शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पद, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा हवी असेल, तर नवग्रहांची अनुकूलता मिळवा; त्यासाठी खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 16:25 IST

प्रत्येक व्यक्तीच्या राशीला कोणता ना कोणता ग्रह अनुकूल असतो. परंतु जर इतर ग्रहांचेही पाठबळ मिळाले, तर जीवनात कोणतीही अडचण येत नाही आणि वैभव आणि ऐश्वर्य भरपूर लाभते. 

पद, प्रसिद्धी, पैसा मिळवण्यासाठी मनुष्य जीवाचे रान करतो. त्यासाठी पडेल ते कष्ट करतो. परंतु दरवेळी प्रयत्नांना यश मिळतेच असे नाही. त्याला कारणीभूत ग्रहस्थिती देखील असू शकते. ज्यामुळे त्याला त्याच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकत नाही.कोणतेही चांगले करिअर घडवण्यासाठी ग्रहांचे पाठबळ महत्त्वाचे असते.  तुमच्या कुंडलीतील कोणते ग्रह तुमच्यासाठी अनुकूल नाहीत हे तुम्हाला ज्योतिषांकडून कळू शकते. ते प्रभावी करण्यासाठी जाणून घेऊया पुढील ज्योतिषशास्त्रीय उपाय!

सूर्य : सूर्य अर्थात रवी ग्रह. हा ग्रह भाग्यकारक आहे. मात्र तुमच्या कुंडलीत रवी प्रबळ नसेल, तर अशा लोकांनी रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातुन पाणी प्यावे. रोज कणभर वेलचीचे सेवन देखील उपयुक्त ठरू शकते. महत्त्वाच्या कामाच्या वेळी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ ठरते. 

चंद्र : चंद्राला आकर्षून घेण्यासाठी चांदी या धातूचा वापर केला जातो. म्हणून कोजागरी पौर्णिमेलाही आपण चांदीच्या पेल्यात दूध ठेवून चंद्राला नैवेद्य दाखवतो.  ज्यांच्या कुंडलीत चंद्राचे पाठबळ कमी असेल त्यांनी चांदीचा वापर अधिक करावा. चांदीची अंगठी, चैन, पेला, वाटी अशा स्वरूपात वापर करता येईल. 

मंगळ : मंगळाची कृपा मिळविण्यासाठी स्टील ऐवजी तांब्याच्या भांड्याचा वापर करावा. अंगठी, मंगळ सूत्र, हार, कडे अशा दागिन्यांच्या माध्यमातून पोवळे धारण करावे. कपाळावर कुंकू लावावे आणि महत्त्वाच्या कामाच्या वेळी लाल वस्त्र परिधान करावे. 

बुध : बुध हा ग्रह बुद्धीचा कारक आहे. प्रत्येक वेळी शक्ती वापरून कामे होत नाहीत तर काही ठिकाणी युक्तीचीच गरज पडते. त्यासाठी बुधाचे पाठबळ महत्त्वाचे. यासाठी गणेशाची आराधना करावी, ओंकार जप करावा आणि महत्त्वाच्या प्रसंगी हिरवा रंग वापरावा. 

गुरु : गुरुचे पाठबळ नसेल तर जीवन व्यर्थ आहे. ज्यांच्या कुंडलीत गुरु उच्चीचा असतो, अशा लोकांना इतर ग्रहदशा अनुकूल नसेल तरी यश मिळतेच. मात्र तुमच्या कुंडलीत गुरु प्रबळ नसेल तर दत्त उपासनेला पर्याय नाही. पिवळा रंग लाभदायक ठरेल तसेच केशर युक्त दुधाचे सेवन फायद्याचे ठरेल. 

शुक्र: शुक्र हा ग्रह आपल्या आयुष्यात रंजकता वाढवणारा आहे. रसिकता हा या ग्रहाचा मूळ स्वभाव आहे. मनुष्य रसिक नसेल तर त्याच्यात आणि अन्य प्राण्यांमध्ये फरक तो काय? शुक्राचा प्रभाव वाढावा म्हणून दर पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य द्या. दुधाचा नैवेद्य दाखवा आणि पांढरे वस्त्र परिधान करण्याचा नेम ठेवा. 

शनि: शनी देवाचे पाठबळ लाभावे असा सर्व राशीच्या लोकांचा सदैव प्रयत्न असतो. शनीला निळा रंग प्रिय आहे. ज्यांना शनी अनुकूल राहावा वाटते, त्यांनी महत्त्वाच्या कामांच्या वेळी निळे वस्त्र परिधान करावे. गोरगरिबांना दानधर्म करावा आणि ज्येष्ठांची सेवा करावी. 

राहू : राहूला प्रसन्न करण्यासाठी गाय, कुत्रा किंवा अन्य पाळीव प्राण्याला भाकरीचा तुकडा खाऊ घालावा. राहू दशा पालटते. गरजू लोकांना राखाडी वस्त्रे, काळ्या चपला यांचे दान देखील उपयुक्त ठरू शकते. 

केतू : केतूचा प्रभाव वाढावा म्हणून अनेक जण लाल रंगाचा धागा मनगटावर बांधतात. तसेच विष्णूंची उपासना करतात. एकादशीचे व्रत करतात. यामुळे केतू अनुकूल होऊन आपल्या महत्त्वाच्या कामात अडथळे येत नाहीत. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष