शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

Inspirational: जेव्हा भीती वाटेल, आत्मविश्वास डळमळीत होईल, तेव्हा भीष्म पितामह यांची 'ही' गोष्ट आठवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 07:05 IST

Inspirational Story:अनेकदा मन शांत नसते, भलभलते विचार येतात आणि अस्वस्थता वाढते, अशा वेळी महाभारतातील ही गोष्ट तुम्हाला निश्चितपणे बळ देईल!

मन अस्थिर करणाऱ्या अनेक घटना आपल्या सभोवती घडत असतात. पण या अशांततेचे कारण काय? तर प्रेमानंद महाराज सांगतात, ज्या लोकांचा देवावर विश्वास नसतो, ते लोक स्वतःच्याच व्यापात गुंतून असतात आणि आपले भले कसे होईल, कधी होईल याचा विचार करत राहतात. याउलट जे लोक कर्म करून मोकळे होतात आणि देवावर सगळा भार सोपवतात ते निश्चिन्त राहतात, कारण भक्ताच्या चिंता निवारण करण्याची जबाबदारी भगवंत स्वतःच्या खांद्यावर घेतो. यासाठी महाभारतातली गोष्ट लक्षात ठेवा आणि जेव्हा जेव्हा हतबल झाल्यासारखे वाटेल तेव्हा या कथेची उजळणी करा. 

कौरवांचे सेनापती भीष्म पितामह, युद्ध सुरु झाल्यापासून रोज पांडवांकडचे दहा हजार सैन्य मृत्युमुखी पाडत होते. पण काही केल्या एकाही पांडवांचा वध त्यांच्याकडून घडत नव्हता. दुर्योधनाने त्यांना खिजवले. त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भीष्म चवताळून उठले आणि त्यांनी पाच बाण घेतले आणि दुसऱ्या दिवशी युद्धात या बाणांनी पांडवांचा वध करणार अशी प्रतिज्ञा केली. 

ती साधी सुधी प्रतिज्ञा नव्हती, तर भीष्म प्रतिज्ञा होती. पण घेतला म्हणजे ते पूर्ण करणारच. त्यांच्या प्रतिज्ञेची वार्ता द्रौपदीपर्यंत पोहोचली. पांडव झोपी गेले होते. अस्वस्थ होऊन द्रौपदी कृष्णाजवळ आली आणि आपल्या पतीच्या जीवाची काळजी व्यक्त करू लागली. कृष्ण म्हणाले, मी सांगतो तसे कर. दासीचे वस्त्र परिधान कर आणि भीष्मांच्या राहुटीत जा. ते नामःस्मरणात दंग असतील. कृष्णावर विश्वास ठेवून द्रौपदी कृष्णाने सांगितल्यानुसार दासी वस्त्र परिधान करून भीष्मांचार्यांच्या भेटीला गेली. ते नामःस्मरण घेत होते. द्रौपदीने वाकून नमस्कार केला, तेव्हा  हातातील बांगड्यांची किणकिण झाली. कोणी विवाहिता आली आहे हे लक्षात घेऊन भीष्मांनी बंद डोळ्यांनीच तिला आशीर्वाद देत 'अखंड सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. तिने आभार व्यक्त करताच भीष्मांनी डोळे उघडून पाहिले तर समोर द्रौपदी! 

ती म्हणाली, 'पितामह एकीकडे आपण माझ्या नवऱ्यांना उद्या जीवे मारण्याचा पण करता आणि दुसरीकडे मला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देता, नक्की काय समजू?'

पितामह म्हणाले, 'तू माझ्याकडे प्रश्नांची उत्तर मागत असलीस तरी तू इतक्या रात्री इथे कशी आणि का आलीस हे मी ओळखले आहे. तू स्वतःहून इथे आली नसून योजनापूर्वक तुला इथे पाठवण्यात आले आहे. भीष्मांनी कृष्णाला मनोमनं वंदन केले आणि म्हणाले,' ज्यांच्या पाठीशी देवा तू आहेस, त्यांना कसलीच भीती नाही. द्रौपदी तू निश्चिन्त होऊन जा, तुझ्या पतीला मी मारू शकणार नाही. भगवंत पाठीशी असताना तुम्हा कुटुंबियांना काळजी. 

याचप्रमाणे आपणही आपले प्रयत्न करून बाकी भार देवावर टाकला तरच सुखी होऊ. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीMahabharatमहाभारत