शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

हातोड्याचे आघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 04:39 IST

चार प्रेरणादायी शब्द कानावर पडले की दु:खाचा भार हलका होऊन मन, बुद्धी ताजी होत जाते.

-विजयराज बोधनकर‘कोण दिवस येई कसा कोण जाणतो?’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं हे भजन खूप काही शिकवून जातं. सुखाच्या दिवसात माणूस बेधुंद नशेत जगतो; पण जेव्हा दु:ख दाराशी येतं, तेव्हा तेच दु:ख सुंदर कल्पनेतली बाधा बनतं. दु:ख माणसाला प्यादा बनवतं. भीतीपोटी क्षुल्लक माणसांना शरण जायला भाग पाडतं. बऱ्याचदा दु:ख हे मानवनिर्मित असतं. दु:खाला फक्त सुदृढ विचारांचे औषधच विरघळू शकतं. दु:ख केवळ एक भ्रम आहे. दु:खाने अनेक संसार उद्ध्वस्त केलेत. सकाळ झाली की निसर्ग मानवाचं स्वागत करीत असतो; पण अनेक मनं सकाळच्या वेळी प्रश्नांची माळ जपत बसलेली असतात. अशा दु:खाच्या प्रवासात हे दु:खच मनाला आत्महत्याही करायला भाग पाडतं, म्हणून तर असे दु:खी मन कशात तरी रमावं म्हणून देवळात कीर्तनाला, भजनाला जाऊन बसतं. चार प्रेरणादायी शब्द कानावर पडले की दु:खाचा भार हलका होऊन मन, बुद्धी ताजी होत जाते. दु:खाला झटकून जी माणसे चिवटपणे कामाला लागतात, दु:ख त्यांच्यापासून घाबरून पळून जातं. क्षुल्लक कारणावरून दु:खी बनण्याची सवय मनाला लागलेली असते; परंतु ज्यांना जगाकडे सकारात्मक वृत्तीने बघण्याची सवय लागलेली असते, अशा माणसांकडे दु:ख चुकूनही फिरकत नसतं; कारण त्यांची विचारधारा इतकी शक्तिशाली असते की, ते कुठल्याही परिस्थितीत संकटाचा सामना करण्याची तयारी ठेवत असतात. फक्त धर्माचा अभ्यास करण्यापेक्षा उत्तम जगण्याचा धर्म म्हणजे काय असू शकतो, याचा सततचा ध्यास मनाला जास्त क्रियाशील बनवू शकतो. काळाच्या हातोड्याचे आघात सहन करण्याची क्षमता मनात येते. चालता चालता मातीत रुतून बसलेले मानवी वृत्तीचे काटे टोचतात; पण त्या वेदना क्षुल्लक समजून जो पुढे चालत राहतो, अशीच जगण्यावर खरे प्रेम करणारी माणसं असतात. येणाºया भयंकर संकटातून सुटका करून घेण्याचे मार्ग शोधत असतात; म्हणून सुखात उतू नये आणि दु:खात रडू नये.