शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी व्हायचे असेल तर भूतकाळाचा विचार सोडा आणि भविष्यावर लक्ष्य केंद्रित करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 07:00 IST

जो भूतकाळाचा विचार करतो, त्याचे भविष्य कधीच उज्ज्वल असू शकत नाही!

भूतकाळात रमणे, हा मनुष्याचा स्थायी भाव आहे. परंतु, त्यात किती काळ रमावे, याचे बंधन आखायला हवे. अन्यथा आठवणींवर जगायची सवय लागते. आपण वर्तमानात जगायची सवय लावून घेतली पाहिजे. आज केलेले चांगले काम, भविष्यात भूतकाळाच्या आठवणी बनून समोर येणार आहेत, अगदी फेसबुक मेमरीसारख्या! म्हणून आपले लक्ष 'आज' वर केंद्रित केले पाहिजे. हिंदी मध्ये भूतकाळाला आणि भविष्यकाळाला `कल' असे संबोधले जाते. एक कल, म्हणजे काल आणि दुसरा कल म्हणजे उद्या. हे दोन्ही आपल्या हातात नाहीत, म्हणून आपला `कल' म्हणजे प्रभाव `आज'वरच असला पाहिजे. हे लक्षात घेऊन `कल हो ना हो' हे गाणे ऐकले, तर आपल्याला दोन्ही `कल' चा कल कोणत्या दिशेने आहे, हे लक्षात येईल. एक सुभाषितकार लिहितात,

चंदन उगाळले, तर खोड झिजेल, पण सहाण नाही. परंतु खोडाची झीज झाली, तरी किमान चंदन हाती येईल. आठवणींचे, दु:खाचे तसे नाही. ते जितके उगाळत राहू, त्यातून आपली मानसिक झीज होत राहिल. म्हणून सुभाषितकारांच्या सांगण्यानुसार, कालचा आणि उद्याचा विचार सोडून फक्त आजचा विचार करायला शिका. वक्त चित्रपटात प्रख्यात शायर साहिर लुधियानवी यांनीदेखील म्हटले आहे,

आगे भी जानेना तू, पिछे भी, जानेना तू, जो भी है, बस यही इक पल है।

झाल्या गोष्टीचा कधी खेद करू नये. इंग्रजीत एक वचन आहे, 'Don't cry over spilt milk' नासलेल्या दूधाबद्दल रडत बसू नका. पुढे तशी चूक होणार नाही, याबद्दल काळजी घ्या. झालेल्या चुकीतून शहाणे व्हा. रडत बसणे भेकडपणाचे लक्षण आहे.

आपल्या देशात दोन प्रकारची मंडळी भेटतात. पहिली मंडळी गतकाळाबद्दल अभिमान बाळगतात. आपले राष्ट्र पूर्वी परमवैभवात होते. तसे वैभव आपल्या राष्ट्राला मिळवून दिले की झाले. या विचारात ते इतिकर्तव्यता मानतात. पण हे वैभव कशामुळे गेले? तर परकिय आक्रमणामुळे. मोगल आले, इंग्रज, पोर्तुगीज आले. त्यांनी देशाला दारिद्रयात लोटले. ती स्थिती अजूनही फारशी बदललेली नाही. परकीयांनी आपल्यावर कसे अनन्वित अत्याचार केले याचा पाढा ते वाचत बसण्यापेक्षा, आपला देश हरतऱ्हेने स्वावलंबी कसा होईल, याचा विचार आणि कृती झाली पाहिजे. नुसत्या चर्चेतून सुडाची भावना निर्माण होते. त्यापेक्षा प्रगतीवर भर दिला पाहिजे.

लाँगफेलो नावाच्या इंग्रजी कवीने एक मार्मिक कविता केली होती, त्याचा अनुवाद ह. ना आपटे यांनी एका फटक्यात सांगितला,

गेल्या गोष्टी स्मरू नका, गतकाळाचा शोक फुका,पुढचा भासो कितीही सुखाचा काळ, भरवसा धरू नका,

जसा गतकाळाचा शोक करू नये, तशी भविष्यकाळाची व्यर्थ चिंताही करू नये. आता आमचं कसं होणार, या विचाराने हातपाय गाळू नयेत. भविष्यकाळ घडवण्याची आपल्यावर आहे. यासाठी केशवसुतांनी `तुतारी' फुंकून आपल्याला संदेश दिला आहे, 

जुने जाऊ द्या मरणालागुनि, जाळुनि किंवा पुरून टाका,सडत न एका ठायी, विक्रम काही करा, चला तर।

गत शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षण:।।

गतकाळाचा शोक करू नका. भविष्यकाळाची चिंता करू नका. शहाणे लोक वर्तमानाकडे बघून जगत असतात. हेच गीतकार सुधीर मोघे गाण्यातून लिहितात, 'भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर...या वळणावर!'