शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

आपलेही टुमदार घर असावे, असे वाटत असेल तर एकदा ही बोधकथा वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 17:55 IST

आपण प्रत्येक गोष्ट आपल्या हितसंबंधाशी जोडून घेतो, अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर नाराज होतो आणि अनपेक्षित यशाने आनंदून जातो. 

'कर भला, सो हो भला' अशी आपल्याला शिकवण दिली जाते. शिकवण नव्हे, तर हा संस्कारच! यापुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण तर सांगतात, 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।

तुम्ही चांगले काम करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या कामाची नोंद घेण्यासाठी स्वर्गामध्ये चित्रगुप्त बसले आहेत. ते योग्य वेळी योग्य फळ तुम्हाला देतील. तोवर तुम्ही तुमचे कर्म करत राहा. 

परंतु, बऱ्याचदा आपल्याला चांगले काम करूनही वाईट अनुभव येतात. मग दुनियादारी नकोशी होते आणि सत्कर्मावरून विश्वास उडून जातो. मात्र, हीच ती वेळ असते, स्वत:शी प्रामाणिक राहण्याची. आपण जर स्वत:ची फसवणूक केली, आपल्या कामाशी प्रतारणा केली, तर त्याचे फळ आपल्यालाच भोगावे लागते. म्हणून प्रत्येक काम इमानदारीने आणि स्वत:शी प्रामाणिक राहून करा, त्याचे फळ आज ना उद्या मिळाल्यावाचून राहणार नाही. हेच सांगणारी छानशी बोधकथा!

एक युवक असतो. अत्यंत हुशार, सुस्वभावी, प्रामाणिक, मेहनती परंतु अतिशय गरीब. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून, शिष्यवृत्ती मिळवून त्याने आपले अभियांत्रिकीचे प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, हवी तशी नोकरी त्याला मिळत नव्हती. त्यामुळे घरचे दारिद्र्यही दूर होत नव्हते. नोकरी नाही त्यामुळे छोकरीही नाही. तरीदेखील, त्या युवकाने काम मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले. 

एक दिवस त्याला ओळखितल्या एका बिल्डरकडून एका जुन्या वसाहतीचे पुनर्वसन करण्याचे काम मिळाले. नशीबाचे दार उघडले. तो खुश झाला. त्याने वसाहतीची बारकाईने पाहणी केली आणि नवीन वसाहतीचे स्वरूप कसे असेल, याची आखणी केली. 

त्या वसाहतीत बहुतांशी वृद्ध जोडपी राहत होती. युवकाने नवीन वसाहतीचा आराखडा त्यांच्यासमोर ठेवला. सर्व जोडप्यांचे एकमत होईना. प्रत्येकाची मागणी ऐकून घेत, युवकाने नवीन आराखडा तयार केला. सर्वांना दाखवला. सर्वांची पसंती मिळाली आणि कामाचा श्रीगणेशा झाला. 

युवकाने जातीने हजर राहून कामाची पाहणी केली. उत्तम प्रतीचे सिमेंट, वीटा, दगड, लोखंडी सळ्या, पाईप इ. बांधकाम निगडित वस्तुंची यादी केली. बिल्डरने दुजोरा दिला. आर्थिक पाठबळ मिळाले. त्यामुळे दर्जेदार कामाची सुरुवात झाली. युवकाची मेहनत आणि नवी वसाहत आकार घेत असल्याचे पाहून वसाहतीतील जुने लोक आनंदून गेले. त्या युवकाशी सर्वांची चांगली गट्टी जमली. आणि त्याच्याशी बोलताना आर्थिक स्थितीबद्दल माहिती मिळाली. 

वसाहतकरांनी एक शक्कल लढवली. आपल्याच वसाहतीत त्यांनी आणखी एक छोटेसे घर बांधून मागितले. त्या घराचे काम बिल्डरच्या अखत्यारित नव्हते. परंतु वसाहतीतल्या लोकांनी त्या घरासाठी पैसा उभा करणार असे सांगितले. फक्त ते काम याच युवकाच्या देखरेखित व्हावे, असा सर्वांनी आग्रह केला. युवकाने प्रामाणिकपणे, तेवढ्याच मेहनतीने शेवटचे घरही बांधून पूर्ण केले. नवीन वसाहतीसकट त्या घराची चावीदेखील वसाहतीच्या लोकांच्या स्वाधीन केली. 

युवकाला त्याच्या कामाचा चांगला मोबदला बिल्डरकडून मिळाला होताच, परंतु त्याच्या चांगल्या वागणुकीचे, प्रामाणिकपणाचे आणि अविश्रांत घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून वसाहतीतल्या लोकांनी जादा बांधून घेतलेले घर युवकाच्या नावे केले आणि घराची चावी त्याला सुपूर्द केली. 

भाग्योदय झाला, की रंकाचा राव होतो. परंतु, त्यासाठी आपले सत्कर्माचे पारडे जड असावे लागते. निरपेक्षपणे केलेली सेवा निश्चितच फळते, फक्त कधी, याची वाट न पाहता, कर्म करत राहायचे असते.