शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

आपलेही टुमदार घर असावे, असे वाटत असेल तर एकदा ही बोधकथा वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 17:55 IST

आपण प्रत्येक गोष्ट आपल्या हितसंबंधाशी जोडून घेतो, अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर नाराज होतो आणि अनपेक्षित यशाने आनंदून जातो. 

'कर भला, सो हो भला' अशी आपल्याला शिकवण दिली जाते. शिकवण नव्हे, तर हा संस्कारच! यापुढे जाऊन भगवान श्रीकृष्ण तर सांगतात, 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।

तुम्ही चांगले काम करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या कामाची नोंद घेण्यासाठी स्वर्गामध्ये चित्रगुप्त बसले आहेत. ते योग्य वेळी योग्य फळ तुम्हाला देतील. तोवर तुम्ही तुमचे कर्म करत राहा. 

परंतु, बऱ्याचदा आपल्याला चांगले काम करूनही वाईट अनुभव येतात. मग दुनियादारी नकोशी होते आणि सत्कर्मावरून विश्वास उडून जातो. मात्र, हीच ती वेळ असते, स्वत:शी प्रामाणिक राहण्याची. आपण जर स्वत:ची फसवणूक केली, आपल्या कामाशी प्रतारणा केली, तर त्याचे फळ आपल्यालाच भोगावे लागते. म्हणून प्रत्येक काम इमानदारीने आणि स्वत:शी प्रामाणिक राहून करा, त्याचे फळ आज ना उद्या मिळाल्यावाचून राहणार नाही. हेच सांगणारी छानशी बोधकथा!

एक युवक असतो. अत्यंत हुशार, सुस्वभावी, प्रामाणिक, मेहनती परंतु अतिशय गरीब. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून, शिष्यवृत्ती मिळवून त्याने आपले अभियांत्रिकीचे प्रशिक्षण पूर्ण केले. मात्र, हवी तशी नोकरी त्याला मिळत नव्हती. त्यामुळे घरचे दारिद्र्यही दूर होत नव्हते. नोकरी नाही त्यामुळे छोकरीही नाही. तरीदेखील, त्या युवकाने काम मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले. 

एक दिवस त्याला ओळखितल्या एका बिल्डरकडून एका जुन्या वसाहतीचे पुनर्वसन करण्याचे काम मिळाले. नशीबाचे दार उघडले. तो खुश झाला. त्याने वसाहतीची बारकाईने पाहणी केली आणि नवीन वसाहतीचे स्वरूप कसे असेल, याची आखणी केली. 

त्या वसाहतीत बहुतांशी वृद्ध जोडपी राहत होती. युवकाने नवीन वसाहतीचा आराखडा त्यांच्यासमोर ठेवला. सर्व जोडप्यांचे एकमत होईना. प्रत्येकाची मागणी ऐकून घेत, युवकाने नवीन आराखडा तयार केला. सर्वांना दाखवला. सर्वांची पसंती मिळाली आणि कामाचा श्रीगणेशा झाला. 

युवकाने जातीने हजर राहून कामाची पाहणी केली. उत्तम प्रतीचे सिमेंट, वीटा, दगड, लोखंडी सळ्या, पाईप इ. बांधकाम निगडित वस्तुंची यादी केली. बिल्डरने दुजोरा दिला. आर्थिक पाठबळ मिळाले. त्यामुळे दर्जेदार कामाची सुरुवात झाली. युवकाची मेहनत आणि नवी वसाहत आकार घेत असल्याचे पाहून वसाहतीतील जुने लोक आनंदून गेले. त्या युवकाशी सर्वांची चांगली गट्टी जमली. आणि त्याच्याशी बोलताना आर्थिक स्थितीबद्दल माहिती मिळाली. 

वसाहतकरांनी एक शक्कल लढवली. आपल्याच वसाहतीत त्यांनी आणखी एक छोटेसे घर बांधून मागितले. त्या घराचे काम बिल्डरच्या अखत्यारित नव्हते. परंतु वसाहतीतल्या लोकांनी त्या घरासाठी पैसा उभा करणार असे सांगितले. फक्त ते काम याच युवकाच्या देखरेखित व्हावे, असा सर्वांनी आग्रह केला. युवकाने प्रामाणिकपणे, तेवढ्याच मेहनतीने शेवटचे घरही बांधून पूर्ण केले. नवीन वसाहतीसकट त्या घराची चावीदेखील वसाहतीच्या लोकांच्या स्वाधीन केली. 

युवकाला त्याच्या कामाचा चांगला मोबदला बिल्डरकडून मिळाला होताच, परंतु त्याच्या चांगल्या वागणुकीचे, प्रामाणिकपणाचे आणि अविश्रांत घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून वसाहतीतल्या लोकांनी जादा बांधून घेतलेले घर युवकाच्या नावे केले आणि घराची चावी त्याला सुपूर्द केली. 

भाग्योदय झाला, की रंकाचा राव होतो. परंतु, त्यासाठी आपले सत्कर्माचे पारडे जड असावे लागते. निरपेक्षपणे केलेली सेवा निश्चितच फळते, फक्त कधी, याची वाट न पाहता, कर्म करत राहायचे असते.