शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पवनसुत हनुमानाप्रमाणे तुम्हालाही अष्टसिद्धी प्राप्त करायची असेल तर अशी करा उपासना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 08:00 IST

या सर्व सिद्धी आपल्या ठायी देखील असतात. आपल्या शरीरातील मूलाधार चक्राशी त्या स्थित असतात. त्या कार्यन्वित होण्यासाठी राम नामाची उपासना हवी.

अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशत्व, वशित्व. या आठ सिद्धी आहेत. त्यांना पारलौकिक शक्ती असेही संबोधले जाते. त्या प्राप्त झाल्या असता साधक कोणतेही चमत्कार करू शकतो आणि त्यांचा स्वैरपणे वापर करू शकतो.या सिद्धी हनुमंताला जन्मतः अवगत होत्या, परंतु त्यांना या शक्तींचा विसर पडला होता. मात्र रामकार्याच्या वेळी जांबुवंताने हनुमंताला त्याच्या ठायी असलेल्या शक्तीचा आठव करून दिला आणि पुढे श्रीराम आणि सीता माईच्या कृपेने त्या सिद्धी आणखी प्रबळ झाल्या. 

हनुमंताने जन्माला येताच भूक लागली म्हणून सूर्याला सफरचंद म्हणून ग्रासले होते. त्यावेळी राहू केतूने हनुमंताशी दोन हात केले. परंतु हनुमंत त्यांना पुरून उरतोय हे बघून इंद्राने त्याच्या हनुवटीवर वज्र प्रहार केला. बाल हनुमान मूर्च्छित होऊन पडला. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी अर्थात पवन देवांनी आपले कार्य थांबवले. सगळ्या जीव सृष्टीचे श्वासोच्छ्वास थांबले. तेव्हा सर्व देव पवन देवाला शरण आले. पवन देवांनी सर्व देवांना सांगून हनुमंताला शुद्धीवर आणायला सांगितले. त्यावेळेस इंद्र देवाने आदिशक्तीची उपासना करून हनुमंताला शुद्धीवर तर आणलेच शिवाय त्याला कठोर वज्रासमान बलदंड शरीर प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. त्यापाठोपाठ इतर देवांनीही हनुमंताला सिद्धी दिल्या. त्यामुळे बालपणीच हनुमंताला अष्टसिद्धी प्राप्त झाल्या. मात्र त्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी इंद्र देवांनी हनुमानाला वरदान दिले की ज्यावेळेस या सिध्दीची खरी आवश्यकता लागेल तेव्हा त्या सिद्धी कार्यन्वित होतील आणि राम कृपेने त्या सिद्धीला तेज प्राप्त होईल. 

त्यानुसार रामसेतू बांधताना किंवा लंकेत सीतेपर्यंत श्रीरामाचा निरोप देण्यासाठी अणू सारखे सूक्ष्म रूप धारण करण्यासाठी जांबुवंताने हनुमानाला त्याच्या ठायी असलेल्या शक्तींची आठवण करून दिली. त्यायोगे त्याचे सामर्थ्य वाढले आणि त्याने कधी सूक्ष्म तर कधी बलाढ्य रूप धारण करून रामकार्यासाठी सिद्धी वापरली. 

या सर्व सिद्धी आपल्या ठायी देखील असतात. आपल्या शरीरातील मूलाधार चक्राशी त्या स्थित असतात. त्या कार्यन्वित होण्यासाठी राम नामाची उपासना हवी. ध्यान धारणेने स्व सामर्थ्याचे भान येते. चांगल्या कार्यासाठी या अष्टसिद्धीचा वापर केला असता ईश्वरी शक्तीचेही पाठबळ मिळते. त्यासाठी सच्चा भाव आणि ईश्वरावर नितांत श्रद्धा हवी. तसेच स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला तर आपणही चमत्कार नक्कीच घडवू शकतो!

जय श्रीराम! बजरंग बली की जय!