शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

कोणी मदत करेल याची वाट बघत बसलात, तर तुमची वाट निश्चितच चुकेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 4:21 PM

स्वावलंबी व्हा. स्वत:च्या कष्टाने मिळेल, तेवढेच घ्या. दुसऱ्याच्या मेहेरबानीवर जगण्यापेक्षा आत्मसन्मानाने जगणे केव्हाही चांगले!

'जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला' अशा शब्दात समर्थ रामदास स्वामी आपली कानउघडणी करतात. परंतु आपण सुधारत नाही. आपल्याला छोट्या छोट्या बाबतीत दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची सवय लागलेली असते. ही सवय एक दिवस आपला घात करते. कशी ते पहा...

एका शेतकऱ्याला मुलगा होता. शेतकऱ्याला वाटत होते, भविष्यात मुलाने आपले काम सांभाळावे. परंतु मुलाला राजाच्या सैन्यात भरती व्हायचे होते. शेतकऱ्याने त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा दिली. मुलाला सैन्यात भरती व्हायचे असले, तरी त्यासाठी लागणारे कोणतेही गुण त्याच्या अंगी नव्हते. ना कमावलेले शरीर ना शस्त्र विद्येत प्राविण्य. त्याचा मामा सैन्यात सेनापती होता. मुलाने आपल्या आईला सांगून मामाकडे शब्द टाकायला लावला. भाच्याला नकार कसा द्यायचा, म्हणून मामाने त्याला सैन्यात भरती करून घेतले, पण जिथे विशेष कामे नसतात, अशा विभागात त्याची नियुक्ती केली.

मुलगा इतर सैनिकांसारखा ताठ मानेने गावात फिरू लागला. एकदा परराज्यातून हल्ला झाला आणि सैन्य विभागाच्या तळा गाळातील सैनिकांनासुद्धा युद्धभूमीवर लढण्याचा प्रसंग आला. त्यावेळेस या मुलालाही नाईलाजाने जावे लागले. परंतु, त्याला युद्धाचे जराही ज्ञान नसल्याने इतर सैनिक त्याचे संरक्षण करत त्याला परत घेऊन आले. त्यांनी सेनापतीजवळ त्याची तक्रार केली. मामा असूनही सेनापतींचा नाईलाज झाला. त्यांनी भाच्याला राजाच्या दरबाराबाहेरचा पहारेकरी म्हणून नोकरी लावून दिली. 

दिवसरात्र उभे राहून, पहारा देऊन आधीच कमकुवत असलेला मुलगा प्रकृतीने आणखी ढासळू लागला. त्याला मामाचीसुद्धा साथ मिळणार नव्हती. तो राजाकडे काही वशिला लागेल या आशेने उभा असे. थंडीच्या दिवसात हुडहुडत पहारा देत असताना एक दिवस राजाचे लक्ष त्याच्याकडे गेले. राजाने त्याची चौकशी केली आणि सेवकांकरवी त्याच्यासाठी उबदार शाल पाठवतो, असे राजाने आश्वासन दिले. मुलाला हायसे वाटले. राजाने आपली दखल घेतली याचा त्याला आनंद झाला. परंतु बराच काळ वाट बघूनही आतून शाल आली नाही. कारण राजा महालात गेल्यावर ही छोटीशी गोष्ट विसरून गेला. परंतु, बाहेर उभ्या असलेल्या मुलाने शालीसाठी तिष्ठत प्राण सोडले.

या कथेवरून लक्षात येते, की कोणी आपल्या मदतीला धावून येईल, याची वाट बघत बसलात तर आहे तेही गमावून बसाल. म्हणून स्वावलंबी व्हा. स्वत:च्या कष्टाने मिळेल, तेवढेच घ्या. दुसऱ्याच्या मेहेरबानीवर जगण्यापेक्षा आत्मसन्मानाने जगणे केव्हाही चांगले!