शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

Hanuman Jayanti 2021 : सप्तचिरंजिवांमध्ये हनुमंताला स्थान कसे प्राप्त झाले? त्याची कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 15:36 IST

Hanuman Jayanti 2021 : श्रीरामांच्या वरप्रसादामुळेच हनुमान चिरंजीव झाला आणि सप्तचिरंजीवात त्याची गणना होऊ लागली. 

चिरंजिवी अर्थात अमर असणारे सात जीवच या मर्त्य लोकात आहेत. बाकी जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येतोच. तसे असूनही या सात जीवांनी आपल्या पुण्याईने चिरंजिवित्त्व प्राप्त केले. ते सप्तचिरंजीव म्हणजे- 

अश्वत्थामा बलिव्र्यासो हनुमांश्च बीभीषण:।कृप: परशुरामश्च सप्तेतै चिरंजीविन:।।

सात चिरंजिवांसाठी हा श्लोक प्रसिद्ध आहे. अश्वत्थामा, बली राजा, महर्षी व्यास, बीभीषण, हनुमान, कृपाचार्य आणि परशुराम! पैकी हनुमानाला चिरंजिवी होण्याचा वर कसा मिळाला, याबाबत कथा सांगितली जाते- 

रावणाला पराभूत करून आल्यावर सर्व वानरसेनेचा गौरव सीतामाईने भेटवस्तू देऊन केला. परंतु हनुमानाच्या अपूर्व कार्याची जाणीव ठेवून त्याला म्हटले, `हे हनुमंता तुझ्या एकेक उपकारासाठी मी एकेक प्राण दिला तरी त्या उपकारांची परतफेड होणे शक्य नाही. कारण प्राण पाच आहेत आणि तुझे उपकार अनंत आहेत.'

अशा प्रकारे प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांच्या प्रीतीला आणि विश्वासाला जो पात्र ठरला त्या हनुमंताचे गुणवर्णन खरोखर कोणत्या शब्दात करावे?

आपल्या या अपूर्व गुणांनीच त्याला चिरंजीवपद प्राप्त झाले. राायणाच्या अखेरीस प्रभु रामचंद्रांजवळ वर मागताना हनुमान म्हणतो, `हे प्रभो, माझे प्रेम आणि भक्ती सदैव आपल्या ठायी राहावी. माझ्या अंत:करणाचा भाव अन्यत्र कधीही न वळावा. जोवर रामकथा जगात राहतील तोवर माझे शरीर जीवंत राहावे आणि मी जीवंत असेपर्यंत आपल्या भक्तांनी आपले चरित्र मला ऐकवत राहावे. यापुढचे सारे जीवन यापद्धतीने ऐकण्याची माझी ईच्छा आहे.'

त्याचे हे शब्द ऐकताच श्रीरामांनाही गहिवरून आले आणि ते ताबडतोब सिंहासनावरून उठले आणि त्यांनी आपल्या त्या परमप्रिय भक्ताला गाढ आलिंगन देत म्हटले, `हे कपिश्रेष्ठा, तू जे म्हणतोस तसेच होईल!'

श्रीरामांच्या वरप्रसादामुळेच हनुमान चिरंजीव झाला आणि सप्तचिरंजीवात त्याची गणना होऊ लागली. 

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंती