शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

कोणत्याही कामात मन लागत नसेल, तर साधू बाबांची ही गोष्ट तुम्हाला नक्की उपयोगी पडेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 08:00 IST

माणसाचे नाव नाही तर काम बोलले पाहिजे. काम बोलू लागले की नाव आपोआप होणारच!

एका गावात एक साधू होते. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे होती. उत्तर देण्याची हातोटीसुद्धा अनोखी होती. कोणालाही सहज समजू शकेल अशी ओघवती वाणी आणि साधे सोपे उपाय कळल्याने लोकांना प्रश्नांची उकल झाल्याचे समाधान मिळत असे. 

साधू महाराजांची ख्याती त्या राज्याच्या राजापर्यंत पोहोचली. राजाने विचार केला, गेले अनेक दिवस आपले कोणत्याच कामात मन लागत नाहीये, तर आपण साधू महाराजांकडे काही उपाय मिळतोय का पहावं. असा विचार करून तो सुंदर पालखी साधू महारजांना आणण्यासाठी पाठवणार होता. तेव्हा प्रधान म्हणाले, `राजेसाहेब त्या साधूंना सगळे गावकरी मानतात. ते अतिशय ज्ञानी आहेत. त्यांना बोलावणे पाठवण्यापेक्षा आपण स्वत: तिथे जाणे योग्य दिसेल व आपला नम्रपणा साधू महाराजांना आवडेल.'

प्रधानांचे बोलणे राजाला पटले. तो आपल्या मोजक्या सैनिकांसह राजेशाही रथातून साधू महाराजांच्या आश्रमात पोहोचला. तिथे गेल्यावर पाहतो तर साधू महाराज एक खड्डा खणत होते. राजाने तिथे जाऊन साधू महाराजांना दुरूनच नमस्कार केला आणि येण्याचे प्रयोजन सांगितले. पण साधू महाराजांचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही. राजाला त्यांचे वागणे अपमानास्पद वाटले. तरीही तो शांत उभा होता. तास दोन तास होऊन गेले तरी साधू महाराज काम थांबवेना आणि राजाची दखल घेईना. शेवटी राजाने परत जायचे ठरवले. 

तेवढ्यात हातातली अवजारे बाजूला टाकून चिखलात माखलेल्या स्थितीत साधू बाबा बाहेर आले. मातीचे हात जोडून त्यांनी राजाला अभिवादन केले. साधू महाराजांचे तेजस्वी रूप पाहून राजाचा राग निवळला आणि त्याने आपले दु:ख कथन केले. ते ऐवूâन साधू महाराज म्हणाले, `हा तुझा प्रश्न असेल राजन, तर त्याचे उत्तर मी कधीच दिले.'

हे ऐकून आश्चर्यचकित झालेला राजा म्हणाला, `महाराज हे कसे शक्य आहे? आपण तर आता क्षणभरापूर्वी पहिल्यांना भेटलो, बोललो. मग तुम्ही मला उत्तर कधी दिलेत?'

यावर साधू महाराज म्हणाले, `सगळ्याच गोष्टी शब्दातून सांगता येत नाही, तर कृतीतूनही समजून घ्यायचे असते. ज्याप्रमाणे काम करताना मी माझ्या कामात मग्न झालो होतो, तसे तू तुझ्या आवडीचे काम करताना मग्न होण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोच. तेव्हाच तुला जगाचा विसर पडेल आणि तुझे हाती घेतलेले काम पूर्ण होईल. तुझे कामात मन न लागण्याचे कारण हेच आहे, की तू जीव ओतून काम करत नाहीयेस. जो आपल्या कामात आपला आनंद शोधतो, त्याचे मन कामात नेहमी रमते. ते काम उत्कृष्ठ होते. म्हणून काम करताना मन लावून करायला शिक, तुझा प्रश्न आपोआप सुटेल.'

आपल्याही बाबतीत अनेकदा असे घडते, त्याचे कारण हेच आहे, की आपण मन लावून, जीव ओतून काम करत नाही. म्हणून त्या कामाला झळाळी येत नाही. असे म्हणतात, की माणसाचे नाव नाही तर काम बोलले पाहिजे. काम बोलू लागले की नाव आपोआप होणारच! म्हणून तुम्हीसुद्धा यशस्वी होण्यासाठी धडपडत असाल, तर साधू महाराजांची ही शिकवण कायम लक्षात ठेवा. कामात स्वत:ला झोकून द्या आणि बाकीचे जग विसरून जा.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी