शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही कामात मन लागत नसेल, तर साधू बाबांची ही गोष्ट तुम्हाला नक्की उपयोगी पडेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 08:00 IST

माणसाचे नाव नाही तर काम बोलले पाहिजे. काम बोलू लागले की नाव आपोआप होणारच!

एका गावात एक साधू होते. त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे होती. उत्तर देण्याची हातोटीसुद्धा अनोखी होती. कोणालाही सहज समजू शकेल अशी ओघवती वाणी आणि साधे सोपे उपाय कळल्याने लोकांना प्रश्नांची उकल झाल्याचे समाधान मिळत असे. 

साधू महाराजांची ख्याती त्या राज्याच्या राजापर्यंत पोहोचली. राजाने विचार केला, गेले अनेक दिवस आपले कोणत्याच कामात मन लागत नाहीये, तर आपण साधू महाराजांकडे काही उपाय मिळतोय का पहावं. असा विचार करून तो सुंदर पालखी साधू महारजांना आणण्यासाठी पाठवणार होता. तेव्हा प्रधान म्हणाले, `राजेसाहेब त्या साधूंना सगळे गावकरी मानतात. ते अतिशय ज्ञानी आहेत. त्यांना बोलावणे पाठवण्यापेक्षा आपण स्वत: तिथे जाणे योग्य दिसेल व आपला नम्रपणा साधू महाराजांना आवडेल.'

प्रधानांचे बोलणे राजाला पटले. तो आपल्या मोजक्या सैनिकांसह राजेशाही रथातून साधू महाराजांच्या आश्रमात पोहोचला. तिथे गेल्यावर पाहतो तर साधू महाराज एक खड्डा खणत होते. राजाने तिथे जाऊन साधू महाराजांना दुरूनच नमस्कार केला आणि येण्याचे प्रयोजन सांगितले. पण साधू महाराजांचे त्याच्याकडे लक्ष गेले नाही. राजाला त्यांचे वागणे अपमानास्पद वाटले. तरीही तो शांत उभा होता. तास दोन तास होऊन गेले तरी साधू महाराज काम थांबवेना आणि राजाची दखल घेईना. शेवटी राजाने परत जायचे ठरवले. 

तेवढ्यात हातातली अवजारे बाजूला टाकून चिखलात माखलेल्या स्थितीत साधू बाबा बाहेर आले. मातीचे हात जोडून त्यांनी राजाला अभिवादन केले. साधू महाराजांचे तेजस्वी रूप पाहून राजाचा राग निवळला आणि त्याने आपले दु:ख कथन केले. ते ऐवूâन साधू महाराज म्हणाले, `हा तुझा प्रश्न असेल राजन, तर त्याचे उत्तर मी कधीच दिले.'

हे ऐकून आश्चर्यचकित झालेला राजा म्हणाला, `महाराज हे कसे शक्य आहे? आपण तर आता क्षणभरापूर्वी पहिल्यांना भेटलो, बोललो. मग तुम्ही मला उत्तर कधी दिलेत?'

यावर साधू महाराज म्हणाले, `सगळ्याच गोष्टी शब्दातून सांगता येत नाही, तर कृतीतूनही समजून घ्यायचे असते. ज्याप्रमाणे काम करताना मी माझ्या कामात मग्न झालो होतो, तसे तू तुझ्या आवडीचे काम करताना मग्न होण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोच. तेव्हाच तुला जगाचा विसर पडेल आणि तुझे हाती घेतलेले काम पूर्ण होईल. तुझे कामात मन न लागण्याचे कारण हेच आहे, की तू जीव ओतून काम करत नाहीयेस. जो आपल्या कामात आपला आनंद शोधतो, त्याचे मन कामात नेहमी रमते. ते काम उत्कृष्ठ होते. म्हणून काम करताना मन लावून करायला शिक, तुझा प्रश्न आपोआप सुटेल.'

आपल्याही बाबतीत अनेकदा असे घडते, त्याचे कारण हेच आहे, की आपण मन लावून, जीव ओतून काम करत नाही. म्हणून त्या कामाला झळाळी येत नाही. असे म्हणतात, की माणसाचे नाव नाही तर काम बोलले पाहिजे. काम बोलू लागले की नाव आपोआप होणारच! म्हणून तुम्हीसुद्धा यशस्वी होण्यासाठी धडपडत असाल, तर साधू महाराजांची ही शिकवण कायम लक्षात ठेवा. कामात स्वत:ला झोकून द्या आणि बाकीचे जग विसरून जा.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी