शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

Indian Temple: आज दुर्गाष्टमीनिमित्त जाणून घ्या दुर्गा मातेच्या 'या' अनोख्या मंदिरामागील रहस्य कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 14:16 IST

Durgashatami : भारतात आजही अनेक ठिकाणांचे वैज्ञानिक, भौगोलिक गूढ उकलले नाही, मध्य प्रदेशातील हे देवस्थान त्यापैकीच एक!

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे लोकांना सूर्यास्तानंतर जाण्याची परवानगी नाही. मात्र, त्यापैकी काही जागा आता पर्यटन स्थळं बनली आहेत. मात्र मध्य प्रदेशात देवीचे एक मंदिर आहे, जिथे लोक सूर्यास्तानंतर जायला घाबरतात. अनेकांना तिथे सूर्यास्तानंतर गेले असता चित्रविचित्र अनुभव आल्याचे म्हटले जाते. काय असेल त्यामागचे कारण? जाणून घेऊ. 

प्राचीन आणि ऐतिहासिक दुर्गामातेचे हे मंदिर मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात आहे. लोक संध्याकाळी या मंदिरात जायला घाबरतात. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, येथे अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामुळे लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. हे मंदिर तोडण्याचाही अनेकदा प्रयत्न झाला परंतु तो यशस्वी झाला नाही. 

दुर्गा मंदिराचे निर्माण 

पौराणिक कथेनुसार हे मंदिर देवासच्या महाराजांनी बांधले होते, परंतु मंदिर बांधल्यानंतर येथे अनेक अशुभ घटना घडत असत. या मंदिराशी संबंधित अनेक कथा आहेत, असे मानले जाते की राजघराण्याचा सेनापती आणि राजकुमारीची मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. राजाचा या नात्याला नकार होता आणि तो त्यांच्या लग्नाच्या विरोधात होता. त्याने आपल्या मुलीला बंदिस्त ठेवले. सेनापतीचा विरह राजकन्येला सहन झाला नाही आणि अशातच तिचा मृत्यू झाला. राजकन्येच्या मृत्यूची बातमी कळताच सेनापतीनेही मंदिरातच प्राण त्याग केला. सेनापतीच्या मृत्यूनंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी महाराजांना मंदिर अपवित्र झाल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत या मंदिरातील जुन्या मूर्ती हटवून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात असा राजपुरोहितांनी सल्ला दिला. परंतु प्रयत्न करूनही तसे करणे शक्य झाले नाही. तेव्हापासून आजतागायत लोकांना त्या मंदिरात सायंकाळी आभास होतात. कोणाचा वावर असल्याचे जाणवते. अशा चित्रविचित्र अनुभवांमुळे लोकांनी त्या मंदिराला शापित मंदिर ठरवले. 

तसे असले तरी दिवसा त्या मंदिरात भाविकांची रीघ लागलेली असते. तिथे यज्ञ याग देखील केला जातो. स्थानिक लोक सांगतात, की चुकीच्या हेतूने तिथे दर्शनाला येणाऱ्या लोकांना काही ना काही त्रास होतो. याअर्थी ते जागृत देवस्थानही म्हटले जाते. मात्र जसजशी संध्याकाळ होते, तसतसा भाविकांचा वावर कमी होऊ लागतो आणि मंदिराच्या जवळपासही कोणीच फिरकत नाही. तिथे नक्की आभास होतात की आणखी काही, हे जाणून घेण्याचे वैज्ञानिक प्रयत्नही झाले, परंतु अजूनपर्यंत काहीच निष्कर्ष हाती लागलेले नाहीत!

टॅग्स :Templeमंदिर