शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

मनाचे व्यवस्थापन कसे करायचे?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 08:48 IST

मनाला काय पाहिजे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे, मनाला पाहिजे स्थिरता. प्रचंड शक्तीच्या या मनाच्या घरी दुष्काळ आहे तो फक्त या स्थैर्याचा.

मनाचे व्यवस्थापन करायचे म्हणजे मनाला आवरायचे असते, मनाला सावरायचे असते, मनाला सजवायचे असते आणि मनाला जोडायचे असते. मन मोठे विलक्षण आहे म्हटले तर मन आहे शंकर नाही तर तेच आहे भयंकर, म्हटले तर मन आहे हनुमान नाही तर तेच आहे चंचल मर्कट, मन हे देव आहे तसे ते दैत्यही आहे, मनहे परम मित्र आहे तसे ते मोठे शत्रूही आहे. मोक्षप्राप्त करून देणारे मनच व भवबंधनात जखडून टाकणारे मनच.

अति विलक्षण मन प्रत्येक मानवाच्या वाट्याला आलेले आहे. अशा जबरदस्त व बलवान मनाला आवरल्याशिवाय मानवाला तरणोपाय नाही, मन हे लहान मुलासारखे आहे. मुलाचे लाड केले तर लाडाऊन हाताबाहेर जाते, त्याला मार देत राहिलात तर ते कोडगे बनते, मुलाची उपेक्षा केली तर कुठल्या क्षणीये काय प्रसंग आपल्यावर ओढवून आणील हे सांगता येणे कठीण आहे, आपल्या मनाचे अगदी तसेच आहे. मनाला मोकळे सोडले तर ते डोक्यावर बसते, जर मनाला मारण्याचा प्रयत्न केला तर ते उरावर बसते. मनाचीउपेक्षा केली तर ते दबा धरून बसते व संधी सापडताच आपला घात करते.

अशा या मनाला आवरायचं कसं? हाच मानवाच्या पुढे भला मोठा यक्ष प्रश्न आहे. या मनाचा प्रश्न सोडविण्यासाठी निरनिराळी माणसे निरनिराळे प्रयत्न करतात,परंतु या मनाला आवरण्याचा प्रयत्न करताना हे मन अधिकच भरकटत जाते.अशा बिकट परिस्थितीत मनाला आवरण्यासाठी काय करायचे? याला उत्तर अस की मनाला जे पाहिजे ये मनाला दिले कि मन वश होते, यावर तुम्ही म्हणाल सध्या आम्ही तेच करीत आहोत,पण मन काही आवरता येत नाही उलटते जास्तच भरकटत चालले आहे. सध्या आपण काय करतो? मनाला जे पाहिजे तेच देतो.मनाला पाहिजे सिनेमा,तात्काळ मनाची मागणी मान्य. मनाला पाहिजे दारु तात्काळ गुंत्यात प्रयाण, मनाने मागण्याचा अवकाश की आपण आकाशपातळ एक करून त्याची मागणी पूर्ण करतो. Beg, buy, borrowor steal, पण मनाचे मनोरथ पूर्ण झालेच पाहिजेत अशी आपली धारणा असते.

"मनाला पाहिजे ते दिले की मनाचे समाधान होते" ही गोष्ट अगदी खरी आहे पण मुळात अडचण अशी आहे की मनाला काय पाहिजे तेच मनाला माहित नाही. लहान मुलाचं कसं असतं त्याला एक खेळणं दिलं की थोडा वेळ गप्प बसतं,नंतर ते खेळणं नको दुसरं पाहिजे, तशी या मनाची अवस्था आहे. मनाला काय पाहिजे तेच मनाला माहित नाही,त्या अभावी काही तरी मिळवीत रहावयाचे मिळाले की फेकून द्यावयाचे व परत दुसरे काही मिळवायचे ते मिळाले की तेही पुन्हां फेकून द्यावयाचे अशा चक्रात सापडून त्याची केविलवाणी अवस्था होते.

मनाला काय पाहिजे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे, मनाला पाहिजे स्थिरता. प्रचंड शक्तीच्या या मनाच्या घरी दुष्काळ आहे तो फक्त या स्थैर्याचा. परंतू मनाची हाव व धांव कधीच संपत नाही व त्याला पाहिजे असलेलं स्थैर्य तेही मिळत नाही.

आज मन आवरण्याचा प्रयत्नात होत असं, मोठया घड्याळ्याला असलेला लंबक ज्याप्रमाणे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडेव परत दुसऱ्या टोकाकडून पहिल्या टोकाकडे सारखा फिरत असतो, तसा आपल्या मनाचा लंबक भूतकाळकडून भविष्यकाळकडे व परत भविष्यकाळातून भूतकाळकडे असा सारखा भ्रमण करीत असतो. वर्तमानकाळात तो क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. ज्याक्षणी मनाला स्थैर्य प्राप्तहोईल त्याचक्षणी मन वर्तमान काळात स्थिर राहू शकेल.  

मन वर्तमान काळात स्थिर करावयाचे कसे ते मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक भेटावे लागतात. अशामार्गदर्शकालाच श्रीसद्गुरु म्हणतात. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात

'सद्गुरुवाचोनी सापडेना सोयधरावेते पाय आधी आधी.

- प्रल्हाद वामनराव पैआजीव विश्वस्त जीवनविद्या मिशन

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक