शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

हातोड्याचे आघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 04:39 IST

चार प्रेरणादायी शब्द कानावर पडले की दु:खाचा भार हलका होऊन मन, बुद्धी ताजी होत जाते.

-विजयराज बोधनकर‘कोण दिवस येई कसा कोण जाणतो?’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं हे भजन खूप काही शिकवून जातं. सुखाच्या दिवसात माणूस बेधुंद नशेत जगतो; पण जेव्हा दु:ख दाराशी येतं, तेव्हा तेच दु:ख सुंदर कल्पनेतली बाधा बनतं. दु:ख माणसाला प्यादा बनवतं. भीतीपोटी क्षुल्लक माणसांना शरण जायला भाग पाडतं. बऱ्याचदा दु:ख हे मानवनिर्मित असतं. दु:खाला फक्त सुदृढ विचारांचे औषधच विरघळू शकतं. दु:ख केवळ एक भ्रम आहे. दु:खाने अनेक संसार उद्ध्वस्त केलेत. सकाळ झाली की निसर्ग मानवाचं स्वागत करीत असतो; पण अनेक मनं सकाळच्या वेळी प्रश्नांची माळ जपत बसलेली असतात. अशा दु:खाच्या प्रवासात हे दु:खच मनाला आत्महत्याही करायला भाग पाडतं, म्हणून तर असे दु:खी मन कशात तरी रमावं म्हणून देवळात कीर्तनाला, भजनाला जाऊन बसतं. चार प्रेरणादायी शब्द कानावर पडले की दु:खाचा भार हलका होऊन मन, बुद्धी ताजी होत जाते. दु:खाला झटकून जी माणसे चिवटपणे कामाला लागतात, दु:ख त्यांच्यापासून घाबरून पळून जातं. क्षुल्लक कारणावरून दु:खी बनण्याची सवय मनाला लागलेली असते; परंतु ज्यांना जगाकडे सकारात्मक वृत्तीने बघण्याची सवय लागलेली असते, अशा माणसांकडे दु:ख चुकूनही फिरकत नसतं; कारण त्यांची विचारधारा इतकी शक्तिशाली असते की, ते कुठल्याही परिस्थितीत संकटाचा सामना करण्याची तयारी ठेवत असतात. फक्त धर्माचा अभ्यास करण्यापेक्षा उत्तम जगण्याचा धर्म म्हणजे काय असू शकतो, याचा सततचा ध्यास मनाला जास्त क्रियाशील बनवू शकतो. काळाच्या हातोड्याचे आघात सहन करण्याची क्षमता मनात येते. चालता चालता मातीत रुतून बसलेले मानवी वृत्तीचे काटे टोचतात; पण त्या वेदना क्षुल्लक समजून जो पुढे चालत राहतो, अशीच जगण्यावर खरे प्रेम करणारी माणसं असतात. येणाºया भयंकर संकटातून सुटका करून घेण्याचे मार्ग शोधत असतात; म्हणून सुखात उतू नये आणि दु:खात रडू नये.