शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पवनसुत हनुमानाप्रमाणे तुम्हालाही अष्टसिद्धी प्राप्त करायची असेल तर अशी करा उपासना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 08:00 IST

या सर्व सिद्धी आपल्या ठायी देखील असतात. आपल्या शरीरातील मूलाधार चक्राशी त्या स्थित असतात. त्या कार्यन्वित होण्यासाठी राम नामाची उपासना हवी.

अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशत्व, वशित्व. या आठ सिद्धी आहेत. त्यांना पारलौकिक शक्ती असेही संबोधले जाते. त्या प्राप्त झाल्या असता साधक कोणतेही चमत्कार करू शकतो आणि त्यांचा स्वैरपणे वापर करू शकतो.या सिद्धी हनुमंताला जन्मतः अवगत होत्या, परंतु त्यांना या शक्तींचा विसर पडला होता. मात्र रामकार्याच्या वेळी जांबुवंताने हनुमंताला त्याच्या ठायी असलेल्या शक्तीचा आठव करून दिला आणि पुढे श्रीराम आणि सीता माईच्या कृपेने त्या सिद्धी आणखी प्रबळ झाल्या. 

हनुमंताने जन्माला येताच भूक लागली म्हणून सूर्याला सफरचंद म्हणून ग्रासले होते. त्यावेळी राहू केतूने हनुमंताशी दोन हात केले. परंतु हनुमंत त्यांना पुरून उरतोय हे बघून इंद्राने त्याच्या हनुवटीवर वज्र प्रहार केला. बाल हनुमान मूर्च्छित होऊन पडला. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी अर्थात पवन देवांनी आपले कार्य थांबवले. सगळ्या जीव सृष्टीचे श्वासोच्छ्वास थांबले. तेव्हा सर्व देव पवन देवाला शरण आले. पवन देवांनी सर्व देवांना सांगून हनुमंताला शुद्धीवर आणायला सांगितले. त्यावेळेस इंद्र देवाने आदिशक्तीची उपासना करून हनुमंताला शुद्धीवर तर आणलेच शिवाय त्याला कठोर वज्रासमान बलदंड शरीर प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. त्यापाठोपाठ इतर देवांनीही हनुमंताला सिद्धी दिल्या. त्यामुळे बालपणीच हनुमंताला अष्टसिद्धी प्राप्त झाल्या. मात्र त्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी इंद्र देवांनी हनुमानाला वरदान दिले की ज्यावेळेस या सिध्दीची खरी आवश्यकता लागेल तेव्हा त्या सिद्धी कार्यन्वित होतील आणि राम कृपेने त्या सिद्धीला तेज प्राप्त होईल. 

त्यानुसार रामसेतू बांधताना किंवा लंकेत सीतेपर्यंत श्रीरामाचा निरोप देण्यासाठी अणू सारखे सूक्ष्म रूप धारण करण्यासाठी जांबुवंताने हनुमानाला त्याच्या ठायी असलेल्या शक्तींची आठवण करून दिली. त्यायोगे त्याचे सामर्थ्य वाढले आणि त्याने कधी सूक्ष्म तर कधी बलाढ्य रूप धारण करून रामकार्यासाठी सिद्धी वापरली. 

या सर्व सिद्धी आपल्या ठायी देखील असतात. आपल्या शरीरातील मूलाधार चक्राशी त्या स्थित असतात. त्या कार्यन्वित होण्यासाठी राम नामाची उपासना हवी. ध्यान धारणेने स्व सामर्थ्याचे भान येते. चांगल्या कार्यासाठी या अष्टसिद्धीचा वापर केला असता ईश्वरी शक्तीचेही पाठबळ मिळते. त्यासाठी सच्चा भाव आणि ईश्वरावर नितांत श्रद्धा हवी. तसेच स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर आपणही चमत्कार नक्कीच घडवू शकतो!

जय श्रीराम! बजरंग बली की जय!