शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

योग्य गुरु लाभले तर आयुष्याचे सोने कसे होते? याचा अनुभव सांगताहेत स्वामी विवेकानंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 07:00 IST

गुरु योग्य मिळावा वाटत असेल तर स्वतःला चांगला शिष्य म्हणून घडवा, स्वामी विवेकानंद यांनी तसेच केले म्हणून  परमहंस लाभले!

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज दैनंदिन आयुष्यातील उदाहरणे देऊन परमार्थ सोपा करून सांगतात. ते म्हणतात, संतांचा, गुरुंचा शोध घेत तुम्ही फिरू नका. खडीसाखरेचा खडा ठेवला, की मुंग्यांना जाऊन सांगावे लागत नाही. त्या आपणहून खडीसाखरेकडे धाव घेतात. त्याचप्रमाणे, तुम्हीदेखील संतांच्या, गुरुंच्या शोधात वेळ वाया घालवू नका. तो वेळ तुम्ही स्वत:च्या जडणघडणीसाठी वापरा. स्वत:ला सिद्ध करा. चांगली व्यक्ती बना. खडीसाखरेसारखा गोडवा स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्यात पेरायला शिका. अशा खडीसाखरेची गोडी चाखण्यासाठी चांगले लोक तुमच्याशी आपोआप जोडले जातील. 

ज्याप्रमाणे शिष्य आपल्या गुरुंच्या भेटीसाठी तळमळत असतो, तसा गुरुदेखील सच्चा शिष्यासाठी तळमळत असतो. याबाबीत रामकृष्ण परमहंस यांचा किस्सा आठवतो. त्यांच्या भेटीला आलेल्यांमध्ये नरेंद्र नावाचा बालक आपला भावी शिष्य होईल याची त्यांना आणि नरेंद्रलादेखील कल्पना नव्हती. मित्राच्या सांगण्यावरून नरेंद्रने रामकृष्ण परमहंस यांच्यासमोर एक भजन सादर केले आणि त्याचे सूर रामकृष्णांच्या काळजाला भिडले. त्यांना नरेंद्रमध्ये आपला शिष्य गवसला. परंतु, नरेंद्र स्वत: त्यांची परीक्षा घेईपर्यंत त्यांच्यापासून दूर दूर पळत होता. मात्र, असे केल्याने त्याचेच चित्त विचलित होत राहिले. शेवटी त्याने रामकृष्णांची भेट घेतली. त्या भेटीत रामकृष्णांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि नरेंद्राची क्षणभर समाधी लागली. सगळी चिंता, क्लेष लयाला जाऊन नरेंद्राने परमानंदाची अनुभूती घेतली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रामकृष्णांनी डोक्यावरून हात काढताच नरेंद्राची समाधी भंग झाली. त्या एका क्षणात नरेंद्रची गुरुंवर श्रद्धा जडली आणि त्याने रामकृष्णांचे कायमस्वरूपी शिष्यत्व पत्करले. एवढेच नव्हे, तर भविष्यात स्वामी विवेकानंद म्हणून नावलौकिक मिळाल्यानंतरही गुरुंच्या नावे `रामकृष्ण मिशन' अंतर्गत धर्मकार्य पार पाडले.

गोंदवलेकर महाराजदेखील आपल्याला हेच सांगतात, गुरुंच्या मार्गदर्शनाने तुमचे कार्य सोेपे होईल. त्यांच्याशिवाय तुम्ही कार्य करू पहाल, तर त्या कार्याला मी पणा चिकटेल आणि अहंकार डोकावला, की कार्य पूर्ण होणार नाही. याउलट गुरुंचे मार्गदर्शन लाभल्यामुळे आपण योग्य रितीने कार्य करत आहोत, ही श्रद्धा कायम राहिल आणि मनात कोणतेही द्वैत राहणार नाही. 

भगवंताचे नाम घेतानाही गुुरुंना साक्ष ठेवा. नाम घेण्याला अहंकार चिकटणार नाही. योग्य रितीने नाम घेतले जाईल आणि परमार्थाची वाट सोपी होईल. भगवंताचे नाम औषध आहे. ते घेत राहा. नामामुळे तुमचे मन स्वच्छ झाले, की सद्भावना जागी होईल, सत्कार्य घडेल आणि तुम्ही खडीसाखरेसारखे गोड व्यक्तीमत्त्व व्हाल. मग आपोआपच गुरु, संत तुमच्या कार्याला पुष्टी देण्यासाठी तुमच्याकडे धाव घेतील.