शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
7
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
8
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
9
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
10
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
11
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
12
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
13
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
14
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
15
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
16
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
17
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
18
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
19
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
20
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

Inspirational: जेव्हा भीती वाटेल, आत्मविश्वास डळमळीत होईल, तेव्हा भीष्म पितामह यांची 'ही' गोष्ट आठवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 07:05 IST

Inspirational Story:अनेकदा मन शांत नसते, भलभलते विचार येतात आणि अस्वस्थता वाढते, अशा वेळी महाभारतातील ही गोष्ट तुम्हाला निश्चितपणे बळ देईल!

मन अस्थिर करणाऱ्या अनेक घटना आपल्या सभोवती घडत असतात. पण या अशांततेचे कारण काय? तर प्रेमानंद महाराज सांगतात, ज्या लोकांचा देवावर विश्वास नसतो, ते लोक स्वतःच्याच व्यापात गुंतून असतात आणि आपले भले कसे होईल, कधी होईल याचा विचार करत राहतात. याउलट जे लोक कर्म करून मोकळे होतात आणि देवावर सगळा भार सोपवतात ते निश्चिन्त राहतात, कारण भक्ताच्या चिंता निवारण करण्याची जबाबदारी भगवंत स्वतःच्या खांद्यावर घेतो. यासाठी महाभारतातली गोष्ट लक्षात ठेवा आणि जेव्हा जेव्हा हतबल झाल्यासारखे वाटेल तेव्हा या कथेची उजळणी करा. 

कौरवांचे सेनापती भीष्म पितामह, युद्ध सुरु झाल्यापासून रोज पांडवांकडचे दहा हजार सैन्य मृत्युमुखी पाडत होते. पण काही केल्या एकाही पांडवांचा वध त्यांच्याकडून घडत नव्हता. दुर्योधनाने त्यांना खिजवले. त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भीष्म चवताळून उठले आणि त्यांनी पाच बाण घेतले आणि दुसऱ्या दिवशी युद्धात या बाणांनी पांडवांचा वध करणार अशी प्रतिज्ञा केली. 

ती साधी सुधी प्रतिज्ञा नव्हती, तर भीष्म प्रतिज्ञा होती. पण घेतला म्हणजे ते पूर्ण करणारच. त्यांच्या प्रतिज्ञेची वार्ता द्रौपदीपर्यंत पोहोचली. पांडव झोपी गेले होते. अस्वस्थ होऊन द्रौपदी कृष्णाजवळ आली आणि आपल्या पतीच्या जीवाची काळजी व्यक्त करू लागली. कृष्ण म्हणाले, मी सांगतो तसे कर. दासीचे वस्त्र परिधान कर आणि भीष्मांच्या राहुटीत जा. ते नामःस्मरणात दंग असतील. कृष्णावर विश्वास ठेवून द्रौपदी कृष्णाने सांगितल्यानुसार दासी वस्त्र परिधान करून भीष्मांचार्यांच्या भेटीला गेली. ते नामःस्मरण घेत होते. द्रौपदीने वाकून नमस्कार केला, तेव्हा  हातातील बांगड्यांची किणकिण झाली. कोणी विवाहिता आली आहे हे लक्षात घेऊन भीष्मांनी बंद डोळ्यांनीच तिला आशीर्वाद देत 'अखंड सौभाग्यवती भव' असा आशीर्वाद दिला. तिने आभार व्यक्त करताच भीष्मांनी डोळे उघडून पाहिले तर समोर द्रौपदी! 

ती म्हणाली, 'पितामह एकीकडे आपण माझ्या नवऱ्यांना उद्या जीवे मारण्याचा पण करता आणि दुसरीकडे मला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देता, नक्की काय समजू?'

पितामह म्हणाले, 'तू माझ्याकडे प्रश्नांची उत्तर मागत असलीस तरी तू इतक्या रात्री इथे कशी आणि का आलीस हे मी ओळखले आहे. तू स्वतःहून इथे आली नसून योजनापूर्वक तुला इथे पाठवण्यात आले आहे. भीष्मांनी कृष्णाला मनोमनं वंदन केले आणि म्हणाले,' ज्यांच्या पाठीशी देवा तू आहेस, त्यांना कसलीच भीती नाही. द्रौपदी तू निश्चिन्त होऊन जा, तुझ्या पतीला मी मारू शकणार नाही. भगवंत पाठीशी असताना तुम्हा कुटुंबियांना काळजी. 

याचप्रमाणे आपणही आपले प्रयत्न करून बाकी भार देवावर टाकला तरच सुखी होऊ. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीMahabharatमहाभारत