शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Hanuman Jayanti 2021 : हनुमान नक्की नर होता की वानर? पाहूया वाल्मीकी रामायाणातील संदर्भ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 11:51 IST

Hanuman Jayanti 2021 : वानर नसूनही त्यांच्यासारखी वाटणारी शरीराची ठेवण, रंग रूप, काही मानसिक व शारीरिक प्रवृत्ती यात, हनुमान इत्यादींच्या तथाकथित वानर समाजात आणि प्रत्यक्ष वानरांत साम्य दिसून येत असावे.

सर्वसामान्य लोक हनुमान, वाली, सुग्रीव इत्यादींना वानर म्हणजे खरोखरच शेपटी असलेले पशू वानर समजतात. कारण त्यांच्या दृष्टीने ते मनुष्य नव्हेत. आजही वानरांकडे पशूंपेक्षा वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते, ते रामायणातील हनुमा, अंगद इ. वानर पात्रांकडे पहावयाच्या दृष्टीकोनाच्या प्रभावामुळेच असावे, परंतु वानर समाज आणि संस्कृतीनचे वाल्मीकी रामायणात जे चित्रण पहावयास मिळते, त्याचा बारकाईने विचार केल्यास असे ठामपणे म्हणता येते, की वानर समाज वस्तुत: काल्पनिक समाज नाही, वानर हे मनुष्यच होते व त्या समाजाची स्वत:ची अशी सामाजिक व्यवस्था होती, स्वत:ची संस्कृती होती. ते पराक्रमी, शूर आणि सशक्त होते.

वाल्मीकींनी हनुमानाचा उल्लेख `वानर', `कपी', `शाखामृग' इत्यादी नावांनी केला आहे. इतकेच नव्हे तर त्याला पुच्छधारी म्हणून चित्रित केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात `हनुमान वानर की नर?' असा प्रश्न उत्पन्न होतो. परंतु हनुमानाचे पुच्छ हे हात, पाय याप्रमाणे त्याच्या शरीराचे अवयव नव्हते. ते त्याच्या समाजाचे विशिष्ट चिन्ह असावे, व ते बाहेरून शरीराला जोडण्यात येत असावे. रावणाने हे पुच्छ वानरांचे सर्वाधिक प्रिय भूषण आहे, असे म्हटले आहे. 

वानरांची उड्या मारण्याची, धावण्याची प्रवृत्ती सूचित करण्याच्या दृष्टीने `प्लवंग', `प्ववंगम' हे शब्द सार्थ आहेत. हनुमान धावण्याच्या कलेत निपुण होता. `कपि' या शब्दाचा सामान्य अर्थ `वानर' असा आहे. रामायणात हे कपी किंवा वानर पुच्छधारी म्हटलेले आहेत. त्यामुळे हनुमानाला मनुष्य म्हणण्यात मोठी अडचण येते. 

पुच्छ बाहेरून शरीराला जोडण्यात येत असल्यामुळे ते पेटवूनही हनुमानाला कोणतीही शारीरिक पीडा झाली नव्हती. पुच्छाचे वर्णन रामायणात विशेषत: हनुमानाच्या संदर्भात आणि तेही लंकादहन प्रसंगात आलेले आहे. वाली, सुग्रीव, अंगद आणि वानरस्त्रिया यांना पुच्छ असल्याचा खास उल्लेख रामायणात नाही.

वानर नसूनही त्यांच्यासारखी वाटणारी शरीराची ठेवण, रंग रूप, काही मानसिक व शारीरिक प्रवृत्ती यात, हनुमान इत्यादींच्या तथाकथित वानर समाजात आणि प्रत्यक्ष वानरांत साम्य दिसून येत असावे. चापल्य, निरंकुश स्वभाव, केसाळ शरीर, उड्या मारण्याची प्रवृत्ती, विलास प्रियता, स्त्री-पुरुष संबंधात नीतिनियमांचे शैथिल्य, पर्वत दऱ्यात वास्तव्य, वृक्षशाखा-नखे-दात यांचा शस्त्रासारखा उपयोग करणे इ. प्रवृत्ती पाहून आयांनी त्यांनी `वानर' या नावाने संबोधले असावे. वास्तविक वानर पुच्छधारी पशू नव्हते. ते भारतातील आर्येतर आदिवासी होते. आर्यांच्या मानाने ते बरेच मागासलेले होते, पण हळूहळू आर्य संस्कृतीचा प्रभाव त्यांच्यावर पडत गेला.

इतिहास संशोधकांनी पुच्छ लावून घेणाऱ्या व्यक्तींचा व मानवजातीनचा शोध लावलेला आहे. मातृगुप्त नावाचा एक बंगाली कवी हनुमानाचा अवतार मानला जात असे व तो प्रसंगी पुच्छ धारण करत असे् शबर नावाचे आदिवासी आजही उत्सवाचेवेळी पुच्छ धारण करतात.

अंदमान निकोबारमध्ये पुच्छ धारण करणारी एक आदिवासी जमात आहे, असा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एके ठिकाणी केला आहे. अशाच एखाद्या आदिवासी जमातींपैकी हनुमान हा वानरवंशोत्पन्न परमप्रतापी पुरुष असावा.

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंती