शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

मनाचे व्यवस्थापन कसे करायचे?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 08:48 IST

मनाला काय पाहिजे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे, मनाला पाहिजे स्थिरता. प्रचंड शक्तीच्या या मनाच्या घरी दुष्काळ आहे तो फक्त या स्थैर्याचा.

मनाचे व्यवस्थापन करायचे म्हणजे मनाला आवरायचे असते, मनाला सावरायचे असते, मनाला सजवायचे असते आणि मनाला जोडायचे असते. मन मोठे विलक्षण आहे म्हटले तर मन आहे शंकर नाही तर तेच आहे भयंकर, म्हटले तर मन आहे हनुमान नाही तर तेच आहे चंचल मर्कट, मन हे देव आहे तसे ते दैत्यही आहे, मनहे परम मित्र आहे तसे ते मोठे शत्रूही आहे. मोक्षप्राप्त करून देणारे मनच व भवबंधनात जखडून टाकणारे मनच.

अति विलक्षण मन प्रत्येक मानवाच्या वाट्याला आलेले आहे. अशा जबरदस्त व बलवान मनाला आवरल्याशिवाय मानवाला तरणोपाय नाही, मन हे लहान मुलासारखे आहे. मुलाचे लाड केले तर लाडाऊन हाताबाहेर जाते, त्याला मार देत राहिलात तर ते कोडगे बनते, मुलाची उपेक्षा केली तर कुठल्या क्षणीये काय प्रसंग आपल्यावर ओढवून आणील हे सांगता येणे कठीण आहे, आपल्या मनाचे अगदी तसेच आहे. मनाला मोकळे सोडले तर ते डोक्यावर बसते, जर मनाला मारण्याचा प्रयत्न केला तर ते उरावर बसते. मनाचीउपेक्षा केली तर ते दबा धरून बसते व संधी सापडताच आपला घात करते.

अशा या मनाला आवरायचं कसं? हाच मानवाच्या पुढे भला मोठा यक्ष प्रश्न आहे. या मनाचा प्रश्न सोडविण्यासाठी निरनिराळी माणसे निरनिराळे प्रयत्न करतात,परंतु या मनाला आवरण्याचा प्रयत्न करताना हे मन अधिकच भरकटत जाते.अशा बिकट परिस्थितीत मनाला आवरण्यासाठी काय करायचे? याला उत्तर अस की मनाला जे पाहिजे ये मनाला दिले कि मन वश होते, यावर तुम्ही म्हणाल सध्या आम्ही तेच करीत आहोत,पण मन काही आवरता येत नाही उलटते जास्तच भरकटत चालले आहे. सध्या आपण काय करतो? मनाला जे पाहिजे तेच देतो.मनाला पाहिजे सिनेमा,तात्काळ मनाची मागणी मान्य. मनाला पाहिजे दारु तात्काळ गुंत्यात प्रयाण, मनाने मागण्याचा अवकाश की आपण आकाशपातळ एक करून त्याची मागणी पूर्ण करतो. Beg, buy, borrowor steal, पण मनाचे मनोरथ पूर्ण झालेच पाहिजेत अशी आपली धारणा असते.

"मनाला पाहिजे ते दिले की मनाचे समाधान होते" ही गोष्ट अगदी खरी आहे पण मुळात अडचण अशी आहे की मनाला काय पाहिजे तेच मनाला माहित नाही. लहान मुलाचं कसं असतं त्याला एक खेळणं दिलं की थोडा वेळ गप्प बसतं,नंतर ते खेळणं नको दुसरं पाहिजे, तशी या मनाची अवस्था आहे. मनाला काय पाहिजे तेच मनाला माहित नाही,त्या अभावी काही तरी मिळवीत रहावयाचे मिळाले की फेकून द्यावयाचे व परत दुसरे काही मिळवायचे ते मिळाले की तेही पुन्हां फेकून द्यावयाचे अशा चक्रात सापडून त्याची केविलवाणी अवस्था होते.

मनाला काय पाहिजे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे, मनाला पाहिजे स्थिरता. प्रचंड शक्तीच्या या मनाच्या घरी दुष्काळ आहे तो फक्त या स्थैर्याचा. परंतू मनाची हाव व धांव कधीच संपत नाही व त्याला पाहिजे असलेलं स्थैर्य तेही मिळत नाही.

आज मन आवरण्याचा प्रयत्नात होत असं, मोठया घड्याळ्याला असलेला लंबक ज्याप्रमाणे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडेव परत दुसऱ्या टोकाकडून पहिल्या टोकाकडे सारखा फिरत असतो, तसा आपल्या मनाचा लंबक भूतकाळकडून भविष्यकाळकडे व परत भविष्यकाळातून भूतकाळकडे असा सारखा भ्रमण करीत असतो. वर्तमानकाळात तो क्षणभरही स्थिर राहू शकत नाही. ज्याक्षणी मनाला स्थैर्य प्राप्तहोईल त्याचक्षणी मन वर्तमान काळात स्थिर राहू शकेल.  

मन वर्तमान काळात स्थिर करावयाचे कसे ते मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक भेटावे लागतात. अशामार्गदर्शकालाच श्रीसद्गुरु म्हणतात. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात

'सद्गुरुवाचोनी सापडेना सोयधरावेते पाय आधी आधी.

- प्रल्हाद वामनराव पैआजीव विश्वस्त जीवनविद्या मिशन

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक