन पावलेल्या व्यक्तीची षोडशमासिकश्राद्धे व अब्दपूर्तीश्राद्ध करून घ्यावे. हा पर्याय त्यांच्यासाठी, ज्यांचे लग्न आधीपासून ठरलेले आहे किंवा नजीकच्या पुढच्या काळात लग्न करणे शक्य नाही किंवा ज्यांचे वय वाढत चालले आहे आणि अशात आणखी वर्षभर थांबून चांगले स्थळ गमवायचे नाही, कोणी परदेशात स्थायिक असून त्यांना पुढची एक दोन वर्षे मायदेशी येणे शक्य नाही, अशा सगळ्या परिस्थितीत सहा महिने मासिक श्राद्ध करून मंगलकार्य करता येते. याला तडजोडही म्हणता येईल. परंतु ती नक्कीच धर्मशास्त्राला धरून असेल. या विधीनंतर घरात लग्न, मुंज, वास्तुशांती, नूतनव्रतारंभ इ. कार्ये करता येतात. अन्यथा एक वर्ष पूर्ण झाल्यावर या कार्यांचे आयोजन करावे.

'वस्तू' म्हणून 'कन्यादान' करतच नाहीत; लग्नातील हा विधी खूपच महत्त्वाचा... समजून घ्या त्यामागचा 'भावार्थ'

वर्षाच्या आत किंवा तीन वर्षानंतर मंगलकार्य?

ही आणखी एक चुकीची प्रथा लोकांनी निर्माण केली आहे. त्यालाही शास्त्राधार नाही. त्यामुळे फार तर एक वर्षभर लग्नकार्य किंवा इतर मंगलकार्य थांबवावे अन्यथा वरील पर्याय निवडावा, मात्र तीन वर्षे थांबणे हे पूर्णपणे शास्त्राविरुद्ध वर्तन आहे, हे लक्षात घ्यावे. 

मग या प्रथा नेमक्या निर्माण झाल्या तरी कशा?

अर्थातच, लोकांमधून! एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात त्या व्यक्तीची पोकळी निर्माण होते. उणीव भासते. घरावर नैराश्य पसरते. अशात घरातील लग्नायोग्य मुला-मुलींच्या लग्नाची बोलणी करून मंगलकार्याने घरावरचे दु:खं-दैन्य दूर व्हावे, अशी नातेवाईकांची त्यामागील भावना असते. तसेच एखाद्या मुलाचे आई-वडील गेल्यावर एकाकी पडलेल्या मुलाला किंवा मुलीला, संसार विरस वाटू नये, म्हणूनही त्याचे नातेवाईक त्यांना बोहल्यावर चढवतात आणि प्रपंचात अडकवून देतात. 

पूर्वी या गोष्टी सर्रास घडत असत. कारण तेव्हा ठरवून केलेली विवाहपद्धती अशाच प्रकारची असे. मात्र, आताच्या काळात मुले मुली परस्परांना जाणून घेतल्याशिवाय लग्नाचा निर्णय घेत नाहीत. ते एकार्थी योग्यच आहे. लग्न होऊन काडीमोड घेण्याची वेळ येण्यापेक्षा लग्नाआधी वेळ घेणे केव्हाही चांगले. 

जाणारी व्यक्ती निघून जाते. परंतु मागे राहिलेल्या व्यक्तींवर चुकीच्या प्रथा थोपवून त्यांच्या आयुष्याचे चुकीचे निर्णय घेणे योग्य नाही. शास्त्रदेखील त्याला दुजोरा देत नाही. म्हणून कोणीही अशी घाईगर्दी करत असेल, तर त्यांना ठणकावून सांगा...अशा प्रथेला शास्त्राधार नाही!