शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

Hanuman Jayanti 2021 : सप्तचिरंजिवांमध्ये हनुमंताला स्थान कसे प्राप्त झाले? त्याची कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 15:36 IST

Hanuman Jayanti 2021 : श्रीरामांच्या वरप्रसादामुळेच हनुमान चिरंजीव झाला आणि सप्तचिरंजीवात त्याची गणना होऊ लागली. 

चिरंजिवी अर्थात अमर असणारे सात जीवच या मर्त्य लोकात आहेत. बाकी जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येतोच. तसे असूनही या सात जीवांनी आपल्या पुण्याईने चिरंजिवित्त्व प्राप्त केले. ते सप्तचिरंजीव म्हणजे- 

अश्वत्थामा बलिव्र्यासो हनुमांश्च बीभीषण:।कृप: परशुरामश्च सप्तेतै चिरंजीविन:।।

सात चिरंजिवांसाठी हा श्लोक प्रसिद्ध आहे. अश्वत्थामा, बली राजा, महर्षी व्यास, बीभीषण, हनुमान, कृपाचार्य आणि परशुराम! पैकी हनुमानाला चिरंजिवी होण्याचा वर कसा मिळाला, याबाबत कथा सांगितली जाते- 

रावणाला पराभूत करून आल्यावर सर्व वानरसेनेचा गौरव सीतामाईने भेटवस्तू देऊन केला. परंतु हनुमानाच्या अपूर्व कार्याची जाणीव ठेवून त्याला म्हटले, `हे हनुमंता तुझ्या एकेक उपकारासाठी मी एकेक प्राण दिला तरी त्या उपकारांची परतफेड होणे शक्य नाही. कारण प्राण पाच आहेत आणि तुझे उपकार अनंत आहेत.'

अशा प्रकारे प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांच्या प्रीतीला आणि विश्वासाला जो पात्र ठरला त्या हनुमंताचे गुणवर्णन खरोखर कोणत्या शब्दात करावे?

आपल्या या अपूर्व गुणांनीच त्याला चिरंजीवपद प्राप्त झाले. राायणाच्या अखेरीस प्रभु रामचंद्रांजवळ वर मागताना हनुमान म्हणतो, `हे प्रभो, माझे प्रेम आणि भक्ती सदैव आपल्या ठायी राहावी. माझ्या अंत:करणाचा भाव अन्यत्र कधीही न वळावा. जोवर रामकथा जगात राहतील तोवर माझे शरीर जीवंत राहावे आणि मी जीवंत असेपर्यंत आपल्या भक्तांनी आपले चरित्र मला ऐकवत राहावे. यापुढचे सारे जीवन यापद्धतीने ऐकण्याची माझी ईच्छा आहे.'

त्याचे हे शब्द ऐकताच श्रीरामांनाही गहिवरून आले आणि ते ताबडतोब सिंहासनावरून उठले आणि त्यांनी आपल्या त्या परमप्रिय भक्ताला गाढ आलिंगन देत म्हटले, `हे कपिश्रेष्ठा, तू जे म्हणतोस तसेच होईल!'

श्रीरामांच्या वरप्रसादामुळेच हनुमान चिरंजीव झाला आणि सप्तचिरंजीवात त्याची गणना होऊ लागली. 

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंती