शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

हातोड्याचे आघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 04:39 IST

चार प्रेरणादायी शब्द कानावर पडले की दु:खाचा भार हलका होऊन मन, बुद्धी ताजी होत जाते.

-विजयराज बोधनकर‘कोण दिवस येई कसा कोण जाणतो?’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं हे भजन खूप काही शिकवून जातं. सुखाच्या दिवसात माणूस बेधुंद नशेत जगतो; पण जेव्हा दु:ख दाराशी येतं, तेव्हा तेच दु:ख सुंदर कल्पनेतली बाधा बनतं. दु:ख माणसाला प्यादा बनवतं. भीतीपोटी क्षुल्लक माणसांना शरण जायला भाग पाडतं. बऱ्याचदा दु:ख हे मानवनिर्मित असतं. दु:खाला फक्त सुदृढ विचारांचे औषधच विरघळू शकतं. दु:ख केवळ एक भ्रम आहे. दु:खाने अनेक संसार उद्ध्वस्त केलेत. सकाळ झाली की निसर्ग मानवाचं स्वागत करीत असतो; पण अनेक मनं सकाळच्या वेळी प्रश्नांची माळ जपत बसलेली असतात. अशा दु:खाच्या प्रवासात हे दु:खच मनाला आत्महत्याही करायला भाग पाडतं, म्हणून तर असे दु:खी मन कशात तरी रमावं म्हणून देवळात कीर्तनाला, भजनाला जाऊन बसतं. चार प्रेरणादायी शब्द कानावर पडले की दु:खाचा भार हलका होऊन मन, बुद्धी ताजी होत जाते. दु:खाला झटकून जी माणसे चिवटपणे कामाला लागतात, दु:ख त्यांच्यापासून घाबरून पळून जातं. क्षुल्लक कारणावरून दु:खी बनण्याची सवय मनाला लागलेली असते; परंतु ज्यांना जगाकडे सकारात्मक वृत्तीने बघण्याची सवय लागलेली असते, अशा माणसांकडे दु:ख चुकूनही फिरकत नसतं; कारण त्यांची विचारधारा इतकी शक्तिशाली असते की, ते कुठल्याही परिस्थितीत संकटाचा सामना करण्याची तयारी ठेवत असतात. फक्त धर्माचा अभ्यास करण्यापेक्षा उत्तम जगण्याचा धर्म म्हणजे काय असू शकतो, याचा सततचा ध्यास मनाला जास्त क्रियाशील बनवू शकतो. काळाच्या हातोड्याचे आघात सहन करण्याची क्षमता मनात येते. चालता चालता मातीत रुतून बसलेले मानवी वृत्तीचे काटे टोचतात; पण त्या वेदना क्षुल्लक समजून जो पुढे चालत राहतो, अशीच जगण्यावर खरे प्रेम करणारी माणसं असतात. येणाºया भयंकर संकटातून सुटका करून घेण्याचे मार्ग शोधत असतात; म्हणून सुखात उतू नये आणि दु:खात रडू नये.