शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

तणाव आणि वाद टाळायचे तर आधी 'या' गोष्टी टाळा! : आचार्य चाणक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 18:16 IST

दररोजचा ताण हा मानसिक आजाराचे कारण बनत चालला आहे. मन शांत नसेल तर दैनंदिन काम, वैयक्तिक आयुष्याशी निगडित समस्या निर्माण होतात अकारण वादाला तोंड फुटते. 

चाणक्य नीतीमध्ये जीवन यशस्वी करण्यासाठी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यासोबतच त्रास, अनावश्यक वाद इत्यादीपासून दूर राहण्याचे उपाय सांगितले आहेत. जेणेकरून व्यक्तीचे पूर्ण लक्ष त्याच्या ध्येयावर आणि ते साध्य करण्याच्या मार्गावर राहील. त्याच्या आयुष्यात शांती आणि आनंदात राहू शकते. 

आजच्या काळात, बहुतेक लोक तणावामुळे त्रस्त आहेत. महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्रातील काही गोष्टींचा अवलंब केल्यास या समस्यांपासून सहज सुटका होऊ शकते.

क्रोध : तणाव आणि वाद टाळण्यासाठी, व्यक्तीला राग येऊ नये हे सर्वात महत्वाचे आहे. जर त्याने राग आणि कडू गोष्टी बोलण्यापासून स्वतःला वाचवले, तर त्यातून निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा तो टाळेलच, पण त्यातून निर्माण होणाऱ्या वादांमुळे होणारे परिणामही तो टाळू शकेल. याउलट, तो ज्याच्यावर रागावेल किंवा अपमान करेल, तो माणूस त्याच्या बदल्यात कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याचे नुकसान करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. यासाठीच त्याक्षणी रागावर नियंत्रण ठेवणे उचित ठरेल.

लोभ : लोभ माणसाला अनावश्यक ताण देतो. त्याला स्वार्थी बनवतो आणि त्याला अनेक चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडतो. तो अनेक वादात अडकतो आणि मानसिक ताणतणावही सहन करतो.

अहंकार : अहंकारी असणेही टाळावे. अहंकार मनुष्याला वास्तवापासून दूरच करत नाही तर त्याची वैचारिक क्षमता देखील नष्ट करतो. यामुळे त्याला विनाकारण अनेक समस्या आणि तणावाचा सामना करावा लागतो.

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य